शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

नोटाबंदीने झाला बँका, पतसंस्थांचा तोटा; कॅशलेसही फेल- काका कोयटे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 18:41 IST

‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे पतसंस्था व बँकिंग क्षेत्राला फायदा काही झाला नाही. झाला तो तोटाच झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले होते. आम्ही कॅशलेससाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. ही तयारी फेल गेली.

अहमदनगर : केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यातील गावपातळीवरील सहकारी पतसंस्थांना फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक झाल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना नोंदविले.८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती होत आहे. या पार्श्वभूमीवर पतसंस्था व बँकिंग क्षेत्रात नोटाबंदीमुळे काय फायदे-तोटे झाले? या विषयी विचारले असता, ते म्हणाले, ‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे पतसंस्था व बँकिंग क्षेत्राला फायदा काही झाला नाही. झाला तो तोटाच झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यानुसार या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार वाढतील, असे वाटत होते. पण नंतर कॅशलेस व्यवहार वाढलेले दिसत नाहीत. पतसंस्था क्षेत्रात आम्ही कॅशलेससाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. ही तयारी फेल गेली.नोटाबंदीमुळे बँका व पतसंस्थांच्या कर्जवसुलीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला. कर्जवसुलीसाठी कर्ज थकबाकीदारांकडे बँका, पतसंस्थांचे प्रतिनिधी गेल्यास प्रत्येक जण नोटाबंदीचे कारण पुढे करून धंदा नाही, पैसा नाही, मंदी आहे, असे सांगत कर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कर्जवसुलीस मोठा फटका बसला. नोटाबंदीनंतर व्यवसाय वाढतील, असे वाटत होते. पण तसे झालेले दिसत नाही. बँकिंग क्षेत्रावर नोटाबंदीचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी नकारात्मक परिणाम झाला आहे. केंद्र सरकारला खरेच कॅशलेस व्यवहार करायचे होते तर केंद्र सरकारला पतसंस्था हा चांगला पर्याय होता. शेवटच्या घटकापर्यंत सरकारी, योजनांचे लाभ पोहोचले पाहिजेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत म्हणत असतात. कॅशलेस व्यवहारासाठी सरकारला पतसंस्था हा शेवटच्या घटकापर्यंत पोहचणारा सर्वाधिक उपयुक्त पर्याय होता. आम्ही मोबाईल बँकिंग, मिनी एटीएम, थंब इप्रेशनद्वारे फक्त अंगठा टेकविला तर कोणत्याही बँकेचे व्यवहार पतसंस्थांमार्फत करणे, अशी जय्यत तयारी कॅशलेस व्यवहारांसाठी केली होती. पण त्यासाठी सरकारकडून काहीच प्रोत्साहन मिळाले नाही.पतसंस्थांच्या ठेवी गोळा करणाºया गरीब माणसांना दहा ते शंभर रुपये रोज मिळतो. पण त्यांच्याही कमिशनमधून जी.एस.टी.मुळे कर कपात सुरू झाली आहे. ग्रामीण भागात जागृती करणे गरजेचे होते. ती झालेली नाही. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागात कॅशलेसऐवजी रोखीनेच व्यवहार होत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNote Banनोटाबंदी