अतिक्रमण हटविण्याची कारवाई टाळण्यासाठी स्वत:ला घेतले पेटवून
By Admin | Updated: May 11, 2017 16:43 IST2017-05-11T16:37:52+5:302017-05-11T16:43:26+5:30
पत्राचे घर हटवू नये, या मागणीसाठी एका व्यक्तीने चक्क स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे घडली़

अतिक्रमण हटविण्याची कारवाई टाळण्यासाठी स्वत:ला घेतले पेटवून
आॅनलाइन लोकमत
कोल्हार (अहमदनगर) दि़ ११ - अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्तात सुरु असलेली कारवाई स्थगित करावी व पत्राचे घर हटवू नये, या मागणीसाठी एका व्यक्तीने चक्क स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे घडली़ या घटनेत संबंधित व्यक्ती ७० टक्के भाजला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
गळनिंब येथे गुरुवारी पोलीस बंदोबस्तात रस्त्याकडेचे अतिक्रमण हटविण्यात येते़ याच मार्गावर अनिल अंबादास कुलकर्णी (वय ६९) यांचे पत्र्याचे घर होते़ हे घर अतिक्रमणात येत होते़ त्यामुळे प्रशासनाने हे घरही हटविण्याची तयारी सुरु केली़ मात्र, कुलकर्णी यांनी ही कारवाई थांबविण्याची मागणी करीत स्वत:च्या घरात जाऊन अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले़ लोकांनी तातडीने कुलकर्णी यांना विझविले़ मात्र, तोपर्यंत आगीने ते प्रचंड भाजले होते़ त्यांना तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ रुग्णालय अधिकाऱ्यांनी कुलकर्णी हे ७० टक्के भाजले असल्याचे सांगितले़