शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

नोटाबंदीने झाला बँका, पतसंस्थांचा तोटा; कॅशलेसही फेल- काका कोयटे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 18:41 IST

‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे पतसंस्था व बँकिंग क्षेत्राला फायदा काही झाला नाही. झाला तो तोटाच झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले होते. आम्ही कॅशलेससाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. ही तयारी फेल गेली.

अहमदनगर : केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यातील गावपातळीवरील सहकारी पतसंस्थांना फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक झाल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना नोंदविले.८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती होत आहे. या पार्श्वभूमीवर पतसंस्था व बँकिंग क्षेत्रात नोटाबंदीमुळे काय फायदे-तोटे झाले? या विषयी विचारले असता, ते म्हणाले, ‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे पतसंस्था व बँकिंग क्षेत्राला फायदा काही झाला नाही. झाला तो तोटाच झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यानुसार या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार वाढतील, असे वाटत होते. पण नंतर कॅशलेस व्यवहार वाढलेले दिसत नाहीत. पतसंस्था क्षेत्रात आम्ही कॅशलेससाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. ही तयारी फेल गेली.नोटाबंदीमुळे बँका व पतसंस्थांच्या कर्जवसुलीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला. कर्जवसुलीसाठी कर्ज थकबाकीदारांकडे बँका, पतसंस्थांचे प्रतिनिधी गेल्यास प्रत्येक जण नोटाबंदीचे कारण पुढे करून धंदा नाही, पैसा नाही, मंदी आहे, असे सांगत कर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कर्जवसुलीस मोठा फटका बसला. नोटाबंदीनंतर व्यवसाय वाढतील, असे वाटत होते. पण तसे झालेले दिसत नाही. बँकिंग क्षेत्रावर नोटाबंदीचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी नकारात्मक परिणाम झाला आहे. केंद्र सरकारला खरेच कॅशलेस व्यवहार करायचे होते तर केंद्र सरकारला पतसंस्था हा चांगला पर्याय होता. शेवटच्या घटकापर्यंत सरकारी, योजनांचे लाभ पोहोचले पाहिजेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत म्हणत असतात. कॅशलेस व्यवहारासाठी सरकारला पतसंस्था हा शेवटच्या घटकापर्यंत पोहचणारा सर्वाधिक उपयुक्त पर्याय होता. आम्ही मोबाईल बँकिंग, मिनी एटीएम, थंब इप्रेशनद्वारे फक्त अंगठा टेकविला तर कोणत्याही बँकेचे व्यवहार पतसंस्थांमार्फत करणे, अशी जय्यत तयारी कॅशलेस व्यवहारांसाठी केली होती. पण त्यासाठी सरकारकडून काहीच प्रोत्साहन मिळाले नाही.पतसंस्थांच्या ठेवी गोळा करणाºया गरीब माणसांना दहा ते शंभर रुपये रोज मिळतो. पण त्यांच्याही कमिशनमधून जी.एस.टी.मुळे कर कपात सुरू झाली आहे. ग्रामीण भागात जागृती करणे गरजेचे होते. ती झालेली नाही. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागात कॅशलेसऐवजी रोखीनेच व्यवहार होत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNote Banनोटाबंदी