शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अहमदनगर शहरात राष्ट्रवादी की सेना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:22 IST

नगर शहर विधानसभा मतदासंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगला आहे़ सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नगर शहरावर गतवेळी राष्ट्रवादीने झेंडा रोवला. याहीवेळी जगताप जोरदार तयारीने उतरले आहेत. ते झेंडा कायम ठेवणार की शिवसेनेचे अनिल राठोड परत विधानसभेत पोहोचणार याची उत्सुकता आहे. 

वार्तापत्र - अण्णा नवथर नगर शहर विधानसभा मतदासंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगला आहे़ सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नगर शहरावर गतवेळी राष्ट्रवादीने झेंडा रोवला. याहीवेळी जगताप जोरदार तयारीने उतरले आहेत. ते झेंडा कायम ठेवणार की शिवसेनेचे अनिल राठोड परत विधानसभेत पोहोचणार याची उत्सुकता आहे.  गत विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले़ चौरंगी लढतीत राष्ट्रवादीचे जगताप विजयी झाले़  यावेळी आघाडी व युतीने एकास एक उमेदवार दिले आहेत़ जगताप यांच्या रुपाने राष्ट्रवादीने पुन्हा तरुण चेहरा दिला. सेनेत यावेळी अनेकजण इच्छूक होते. पण, पक्षश्रेष्ठींनी राठोड यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. आमदार जगताप यांनी विकासासाठी ‘वन्स मोअर’, असा नारा दिला आहे़ सेनेचे राठोड हे पुन्हा भयमुक्तीचा नारा देताना दिसतात़ जगताप हे तरुणांची फौज सोबत घेऊन प्रचारात उतरले आहेत़ आयटीपार्क सुरू केल्याने शहरात तरुणांना रोजगार मिळाल्याची भूमिका ते मांडत आहेत. या तरुणांना सोबत घेऊनच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा होम टू होम प्रचारावर भर आहे़ दोन्ही कॉंग्रेसचे नगरसेवकही त्यांच्यासाठी घरोघर जाऊन प्रचार करत आहेत. जाहीर प्रचारापेक्षा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून प्रचार करणे ही जगताप यांची कार्यपद्धती आहे. याहीवेळी त्यांनी ती पद्धत अवलंबली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सेना-भाजपने शहरात मोठी वातावरण निर्मिती केली होती. मात्र, जगताप यांनी एकट्याने मुकाबला करत लक्षवेधी जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांची रणनिती लक्षात येत नाही. सेना-भाजप एकत्रित लढत असल्याने सेनेला मोठ्या आशा आहेत. राठोड यांची भिस्त आपल्या पारंपरिक मतांवर आहे़ त्यांच्याकडेही कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र, सेना-भाजपमध्ये एकवाक्यतेचा अभाव आहे. भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी व त्यांचे समर्थक असलेले नगरसेवक अजूनही प्रचारात सक्रिय नाहीत़ राष्ट्रवादीचे माजी आमदार दादा कळमकर हे आजवर जगताप यांच्या पाठीशी असत़ ते यावेळी प्रचारात दिसत नाहीत़ कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवबंधन बांधले़ राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले किरण काळे वंचित, संतोष वाकळे मनसे, तर एमआयएमकडून नगरसेवक अल्ताफ शेख, भाकपकडून बहिरनाथ वाकळे हे रिंगणात आहेत. बसपाकडून श्रीपाद छिंदमही उमेदवारी करत आहेत. हे उमेदवार कोणाला फटका देणार यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. प्रचारातील मुद्दे एमआयडीसीतील बंद पडलेला आयटीपार्क सुरू करून तरुणांच्या हाताला काम दिले आहे़ यापुढील काळात आयटीपार्कमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा संग्राम जगताप यांच्याकडून केला जात आहे़ आपण निधी आणतो मात्र, सेना कामे बंद पाडण्याचा उद्योग करते, असाही आरोप जगताप हे विविध सभांमधून करत आहेत. गेल्या पाच वर्षांत व्यापारी आणि उद्योगासाठी पोषक वातावरण तयार केले. शहरात एकही जातीय व धार्मिक तंटा झालेला नाही हाही राष्ट्रवादीच्या प्रचाराचा मुद्दा आहे़ केडगाव हत्याकांडात राठोड यांनी कसे राजकारण केले हेही जगताप सभांमधून सांगत आहेत. दहशत मुक्त नगर, गुंडगिरी आणि केडगाव हत्याकांड हे जुने मुद्दे शिवसेना प्रचारात पुन्हा मांडत आहे. शहरात नवीन उद्योग आणू, असेही आश्वासन सेना देत आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019