शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

अहमदनगर मनपा : भाजपच्या सत्तेत कारभाराचा गाडा रुतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 12:55 IST

राज्यातील सत्तेच्या बळावर भाजप स्थानिक नेत्यांनी महापालिकेची सत्ता काबीज केली़ परंतु निधीचा तुटवडा, रखडलेल्या विषय समित्या आणि प्रशासनाची उदासीनता, यामुळे अहमदनगर महापालिकेच्या कारभाराचा गाडा रुतला आहे़

अण्णा नवथरअहमदनगर : राज्यातील सत्तेच्या बळावर भाजप स्थानिक नेत्यांनी महापालिकेची सत्ता काबीज केली़ परंतु निधीचा तुटवडा, रखडलेल्या विषय समित्या आणि प्रशासनाची उदासीनता, यामुळे अहमदनगर महापालिकेच्या कारभाराचा गाडा रुतला आहे़ गजगतीने सुरू असलेल्या कारभाराला गती मिळेल, असे एकही पाऊल सत्ताधारी भाजपाने महिनाभरात उचलले दिसत नाही़ त्यामुळे पुढे कारभाराला गती मिळेल, अशी चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत़लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ आचारसंहिता पुढच्या महिन्यांत लागू होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शासकीय योजनांतील कामांना कार्यारंभ आदेश देण्याची तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुरू आहे़ जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तळ ठोकून आहेत़ कारण आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढील दोन महिने काम करता येणार नाही़ महापालिकेत मात्र थंडा थंडा कुल कुल, असे वातावरण पाहायला मिळत आहेत़ शासकीय निधी आणण्यासाठीही प्रयत्न होताना दिसत नाहीत़ पूर्णवेळ आयुक्त नाही़ त्याचा परिणाम प्रशासकीय कारभारावर होताना दिसत आहे़ अर्थसंकल्प मंजुरीच्या टप्प्यात आहे़ मागील देणी अधिक असल्यामुळे नवीन प्रकल्प प्रस्तावित करणे तर दूरच़ पण नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे़ राज्यात भाजपाची सत्ता आहे़ त्यामुळे निधी मिळेल, अशी अशा होती़ परंतु, सरकारलाही आता निवडणुकीचे वेध लागल्याने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडे लक्ष देण्यास वेळ नाही़ भाजपाचे खासदार दिलीप गांधीही मैदानात उतरल्याने ते महापालिकेत फिरकत नाहीत़ त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी महापालिकेत येत होते़ परंतु त्यांनी महापालिकेकडे पाठ फिरविली आहे़ भाजपाचे इतर पदाधिकारीही फिरकत नसल्याने महापौर एकटे पडल्याची स्थिती आहे़ बैठका घेऊनही काही उपयोग होत नसल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेण्यावर भर दिला आहे़ वास्तविक त्यांच्याकडून सरकार दरबारी पाठपुरावा अपेक्षित आहे़ आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निधी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्याकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही़ सरकारकडे पाठपुरावा नाही आणि स्थानिक पातळीवरील हालचालीही मंदावल्या आहेत़ प्रशासनात यामुळे आनंदीआनंद आहे़ महिना उलटूनही एकही समिती असित्वात येऊ शकलेली नाही़ त्यामुळे कारभाराचा गाडा रुतला आहे़ नवीन समित्या स्थापन करण्यातही पदाधिकाºयांना रस नाही़ नवीन समित्या स्थापन न झाल्याने महापालिकेतील विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण सभापतींची दालने रिकामी आहेत़ या विभागातील कर्मचारी गेल्या महिनाभरापासून पदाधिकाºयांच्या प्रतिक्षेत आहेत़ महापालिकेत सत्ता स्थापन होऊनही अर्थसंकल्प महासभेत सादर करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे़ नुतन नगरसेवकांचीही पहिली सभा असणार आहे़ त्यामुळे त्यांच्याकडून काय शिफारशी केल्या जातात, त्यांचा समावेश अंदाजपत्रकात होणार का प्रशासनाचेच अंदाजपत्रक अंतिम होणार, यावरही पुढील वर्षातील विकास कामांचे भवितव्य अवलंबून आहे़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका