शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 11:21 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

अकोले : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या मागे जनता आहे, पण त्यांचे नेते हतबल झाले आहेत. आपण भाजपपासून दूर गेल्यानंतर ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या अगदी गळ्यात गळे घातले नाहीत पण राजकियदृष्ट्या त्यांच्या अधिक जवळ गेलोय! हे अगदिच असत्य नाही असे स्पष्ट करत ‘सनातन’वर बंदी घालावी, अशीही मागणी खासदार शेट्टी यांनी केली.नाशिक-पुणे प्रवासाच्या दरम्यान खासदार शेट्टी यांनी इंदोरी-रुंभोडी या गावांना भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष साथी दशरथ सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर संवाद साधला.‘मोदी’ हे चांगले अभिनेते आहेत. त्यांनी ‘अच्छे दिन’ या गोंडस शब्दांना आर्थिक व सामाजिक प्रश्नांची जोड देवून सत्ता मिळवली. मोदी करतील असे अभास निर्माण झाला होता. आता ही जादू विरली आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा देखील तरुणाईचा उन्माद दिसला पण तो फार काळ टिकून राहीलेला नाही.त् ासेच ‘भाजप’च्या तालीबानी विचारांचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही. लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही. विचाराच्या पातळीवर भाजप लढाई करत नाही. शारीरिक हल्ल्यांपर्यंत त्यांची मजल गेली आहे. महात्मा गांधींना खलनायक ठरवण्याचा भाजपाचा घाट जनता कधीच यशस्वी होऊ देणार नाही. महात्मा गांधीचे विचारच देशाला तारणहार ठरत आहेत. पुरोगामीत्व टिकवण्याची जबाबदारी कॉग्रेस - राष्ट्रवादीची असून आता त्यांना प्रतिगाम्यांशी लढण्यासाठी आमच्या सारख्या पुरोगामी संघटनांच्या मदती शिवाय पर्याय नाही. शहरांना सूज येत असून खेडी ओस पडत चालली आहे. कष्टकरी श्रमीकांच्या उध्दारासाठी सघंटना बळकट व्हायला हवी. विवेकशून्य लोक तरुणाईची माथी भडकवण्याच काम करतायेत,हे थांबवायला हवं. चळवळीची दिशा भरकटू नये, म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांनी सजग रहायला हवं, असे मत खासदार शेट्टी यांनी व्यक्त केलं.चळवळी भरकटू नयेतनगर जिल्ह्याने राज्याच्या शेतकरी कामगार चळवळीला विचार व नेतृत्व दिलं. साखर सम्राटांच्या उदयामुळे ते लुप्त झालं होतं. सहकारातून वैचारीक गुलामगिरी वाढली होती. आता पुन्हा एकदा ‘दूध व ऊस’ आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चळवळ बाळसं धरु लागली आहे. चळवळी भरकटू नये म्हणून त्या योग्य माणसांच्या हातात जायला हव्यात, त्यासाठी सप्टेंबर मधे कृती कार्यक्रम घेवू असे खासदार शेट्टी यांनी सावंत यांचे घरी कार्यकर्त्यां मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी सावकार मादनाईक, हंसराज वडगुले, नाना बच्छाव, सागर पिंपरगे, भाऊसाहेब चासकर, भानुदास हासे, बबन नवले, परबत नाईवाडी, रमेश जगताप, पोपट सावंत, प्रकाश मालुंजकर, सुभाष येवले, चंद्रकांत नेहे, डॉ.रविंद्र सावंत उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले