पुन्हा मतविभागणीच निर्णायक!

By Admin | Updated: June 10, 2014 00:14 IST2014-06-09T23:34:01+5:302014-06-10T00:14:26+5:30

भाऊसाहेब येवले,राहुरी राहुरी मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ राहुरी, पाथर्डी व नगर अशा तीन तालुक्यांचा मिळून झालेल्या

Again, the vote is crucial! | पुन्हा मतविभागणीच निर्णायक!

पुन्हा मतविभागणीच निर्णायक!

भाऊसाहेब येवले,  राहुरी
राहुरी मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ राहुरी, पाथर्डी व नगर अशा तीन तालुक्यांचा मिळून झालेल्या या मतदारसंघात एकमेकांच्या व्होट बँकेबरोबरच मतविभागणी हा मुद्दा निर्णायक ठरणार आहे.
कधीकाळी काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या राहुरी मतदारसंघावर गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजपने वरचष्मा निर्माण केला आहे़ चंद्रशेखर कदम यांनी दोनदा, तर आमदार शिवाजी कर्डिले यांनी येथून एकदा विजयश्री खेचून आणला आहे़ आघाडीच्या जागावाटपात राहुरीची जागा राष्ट्रवादीकडे आहे़ यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्षा डॉ़ उषाताई तनपुरे यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे़ गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी केलेले शिवाजी गाडे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही़ गाडे यांचा सध्या काँग्रेसच्या गोटात वावर आहे. याशिवाय अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांनीही अजून पत्ते उघडलेले नाहीत.
आजघडीला भाजपतर्फे शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीकडून उषाताई तनपुरे अशी सरळ लढत निश्चित मानली जात आहे़ मागील वेळी कर्डिले यांच्या विजयाला कारणीभूत ठरलेले शिवाजी गाडे यावेळी कोणती भूमिका घेतात, यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत. सुभाष पाटील यांनी निर्णय घेतला नसला तरी माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या हालचालींवर त्यांची भूमिका अवलंबून राहील़ उषाताई तनपुरे यांचे नाव जाहीर करावे यासाठी कार्यकर्त्यांमधून दबाव वाढत आहे़ प्राजक्त तनपुरे व प्रसाद तनपुरे यांची नावे मागे पडल्याने उषाताई तनपुरे यांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे़
आमदार कर्डिले यांना गेल्या निवडणुकीत नगर व पाथर्डी तालुक्यांनीे उचलून धरले. राहुरी तालुक्यातून त्यांना फक्त अकरा हजार मतदानावर समाधान मानावे लागले होते़ गेल्या पाच वर्षात कर्डिले यांनी राहुरी तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले़ शिवाय मोदी लाटेचा फायदा त्यांच्यासाठी गृहित धरला जात आहे. राहुरीतून सरळ लढत झाली तर मात्र उषाताई तनपुरे त्यांना जोरदार टक्कर देतील. मात्र उमेदवारांची संख्या वाढली तर ते आमदार कर्डिले यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे कर्डिलेंच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, असा प्रयत्न सुरू झाला आहे़
लोकसभा निवडणुकीत
दिलीप गांधी यांना ४१ हजारांचे मताधिक्य

Web Title: Again, the vote is crucial!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.