शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

कोपरगावात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, आ. आशुतोष काळे व विवेक कोल्हे यांच्यासमोरच हमरीतुमरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 22:00 IST

Ahmednagar: पारंपारिक राजकीय विरोधक तरीही  समंजस राजकारणी म्हणून कोपरगावचे काळे- कोल्हे घराणे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु याच काळे- कोल्हेंची तिसरी पिढी स्वातंत्र्यदिनी एकमेकांसमोर दंड थोपटून उभी राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले.

कोपरगाव - पारंपारिक राजकीय विरोधक तरीही  समंजस राजकारणी म्हणून कोपरगावचे काळे- कोल्हे घराणे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु याच काळे- कोल्हेंची तिसरी पिढी स्वातंत्र्यदिनी एकमेकांसमोर दंड थोपटून उभी राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही सत्तेत असले तरीही त्यांचे कार्यकर्ते मंगळवारी एकमेकांवर धावून जात होते. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांचेच नेते आ. आशुतोष काळे व शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे करीत होते. 

कोपरगाव शहराजवळील गवारे नगर ते ड्रीम सिटी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन स्वातंत्र्यदिनी करण्याचे नियोजन काळे-कोल्हे या दोन्ही राजकीय नेत्यांनी करण्याचे ठरविले. विशेष रस्ते अनुदान निधीतून या रस्त्याचे काम केले जाणार आहे. कोल्हे गटाचे म्हणणे होते की, हे काम माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले आहे. तर विद्यमान आमदार अशितोष काळे यांच्या कार्यकर्त्यांचा काळे यांनीच त्या कामासाठी निधी मंजूर करून आणला असा दावा होता. 

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी एक फलक लावला. त्यावर उद्घाटक म्हणून स्थानिक ज्येष्ठ नागरिक असा मजकूर होता. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या फलकासमोरच आमदार अशितोष काळे भूमिपूजन करणार असल्याचा फलक लावला. रस्त्याचे भूमिपूजन काळे यांच्या हस्ते झालेही. त्याच वेळी भाजपचे कार्यकर्ते भूमिपूजन स्थळी पोहोचले. त्यांनी आपल्या पक्षाचा फलक झाकल्या जात असल्याचा आरोप करीत त्या ठिकाणी गोंधळ घातला. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांवर धावून जात होते. काही काही वेळातच आशुतोष काळे व विवेक कोल्हे घटनास्थळी पोहोचले. नेते आल्यानंतर कार्यकर्त्यांना स्फुरण चढले. प्रचंड घोषणाबाजी, एकमेकांविरुद्ध आरोप- प्रत्यारोप होत राहिले. उत्साही कार्यकर्ते आपापल्या नेत्याला खांद्यावर उचलून घेत त्यांचा जयघोष करीत होते, तर काही एकमेकांवर आरोप करीत राहिले.

घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे फौज फाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगविण्याचाही प्रयत्न केला परंतु, राज्याच्या सत्तेतच असलेल्या दोन्ही दिग्गज नेत्यांना तणावाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका अशी म्हणण्याची हिंमत कोणातही झाली नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतच गेला. हमरीतुमची, एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल होत राहीली. तीन तास परिसरातील वातावरण तणावपूर्ण होत राहीले. घटनास्थळ कोण सोडेल त्याची माघार, असा समज नेत्यांनीही करून घेतला. दोघेही जागचे हटेनात. शेवटी प्रशासनाने दोघांनाही विनंती केली, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी घटनास्थळ सोडले.

दोन्ही फलक काढले आमदार आशुतोष काळे व व विवेक कोल्हे घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दोन्ही फलक काढून घेण्याचे सुचित केले. काही वेळातच दोन्ही फलक कर्मचाऱ्यांनी काढून घेतले.

मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा कोपरगाव शहरातील तणावपूर्व परिस्थितीला मुख्याधिकारी शांताराम गोसावी हेच जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली. स्वातंत्र्यदिनी कुठलाही कार्यक्रम घेण्याचे निर्देश नसतानाही भूमिपूजन समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. आम्ही लावलेला फलक झाकून त्यासमोरच विरोधकांचा फलक लावण्यात आला. गोसावी हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची भूमिका निभावीत आहेत. शहरातील अनाधिकृत होर्डिंग्सला त्यांचेच अभय आहे. त्यांच्यावरच शांतताभंगाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस