शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘उज्ज्वला’ चे लाभार्थी पुन्हा चुलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST

अहमदनगर : केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील योजनेचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यातच ...

अहमदनगर : केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील योजनेचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यातच पूर्ण झाले असल्याने दुसऱ्या टप्प्यासाठी अहमदनगर जिल्ह्याला उज्ज्वला योजनेतून वगळण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांना गॉस कनेक्शन मिळाले त्यांना मात्र महागाईची झळ बसत आहे. सिलेंडर महाग झाल्याने या योजनेचे अनेक लाभार्थी आता चुलीकडे वळाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र गॅस कनेक्शन मिळून देखील ते खरेदी करण्याची ऐपत लोकांमध्ये राहिली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

-------------

जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला गॅस कनेक्शन

३ लाख २० हजार १७

--------------

गँस सिलिंडरचे दर (रुपयात)

जाने. २०१९.....५००

जाने. २०२०....६५०

जाने. २०२१....७५०

जुलै २०२१.....८४८

ऑगस्ट-२०२१....८७३

-----------

सिलिंडरसाठी पैस आणायचे कोठून ?

आधार कार्ड व रेशन कार्डाची झेरॉक्स घेऊन त्यावेळी शेगडी आणि गॅस दिला जात होता. गॅस संपल्यानंतर पुन्हा भरण्यासाठी किंमत जास्त असल्यामुळे तो तसाच धूळखात पडला आहे. चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

-आकाश गाडे, नगर

--------

-----

कोरोनामुळे मजुरी मिळणे कठीण झाले आहे. सगळे हाल सुरू आहेत. त्यामुळे गॅस वापरणे शक्य नाही. पावसाळ्यात लाकूड वाळलेले नसतात. रेशनवर रॉकेल मिळत नाही. त्यामुळे स्वयंपाक करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

-सरुबाई शिंदे, नगर

-----------

मोदी सरकारने मोफत सिलिंडर दिले आहेत. मात्र ते भरून त्यावर स्वयंपाक करणे परवडत नाही. किंमत वाढल्यामुळे पुन्हा चुलीवर जेवण तयार करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे मोफत गॅस कनेक्शन उपयोगाचे नाहीत. सिलिंडरच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणाव्यात.

-दीपक कावळे, नगर

------------

डमी क्रमांक- १०४५