शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मुक्या, भटक्या जीवाची भूक जाणतो अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:10 IST

रोज मोकाट फिरणाऱ्या कुत्री,मांजरांना सकाळी व सांयकाळी सायकलचा आवाज आला की सायकलभोवती ते शेपटीचा गोंडा घोळत पिंगा घालत पटापट जमा होतात.

विश्वास रेणूकरराशीन : रोज मोकाट फिरणाऱ्या कुत्री,मांजरांना सकाळी व सांयकाळी सायकलचा आवाज आला की सायकलभोवती ते शेपटीचा गोंडा घोळत पिंगा घालत पटापट जमा होतात. अन् त्यांची भूक ओळखून मुक्या जीवांना अन्नाचा घास भरविण्याचे काम नित्याचे झाले आहे.राशीन येथील सय्यद अकबर मैनुद्दीन कवीजंग जहागिरदार आठ वर्षांपासून हे काम करीत आहेत. घरात रात्रीच्या जेवणानंतर शिळे राहिलेले अन्न ते सकाळी जमवून घराजवळील चौकात गावात मोकाट फिरणाऱ्या कुत्री, मांजरांना टाकतात. जहागिरदार यांचा हा नित्यक्रम झाल्याने शेजारची मित्रमंडळी त्यांच्या घरातील शिल्लक भाकरी-चपाती आठवणीने जहागिरदार यांना देतात. सकाळी उठल्यानंतर घरातून कामाला जाण्याआगोदर रोज इतरत्र फिरणारी मुकी जनावरे त्यांची वाट पहातच बसलेले असतात. घरातून निघताना सायकलचा आवाज कानावर पडला की मुके प्राणी जमा होतात. आणि टाकलेले तुकडे खाऊन निघून जातात. सायंकाळीही परत सकाळसारखी पुनरावृत्ती होते. जहागिरदार कामावरून येताना दिसले की जमा होतात.जहागिरदार यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. असे असताना देखील मुले लहान असताना स्वत:च्या संसारासाठी भाकरीतला चंद्र शोधण्यासाठी निघालेल्या परिस्थितीतूनच मुक्या, भटक्या जीवांची ‘भूक’ त्यांना दिसली. मोलमजुरीतून जे काही उरलेलं अन्न मुक्या जीवांच्या पोटाची भूक काही प्रमाणात का होईना भागवेल, या भावनेतून त्यांनी हा छंद जोपासला.परमेश्वराने पोट दिले. त्याच्या अन्नपाण्याची सोय देखील त्यानेच केली. आपण मात्र निमित्त असल्याचे सांगत माणसाला लागलेली भूक तो बोलून दाखवितो. त्यासाठी तो कष्ट करतो. पण मुक्या भटक्या जीवाने काय करावे.हीच जाणीव प्रत्येकाने ठेवल्यास सद्भावना वाढीस लागेल. मुकी जनावरे टाकलेले तुकडे खाऊन परत जाताना मला मोठे समाधान मिळत असल्याचे जहागिरदार सांगतात. त्यांना मुक्या जीवांबरोबरच दिव्यांग व्यक्तीची फार किव वाटते. दोन वर्षांपूर्वी ते राशीनमधील दिव्यांग श्रीदास साळवे यांना अपंग भत्ता मिळवून देण्यासाठी सरकारी कामकाजानिमित्त राशीन-कर्जत अशी सायकल ढकलण्याठी ते तब्बल पाच वेळा गेले.परिस्थिती माणसाला जगायचे व मरायचे शिकवते. निर्णय आपण घ्यायचा असतो. कर्म प्रत्येकाचे वेगवेगळ असते. नियती फार मोठी असते. दातृत्वाची भावना निष्काम ठेवा. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळले नाही पाहिजे.-सय्यद अकबर मैनुद्दीन जहागिरदार.आम्ही वडिलांना खर्चासाठी महिन्याकाठी पाच-सहाशे रूपये देतो. एखादेवेळेस शिळे अन्न नसल्यास बिस्किट पुडे घेऊन ते प्राण्यांना खाऊ घालतात, पण खंड करीत नाहीत.-साहिल जहागिरदार (सय्यद अकबर यांचा मुलगा).

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर