शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बाप्पा पावले

By admin | Updated: September 7, 2016 00:37 IST

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असून, या उत्सवामुळे बाजारपेठेला नवसंजीवनी मिळाली आहे़

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असून, या उत्सवामुळे बाजारपेठेला नवसंजीवनी मिळाली आहे़ गेल्या सात ते आठ दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे़ गणेश मूर्ती, सजावटीसह विविध साहित्य विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून मंदावलेल्या बाजारपेठेला यंदा गणपती बाप्पा चांगलेच पावले असल्याचे म्हणता येईल़ शहरात गेल्या दोन दिवसांत गणेश मूर्ती विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली़ महाराष्ट्रासह परराज्यातूनही यंदा येथील मूर्तींना मोठी मागणी होती़ शहरातील मूर्ती कारखान्यात गेल्या सहा महिन्यांपासून दीड हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले़ सजावटीसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक व इतर साहित्यांचीही मोठी विक्री झाली़ गणपती पूजेसाठी लागणारे छोटे-मोठे साहित्य विक्रीसाठी जिल्हाभरातून विक्रेते नगर शहरात आले होते़ केळी, डाळिंब, मोसंबी, सिताफळ, नारळ, केळी या फळांना मोठी मागणी वाढली आहे़ उत्सवानिमित्त विविध मंडळांकडून टी शर्टस्, जॉकेट व बनियानवर प्रिटिंग करून घेतले जात असून, कापडबाजारासह कारागिरांनाही चांगली संधी उपलब्ध झाली आहे़ दुष्काळामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून थंड पडलेल्या बाजारपेठेला चांगलीच उर्जितावस्था आली आहे़ गणेशोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, विविध ठिकाणी सर्वधर्मीय एकत्र येऊन उत्सव साजरा करत आहेत़ पोलिसांनी केलेल्या आवाहनाला अनेक गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकत्रित गणपतीची प्रतिष्ठापना केली़ नगर शहरात ८ खासगीसह ४५८ सार्वजनिक मंडळांनी परवानगी घेत प्रतिष्ठापना केली आहे़ विविध परिसरात बालमंडळांनीही प्रतिष्ठापना केल्या आहेत़ (प्रतिनिधी)यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातही जवळपास सर्वच मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली आहे़ यामुळे काळाच्या पडद्याआड जावू पाहणारे सनई, डफ, लेझीम,झांज या वाद्यांचा पुन्हा एकदा गजर सुरू झाला आहे़ ४शहरात विविध मंडळांच्यावतीने गणेशोत्सवात विविध आकर्षक व प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात़ यंदाही पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या देखाव्यासह विविध भव्य देखाव्यांचे काम अंतिम टप्यात असून, नगरकरांना हे देखावे खुले होण्याची प्रतीक्षा आहे़ शहरासह जिल्हाभरातील नागरिक हे देखावे पाहण्यासाठी येतात़