शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मुक्या, भटक्या जीवाची भूक जाणतो अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:10 IST

रोज मोकाट फिरणाऱ्या कुत्री,मांजरांना सकाळी व सांयकाळी सायकलचा आवाज आला की सायकलभोवती ते शेपटीचा गोंडा घोळत पिंगा घालत पटापट जमा होतात.

विश्वास रेणूकरराशीन : रोज मोकाट फिरणाऱ्या कुत्री,मांजरांना सकाळी व सांयकाळी सायकलचा आवाज आला की सायकलभोवती ते शेपटीचा गोंडा घोळत पिंगा घालत पटापट जमा होतात. अन् त्यांची भूक ओळखून मुक्या जीवांना अन्नाचा घास भरविण्याचे काम नित्याचे झाले आहे.राशीन येथील सय्यद अकबर मैनुद्दीन कवीजंग जहागिरदार आठ वर्षांपासून हे काम करीत आहेत. घरात रात्रीच्या जेवणानंतर शिळे राहिलेले अन्न ते सकाळी जमवून घराजवळील चौकात गावात मोकाट फिरणाऱ्या कुत्री, मांजरांना टाकतात. जहागिरदार यांचा हा नित्यक्रम झाल्याने शेजारची मित्रमंडळी त्यांच्या घरातील शिल्लक भाकरी-चपाती आठवणीने जहागिरदार यांना देतात. सकाळी उठल्यानंतर घरातून कामाला जाण्याआगोदर रोज इतरत्र फिरणारी मुकी जनावरे त्यांची वाट पहातच बसलेले असतात. घरातून निघताना सायकलचा आवाज कानावर पडला की मुके प्राणी जमा होतात. आणि टाकलेले तुकडे खाऊन निघून जातात. सायंकाळीही परत सकाळसारखी पुनरावृत्ती होते. जहागिरदार कामावरून येताना दिसले की जमा होतात.जहागिरदार यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. असे असताना देखील मुले लहान असताना स्वत:च्या संसारासाठी भाकरीतला चंद्र शोधण्यासाठी निघालेल्या परिस्थितीतूनच मुक्या, भटक्या जीवांची ‘भूक’ त्यांना दिसली. मोलमजुरीतून जे काही उरलेलं अन्न मुक्या जीवांच्या पोटाची भूक काही प्रमाणात का होईना भागवेल, या भावनेतून त्यांनी हा छंद जोपासला.परमेश्वराने पोट दिले. त्याच्या अन्नपाण्याची सोय देखील त्यानेच केली. आपण मात्र निमित्त असल्याचे सांगत माणसाला लागलेली भूक तो बोलून दाखवितो. त्यासाठी तो कष्ट करतो. पण मुक्या भटक्या जीवाने काय करावे.हीच जाणीव प्रत्येकाने ठेवल्यास सद्भावना वाढीस लागेल. मुकी जनावरे टाकलेले तुकडे खाऊन परत जाताना मला मोठे समाधान मिळत असल्याचे जहागिरदार सांगतात. त्यांना मुक्या जीवांबरोबरच दिव्यांग व्यक्तीची फार किव वाटते. दोन वर्षांपूर्वी ते राशीनमधील दिव्यांग श्रीदास साळवे यांना अपंग भत्ता मिळवून देण्यासाठी सरकारी कामकाजानिमित्त राशीन-कर्जत अशी सायकल ढकलण्याठी ते तब्बल पाच वेळा गेले.परिस्थिती माणसाला जगायचे व मरायचे शिकवते. निर्णय आपण घ्यायचा असतो. कर्म प्रत्येकाचे वेगवेगळ असते. नियती फार मोठी असते. दातृत्वाची भावना निष्काम ठेवा. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळले नाही पाहिजे.-सय्यद अकबर मैनुद्दीन जहागिरदार.आम्ही वडिलांना खर्चासाठी महिन्याकाठी पाच-सहाशे रूपये देतो. एखादेवेळेस शिळे अन्न नसल्यास बिस्किट पुडे घेऊन ते प्राण्यांना खाऊ घालतात, पण खंड करीत नाहीत.-साहिल जहागिरदार (सय्यद अकबर यांचा मुलगा).

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर