शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिर्डीतील साईभक्तांचा 'बंद' मागे, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 22:44 IST

साईंच्या जन्मस्थळाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी बैठक बोलावली आहे

अहमदनगर - साई जन्मभूमी वादाच्या मुद्यावर शिर्डीत बंदला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. दावे-प्रतिदावे, बंद दुर्लक्षित करून साईभक्तांनी दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लावल्या होत्या. साईबाबांवरील भक्तांची श्रद्धा तर शिर्डीवर विश्वासाची मोहोर उमटवल्याचे दर्शन झालं. अखेर, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासानंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला आहे.

साईंच्या जन्मस्थळाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी बैठक बोलावली आहे. तर, साईभक्तांना शांत राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यानंतर, शिर्डीकरांनी पुकारलेला बंद मागे घेतल्याची घोषणा केली. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले होते. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर उघडे असून, दुकाने, बाजार मात्र बंद असल्याचे पाहायला मिळाले. तर या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी झाले होते. साईबाबा जन्मस्थळाचे पाथरीसह आठही दावे तथ्यहीन व दिशाभूल करणारे आहेत़. पाथरीला निधी देण्यास विरोध नाही, मात्र जन्मस्थळाच्या उल्लेखाला तीव्र आक्षेप आहे़. मुख्यमंत्री आपले विधान मागे घेत नाहीत, तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंद राहील, असा निर्णय ग्रामसभेत झाला़ होता. 

शिर्डीकरांनी बंद अगोदरच जाहीर करूनही भाविकांच्या गर्दीवर कोणताही परिणात झालेला नाही. दर्शन व्यवस्था सुरूळीत सुरू आहे. संस्थान प्रसादालय रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सूरू होते. त्यानंतर पहाटे एक वाजेपासूनच प्रसादालयाचा भटारखाना सुरू झाला होता. रोज सकाळी १० वाजता प्रसादालय सुरू होते. आज सकाळी साडेनऊ वाजताच सुरू करण्यात आले होते. दरम्यान, शिर्डीकरांनी हा बंद मागे घेतला असून उद्या मुख्यमंत्री यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती आहे.  

टॅग्स :MumbaiमुंबईAhmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाChief Ministerमुख्यमंत्री