शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अरे एवढे दिवस झोपा काढल्या का? अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:18 IST

"राज्यात काही जण अचानक बाहेर निघाली आणि अचानकच भोंगे बंद करण्याची भाषा करू लागली आहेत," अजित पवार यांचं वक्तव्य

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील पोलीस ठाणे इमारत, बसस्थानक, पंचायत समिती इमारत उद्घाटन तसेच शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदी कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाषणादरम्यान अजित पवारांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचं नाव न घेता टीका केली. "राज्यात काही जण अचानक बाहेर निघाली आणि अचानकच भोंगे बंद करण्याची भाषा करू लागली आहेत. अरे एवढे दिवस काय झोपा काढल्या होत्या काय?,"| असा सवाल त्यांनी केला.

"भोंग्या बद्दल बोलणाऱ्यांपैकी मागील सरकारमध्ये कोणी नव्हते का? सध्या काही लोक अशाच वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणायचं काम करतायेत. विकासाला महत्त्व देण्याऐवजी वेगळी चर्चा समाजात घडवून आणायची समाजात वितुष्ट कसे निर्माण होईल, दरी कशी निर्माण होईल हे पाहिलं जात आहे. आपण किती वर्षांपासून महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणांचा आदर करतोय. एकमेकांना शुभेच्छा देतो आहोत. ही आपली संस्कृती हीच आपली परंपरा आहे," असं अजित पवार म्हणाले. "छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. शाहू-फुले-आंबेडकरांनी हाच विचार मांडला आहे. अशा भोंग्याच्या गोष्टी करून विकास होत नाही. विकासाला आपण महत्त्व देऊ या," असंही त्यांनी नमूद केलं.

आम्ही तीनही पक्षांचे लोक वेगवेगळ्या विचारधारेचे असूनही लोकांचे भले करण्यासाठी एकत्र आलो असल्याचंही पवार म्हणाले. या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, दादाभाऊ कळमकर, चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, रयत शिक्षण संस्थेच्या मिनाताई जगधने,  चैताली काळे, सुरेश वाबळे आदी उपस्थित होते.

"पुढील वेळी मताधिक्य वाढलं पाहिजे""आम्ही सात-सात वेळेला लाखा-लाखाने निवडून गेलो. या वेळी आम्हाला कस बस निवडून आणले आहे. मी तर माझ्या एक राऊंडला हजारो मते घेतो. हसन मुश्रीफ ४० हजार, वळसे पाटील ६० हजार तर मी एक लाख २० हजार मताधिक्याने निवडून आलो. ही कामे करताना आम्ही साधू-संत नाही. आम्ही माणसे आहोत. आमच्या विचारांचा तरूण माणूस निवडून दिला, म्हणून ही विकासकामे देतोय. मात्र पुढच्या वेळी मताधिक्या वाढले पाहिजे ही हात जोडून विनंती," असंही ते म्हणाले. अजित पवारांनी करताच उपस्थित काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. हे पाहून अजित पवार म्हणाले, "घोडा मैदान दूर नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत तुम्ही काय करता ते पाहू. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत मी सांगितलेली कामे केली नाहीत तर पाहा पवारांची औलाद नाही. अशी आहे का धमक तुमची, असा दमही अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भरला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र