शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

‘उज्ज्वला’ चे लाभार्थी पुन्हा चुलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST

अहमदनगर : केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील योजनेचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यातच ...

अहमदनगर : केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील योजनेचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यातच पूर्ण झाले असल्याने दुसऱ्या टप्प्यासाठी अहमदनगर जिल्ह्याला उज्ज्वला योजनेतून वगळण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांना गॉस कनेक्शन मिळाले त्यांना मात्र महागाईची झळ बसत आहे. सिलेंडर महाग झाल्याने या योजनेचे अनेक लाभार्थी आता चुलीकडे वळाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र गॅस कनेक्शन मिळून देखील ते खरेदी करण्याची ऐपत लोकांमध्ये राहिली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

-------------

जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला गॅस कनेक्शन

३ लाख २० हजार १७

--------------

गँस सिलिंडरचे दर (रुपयात)

जाने. २०१९.....५००

जाने. २०२०....६५०

जाने. २०२१....७५०

जुलै २०२१.....८४८

ऑगस्ट-२०२१....८७३

-----------

सिलिंडरसाठी पैस आणायचे कोठून ?

आधार कार्ड व रेशन कार्डाची झेरॉक्स घेऊन त्यावेळी शेगडी आणि गॅस दिला जात होता. गॅस संपल्यानंतर पुन्हा भरण्यासाठी किंमत जास्त असल्यामुळे तो तसाच धूळखात पडला आहे. चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

-आकाश गाडे, नगर

--------

-----

कोरोनामुळे मजुरी मिळणे कठीण झाले आहे. सगळे हाल सुरू आहेत. त्यामुळे गॅस वापरणे शक्य नाही. पावसाळ्यात लाकूड वाळलेले नसतात. रेशनवर रॉकेल मिळत नाही. त्यामुळे स्वयंपाक करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

-सरुबाई शिंदे, नगर

-----------

मोदी सरकारने मोफत सिलिंडर दिले आहेत. मात्र ते भरून त्यावर स्वयंपाक करणे परवडत नाही. किंमत वाढल्यामुळे पुन्हा चुलीवर जेवण तयार करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे मोफत गॅस कनेक्शन उपयोगाचे नाहीत. सिलिंडरच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणाव्यात.

-दीपक कावळे, नगर

------------

डमी क्रमांक- १०४५