शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

फेसबुकनंतर आता ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती;  महिला, मुलींनो काळजी घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:35 IST

संगमनेर : समाजमाध्यमांवर बनावट खाती उघडून त्याद्वारे पैश्यांची मागणी करणे, फसवणूक होणे, महिला, मुलींना अश्लील संदेश पाठविणे अशा अनेक घटना घडल्या आहेत, घडत आहेत. फेसबुकनंतर आता ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती उघडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ट्विटर, इंस्टाग्रामवर खाते असलेल्यांनी विशेष करून महिला व मुलींनी काय काळजी घ्यावी. या संदर्भाने सायबर सुरक्षा तज्ज्ञ, विश्लेषक ओंकार गंधे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद. 

शेखर पानसरे   

प्रश्न : समाजमाध्यमांवर बनावट खाती उघडणा-यांचा हेतू काय असतो?  

गंधे : पूर्वी फेसबुकवर बनावट खाती उघडली जायची. आता ती ट्विटर, इंस्टाग्रामवरही उघडली जात आहेत. बनावट खाती उघडून संबंधित व्यक्तीचे मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांना खोट्या खात्यात जोडले जाते. त्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. काही सॉफ्टवेअरचा वापर करून फोटो, व्हिडिओमध्ये बदल केला जातो. खोट्या खात्यांवर त्या व्यक्तीच्या नावाने अश्लील फोटो, संदेश टाकले जातात. हे फोटो, व्हिडिओ अगदी हुबेहुब वाटतात. त्यामुळे बदनामी होते. वेगवेगळे हेतू ठेवून बनावट खाती उघडली जातात. हे सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

प्रश्न : बनावट खात कसे तयार केले जाते?

गंधे : लॉकडाऊन काळात अनेकांचे ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती उघडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक खातेधारक असेही आहेत की त्यांचे खाते अगदी हुबेहुब तयार केले गेले. त्यावरील फोटो, ट्विट कॉपी करून नवीन खाते त्याच नावाने सुरू करण्यात आले. काही जणांचे ट्विटरवर खातेही नसते. त्यांचे फेसबुकवरील फोटो, पोस्ट कॉपी करत बनावट खाती तयार केली जातात.

प्रश्न : बनावट खाते कसे ओळखता येईल?

गंधे : बनावट खाते ओळण्यासाठी दोनच गोष्टी आहेत. पहिली गोष्टी, यामध्ये खातेधारकाला आपले बनावट खाते उघडल्याचे निर्देशनास आले तर बनावट खाते उघडल्याचे समोर येवू शकते. दुसरी गोष्ट, एकाच व्यक्तीचे दोन खाते असल्याने त्या व्यक्तीचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यात संभ्रम निर्माण होतील. तेव्हा त्यांनी इतर माध्यमांच्याद्वारे त्या व्यक्तीशी संपर्क करावा. समाज माध्यमांवर खाती नसलेल्यांची देखील खोटी खाती ख-या नवाने उघडली जातात. त्यावर व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून चोरलेले फोटो टाकले जातात.

प्रश्न : समाजमाध्यमांवर खाते असलेल्यांनी काय काळजी घ्यावी?

गंधे : सायबर गुन्ह्यात गुन्ह्यांचे स्वरूप बदलते असते. समाजमाध्यमांवरील खात्यावर आपण फोटो किंवा माहिती टाकतो, ती सायबर चोरट्यांकडून चोरली जाते. समाजमाध्यमांवर खाती उडताना आपल्याकडील मोबाईल क्रमांक खात्याला जोडावा. त्यामुळे कुणीही खात्यामध्ये छेडछाड केल्यानंतर तो संदेश आपल्या मोबाईलवर येतो. खोटे खाते उघडलेले असेल तर ते खाते बंद करण्यासाठी आणि आपले खरे खाते टिकून राहण्यासाठी मोबाईल क्रमांकाचा वापर होतो. मात्र, महिला व मुलींनी आपला मोबाईल क्रमांक खात्याला कुणालाही दिसणार असे करता येवू शकते बनावट खात्यासंदर्भाने सायबर पोलिसांशी संपर्क करत तक्रार करावी. हे गरजेचे आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाinterviewमुलाखत