शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अहमदनगर मनपा : भाजपच्या सत्तेत कारभाराचा गाडा रुतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 12:55 IST

राज्यातील सत्तेच्या बळावर भाजप स्थानिक नेत्यांनी महापालिकेची सत्ता काबीज केली़ परंतु निधीचा तुटवडा, रखडलेल्या विषय समित्या आणि प्रशासनाची उदासीनता, यामुळे अहमदनगर महापालिकेच्या कारभाराचा गाडा रुतला आहे़

अण्णा नवथरअहमदनगर : राज्यातील सत्तेच्या बळावर भाजप स्थानिक नेत्यांनी महापालिकेची सत्ता काबीज केली़ परंतु निधीचा तुटवडा, रखडलेल्या विषय समित्या आणि प्रशासनाची उदासीनता, यामुळे अहमदनगर महापालिकेच्या कारभाराचा गाडा रुतला आहे़ गजगतीने सुरू असलेल्या कारभाराला गती मिळेल, असे एकही पाऊल सत्ताधारी भाजपाने महिनाभरात उचलले दिसत नाही़ त्यामुळे पुढे कारभाराला गती मिळेल, अशी चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत़लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ आचारसंहिता पुढच्या महिन्यांत लागू होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शासकीय योजनांतील कामांना कार्यारंभ आदेश देण्याची तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुरू आहे़ जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तळ ठोकून आहेत़ कारण आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढील दोन महिने काम करता येणार नाही़ महापालिकेत मात्र थंडा थंडा कुल कुल, असे वातावरण पाहायला मिळत आहेत़ शासकीय निधी आणण्यासाठीही प्रयत्न होताना दिसत नाहीत़ पूर्णवेळ आयुक्त नाही़ त्याचा परिणाम प्रशासकीय कारभारावर होताना दिसत आहे़ अर्थसंकल्प मंजुरीच्या टप्प्यात आहे़ मागील देणी अधिक असल्यामुळे नवीन प्रकल्प प्रस्तावित करणे तर दूरच़ पण नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे़ राज्यात भाजपाची सत्ता आहे़ त्यामुळे निधी मिळेल, अशी अशा होती़ परंतु, सरकारलाही आता निवडणुकीचे वेध लागल्याने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडे लक्ष देण्यास वेळ नाही़ भाजपाचे खासदार दिलीप गांधीही मैदानात उतरल्याने ते महापालिकेत फिरकत नाहीत़ त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी महापालिकेत येत होते़ परंतु त्यांनी महापालिकेकडे पाठ फिरविली आहे़ भाजपाचे इतर पदाधिकारीही फिरकत नसल्याने महापौर एकटे पडल्याची स्थिती आहे़ बैठका घेऊनही काही उपयोग होत नसल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेण्यावर भर दिला आहे़ वास्तविक त्यांच्याकडून सरकार दरबारी पाठपुरावा अपेक्षित आहे़ आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निधी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्याकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही़ सरकारकडे पाठपुरावा नाही आणि स्थानिक पातळीवरील हालचालीही मंदावल्या आहेत़ प्रशासनात यामुळे आनंदीआनंद आहे़ महिना उलटूनही एकही समिती असित्वात येऊ शकलेली नाही़ त्यामुळे कारभाराचा गाडा रुतला आहे़ नवीन समित्या स्थापन करण्यातही पदाधिकाºयांना रस नाही़ नवीन समित्या स्थापन न झाल्याने महापालिकेतील विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण सभापतींची दालने रिकामी आहेत़ या विभागातील कर्मचारी गेल्या महिनाभरापासून पदाधिकाºयांच्या प्रतिक्षेत आहेत़ महापालिकेत सत्ता स्थापन होऊनही अर्थसंकल्प महासभेत सादर करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे़ नुतन नगरसेवकांचीही पहिली सभा असणार आहे़ त्यामुळे त्यांच्याकडून काय शिफारशी केल्या जातात, त्यांचा समावेश अंदाजपत्रकात होणार का प्रशासनाचेच अंदाजपत्रक अंतिम होणार, यावरही पुढील वर्षातील विकास कामांचे भवितव्य अवलंबून आहे़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका