शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 11:21 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

अकोले : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या मागे जनता आहे, पण त्यांचे नेते हतबल झाले आहेत. आपण भाजपपासून दूर गेल्यानंतर ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या अगदी गळ्यात गळे घातले नाहीत पण राजकियदृष्ट्या त्यांच्या अधिक जवळ गेलोय! हे अगदिच असत्य नाही असे स्पष्ट करत ‘सनातन’वर बंदी घालावी, अशीही मागणी खासदार शेट्टी यांनी केली.नाशिक-पुणे प्रवासाच्या दरम्यान खासदार शेट्टी यांनी इंदोरी-रुंभोडी या गावांना भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष साथी दशरथ सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर संवाद साधला.‘मोदी’ हे चांगले अभिनेते आहेत. त्यांनी ‘अच्छे दिन’ या गोंडस शब्दांना आर्थिक व सामाजिक प्रश्नांची जोड देवून सत्ता मिळवली. मोदी करतील असे अभास निर्माण झाला होता. आता ही जादू विरली आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा देखील तरुणाईचा उन्माद दिसला पण तो फार काळ टिकून राहीलेला नाही.त् ासेच ‘भाजप’च्या तालीबानी विचारांचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही. लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही. विचाराच्या पातळीवर भाजप लढाई करत नाही. शारीरिक हल्ल्यांपर्यंत त्यांची मजल गेली आहे. महात्मा गांधींना खलनायक ठरवण्याचा भाजपाचा घाट जनता कधीच यशस्वी होऊ देणार नाही. महात्मा गांधीचे विचारच देशाला तारणहार ठरत आहेत. पुरोगामीत्व टिकवण्याची जबाबदारी कॉग्रेस - राष्ट्रवादीची असून आता त्यांना प्रतिगाम्यांशी लढण्यासाठी आमच्या सारख्या पुरोगामी संघटनांच्या मदती शिवाय पर्याय नाही. शहरांना सूज येत असून खेडी ओस पडत चालली आहे. कष्टकरी श्रमीकांच्या उध्दारासाठी सघंटना बळकट व्हायला हवी. विवेकशून्य लोक तरुणाईची माथी भडकवण्याच काम करतायेत,हे थांबवायला हवं. चळवळीची दिशा भरकटू नये, म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांनी सजग रहायला हवं, असे मत खासदार शेट्टी यांनी व्यक्त केलं.चळवळी भरकटू नयेतनगर जिल्ह्याने राज्याच्या शेतकरी कामगार चळवळीला विचार व नेतृत्व दिलं. साखर सम्राटांच्या उदयामुळे ते लुप्त झालं होतं. सहकारातून वैचारीक गुलामगिरी वाढली होती. आता पुन्हा एकदा ‘दूध व ऊस’ आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चळवळ बाळसं धरु लागली आहे. चळवळी भरकटू नये म्हणून त्या योग्य माणसांच्या हातात जायला हव्यात, त्यासाठी सप्टेंबर मधे कृती कार्यक्रम घेवू असे खासदार शेट्टी यांनी सावंत यांचे घरी कार्यकर्त्यां मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी सावकार मादनाईक, हंसराज वडगुले, नाना बच्छाव, सागर पिंपरगे, भाऊसाहेब चासकर, भानुदास हासे, बबन नवले, परबत नाईवाडी, रमेश जगताप, पोपट सावंत, प्रकाश मालुंजकर, सुभाष येवले, चंद्रकांत नेहे, डॉ.रविंद्र सावंत उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले