शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 11:21 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

अकोले : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या मागे जनता आहे, पण त्यांचे नेते हतबल झाले आहेत. आपण भाजपपासून दूर गेल्यानंतर ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या अगदी गळ्यात गळे घातले नाहीत पण राजकियदृष्ट्या त्यांच्या अधिक जवळ गेलोय! हे अगदिच असत्य नाही असे स्पष्ट करत ‘सनातन’वर बंदी घालावी, अशीही मागणी खासदार शेट्टी यांनी केली.नाशिक-पुणे प्रवासाच्या दरम्यान खासदार शेट्टी यांनी इंदोरी-रुंभोडी या गावांना भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष साथी दशरथ सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर संवाद साधला.‘मोदी’ हे चांगले अभिनेते आहेत. त्यांनी ‘अच्छे दिन’ या गोंडस शब्दांना आर्थिक व सामाजिक प्रश्नांची जोड देवून सत्ता मिळवली. मोदी करतील असे अभास निर्माण झाला होता. आता ही जादू विरली आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा देखील तरुणाईचा उन्माद दिसला पण तो फार काळ टिकून राहीलेला नाही.त् ासेच ‘भाजप’च्या तालीबानी विचारांचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही. लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही. विचाराच्या पातळीवर भाजप लढाई करत नाही. शारीरिक हल्ल्यांपर्यंत त्यांची मजल गेली आहे. महात्मा गांधींना खलनायक ठरवण्याचा भाजपाचा घाट जनता कधीच यशस्वी होऊ देणार नाही. महात्मा गांधीचे विचारच देशाला तारणहार ठरत आहेत. पुरोगामीत्व टिकवण्याची जबाबदारी कॉग्रेस - राष्ट्रवादीची असून आता त्यांना प्रतिगाम्यांशी लढण्यासाठी आमच्या सारख्या पुरोगामी संघटनांच्या मदती शिवाय पर्याय नाही. शहरांना सूज येत असून खेडी ओस पडत चालली आहे. कष्टकरी श्रमीकांच्या उध्दारासाठी सघंटना बळकट व्हायला हवी. विवेकशून्य लोक तरुणाईची माथी भडकवण्याच काम करतायेत,हे थांबवायला हवं. चळवळीची दिशा भरकटू नये, म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांनी सजग रहायला हवं, असे मत खासदार शेट्टी यांनी व्यक्त केलं.चळवळी भरकटू नयेतनगर जिल्ह्याने राज्याच्या शेतकरी कामगार चळवळीला विचार व नेतृत्व दिलं. साखर सम्राटांच्या उदयामुळे ते लुप्त झालं होतं. सहकारातून वैचारीक गुलामगिरी वाढली होती. आता पुन्हा एकदा ‘दूध व ऊस’ आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चळवळ बाळसं धरु लागली आहे. चळवळी भरकटू नये म्हणून त्या योग्य माणसांच्या हातात जायला हव्यात, त्यासाठी सप्टेंबर मधे कृती कार्यक्रम घेवू असे खासदार शेट्टी यांनी सावंत यांचे घरी कार्यकर्त्यां मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी सावकार मादनाईक, हंसराज वडगुले, नाना बच्छाव, सागर पिंपरगे, भाऊसाहेब चासकर, भानुदास हासे, बबन नवले, परबत नाईवाडी, रमेश जगताप, पोपट सावंत, प्रकाश मालुंजकर, सुभाष येवले, चंद्रकांत नेहे, डॉ.रविंद्र सावंत उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले