शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

७० पालिकांना कारणे दाखवा

By admin | Updated: September 5, 2014 23:48 IST

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर नागरी भागातील अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामांना निर्बंध व आळा घालण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे.

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरनागरी भागातील अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामांना निर्बंध व आळा घालण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीस आवश्यक माहिती पुरविण्यास टाळाटाळ केल्याने महाराष्ट्रातील ७० महानगरपालिका व नगरपालिकांना एकाचवेळी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूरसह इतर पालिकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहे. राज्यातील नागरी क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत बांधकामास प्रतिबंध करणे व त्याविरूद्ध प्रभावी कार्यवाही करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय सनियंत्रण समिती ३ वर्षांपूर्वी गठीत करण्यात आली होती. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे ही एक चिंतेची बाब आहे. या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी व हटविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत सखोल निर्देश सरकारने दिले होते. त्यानंतरदेखील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांच्याविरूद्ध प्रभावीपणे कार्यवाही होत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका यांच्या स्तरावरुन अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे यांच्याविरूद्ध होणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेणे व त्या प्रक्रियेचे सनियंत्रण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय सनियंत्रण समिती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. या समितीत गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव तसेच नगरविकास, महसूल, वने विभागांचे प्रधान सचिव, पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, नगरपालिका प्रशासनाचे संचालक, राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त यांचा समावेश होता. तर नगरविकासचे प्रधान सचिव सदस्य सचिव होते. या समितीनंतर राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती स्थापन केली आहे. या समितीने राज्यभरातील नगरपालिका व महानगरपालिकांकडून त्यांच्या हद्दीतील अतिक्रमणांबाबत माहिती मागविली होती. वारंवार माहिती मागवूनही ती न दिल्याने नगरपालिका प्रशासनाचे उपसंचालक अनिल मुळे यांनी ७० नगरपालिका व महानगरपालिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. श्रीरामपूर नगरपालिकेने कारणे दाखवा नोटिसीला उत्तर दिल्याचे समजते.