शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अगस्तीने केले ६ लाख ११ हजार टनांचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:15 IST

अगस्ती सहकारी साखर कारखान्याने ६ लाख ५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून २०२०-२१ या गळीत हंगामासाठी ठरवलेले उद्दिष्ट ...

अगस्ती सहकारी साखर कारखान्याने ६ लाख ५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून २०२०-२१ या गळीत हंगामासाठी ठरवलेले उद्दिष्ट मंगळवारी (२७ एप्रिल) पूर्ण केल्याने ऊस उत्पादक सभासद चालू गळीत हंगामातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत आहेत. अगस्तीने आतापर्यंत ६ लाख ५६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. अगस्तीचा आजचा साखर उतारा १२.६० टक्के असून सरासरी १०.८६ टक्के आहे. अजूनही कार्यक्षेत्रातून गळितास साधारणपणे ३५ हजार मेट्रिक टन ऊस येणे अपेक्षित आहे.

चालू गळीत हंगामाचा बुधवारी १८६ वा दिवस आहे. अगस्तीची प्रतिदिन ऊस गाळपाची क्षमता २५०० मेट्रिक टन असून देखील अगस्तीने मागील गळीत हंगामापासून आहे. त्याच यंत्रणेत अत्याधुनिक बदल केला आहे. प्रतिदिन ३६०० ते ३८०० मेट्रिक टन क्षमतेने मिल चालवण्याचे कसब यशस्वी केले आहे.

चालू गळीत हंगामापासून ३० हजार लिटर्स प्रतिदिन क्षमतेने इथेनॉल निर्मिती करीत प्रकल्पाची चाचणी यशस्वी केली आहे. हा गळीत हंगाम थांबवण्यात अगस्तीच्या प्रशासनाकडून ३० एप्रिलची अंतिम तारीख निश्चित केली आहे. तरीदेखील अगस्तीचा पट्टा साधारणपणे ५ मेनंतरच पडेल.

उपाध्यक्ष सीताराम गायकर म्हणाले, कार्यक्षेत्रातून गळितास असलेल्या संपूर्ण उसाची तोड झाल्यानंतरच बाॅयलर थंड होईल. चालू गळीत हंगामात अगस्तीच्या कार्यक्षेत्रात प्रवरा, मुळा व आढळा खोऱ्यातून व आदिवासी भागातूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ऊस लागवडीखालील क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. पुढील गळीत हंगामात गाळपासाठी सुमारे ६ लाख मेट्रिक टन ऊस कार्यक्षेत्रातून निर्माण करण्यात आला आहे. शिवाय, कार्यक्षेत्राबाहेरूनही ऊस पुरविण्यात राहुरी, नेवासे, निफाड, गंगापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आग्रही आहेत. चालू गळीत हंगामातही कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अगस्तीवरील विश्वास कायम ठेवून ऊस पुरविण्यात सहकार्य केल्यामुळेच हंगाम यशस्वी करू शकलो. या हंगामापासून पूर्ण क्षमतेनुसार इथेनॉल प्रकल्प चालवून इथेनॉल निर्मिती केली. त्याचा फायदा ऊस उत्पादक सभासदांना अधिकचा ऊसदर मिळण्यावर होणार आहे.

.............

कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह अधिकारी, खातेप्रमुख, साखर कामगार, ऊस उत्पादक, सभासद, ऊसतोड ठेकेदार व कामगार, वाहतूकदार यांनी एकत्रितपणे नियोजनबद्ध प्रोग्राम उत्तम पद्धतीने राबविल्याने गळीत हंगामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, तो अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी दिली.