शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

फेसबुकनंतर आता ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती;  महिला, मुलींनो काळजी घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:35 IST

संगमनेर : समाजमाध्यमांवर बनावट खाती उघडून त्याद्वारे पैश्यांची मागणी करणे, फसवणूक होणे, महिला, मुलींना अश्लील संदेश पाठविणे अशा अनेक घटना घडल्या आहेत, घडत आहेत. फेसबुकनंतर आता ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती उघडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ट्विटर, इंस्टाग्रामवर खाते असलेल्यांनी विशेष करून महिला व मुलींनी काय काळजी घ्यावी. या संदर्भाने सायबर सुरक्षा तज्ज्ञ, विश्लेषक ओंकार गंधे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद. 

शेखर पानसरे   

प्रश्न : समाजमाध्यमांवर बनावट खाती उघडणा-यांचा हेतू काय असतो?  

गंधे : पूर्वी फेसबुकवर बनावट खाती उघडली जायची. आता ती ट्विटर, इंस्टाग्रामवरही उघडली जात आहेत. बनावट खाती उघडून संबंधित व्यक्तीचे मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांना खोट्या खात्यात जोडले जाते. त्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. काही सॉफ्टवेअरचा वापर करून फोटो, व्हिडिओमध्ये बदल केला जातो. खोट्या खात्यांवर त्या व्यक्तीच्या नावाने अश्लील फोटो, संदेश टाकले जातात. हे फोटो, व्हिडिओ अगदी हुबेहुब वाटतात. त्यामुळे बदनामी होते. वेगवेगळे हेतू ठेवून बनावट खाती उघडली जातात. हे सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

प्रश्न : बनावट खात कसे तयार केले जाते?

गंधे : लॉकडाऊन काळात अनेकांचे ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती उघडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक खातेधारक असेही आहेत की त्यांचे खाते अगदी हुबेहुब तयार केले गेले. त्यावरील फोटो, ट्विट कॉपी करून नवीन खाते त्याच नावाने सुरू करण्यात आले. काही जणांचे ट्विटरवर खातेही नसते. त्यांचे फेसबुकवरील फोटो, पोस्ट कॉपी करत बनावट खाती तयार केली जातात.

प्रश्न : बनावट खाते कसे ओळखता येईल?

गंधे : बनावट खाते ओळण्यासाठी दोनच गोष्टी आहेत. पहिली गोष्टी, यामध्ये खातेधारकाला आपले बनावट खाते उघडल्याचे निर्देशनास आले तर बनावट खाते उघडल्याचे समोर येवू शकते. दुसरी गोष्ट, एकाच व्यक्तीचे दोन खाते असल्याने त्या व्यक्तीचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यात संभ्रम निर्माण होतील. तेव्हा त्यांनी इतर माध्यमांच्याद्वारे त्या व्यक्तीशी संपर्क करावा. समाज माध्यमांवर खाती नसलेल्यांची देखील खोटी खाती ख-या नवाने उघडली जातात. त्यावर व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून चोरलेले फोटो टाकले जातात.

प्रश्न : समाजमाध्यमांवर खाते असलेल्यांनी काय काळजी घ्यावी?

गंधे : सायबर गुन्ह्यात गुन्ह्यांचे स्वरूप बदलते असते. समाजमाध्यमांवरील खात्यावर आपण फोटो किंवा माहिती टाकतो, ती सायबर चोरट्यांकडून चोरली जाते. समाजमाध्यमांवर खाती उडताना आपल्याकडील मोबाईल क्रमांक खात्याला जोडावा. त्यामुळे कुणीही खात्यामध्ये छेडछाड केल्यानंतर तो संदेश आपल्या मोबाईलवर येतो. खोटे खाते उघडलेले असेल तर ते खाते बंद करण्यासाठी आणि आपले खरे खाते टिकून राहण्यासाठी मोबाईल क्रमांकाचा वापर होतो. मात्र, महिला व मुलींनी आपला मोबाईल क्रमांक खात्याला कुणालाही दिसणार असे करता येवू शकते बनावट खात्यासंदर्भाने सायबर पोलिसांशी संपर्क करत तक्रार करावी. हे गरजेचे आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाinterviewमुलाखत