शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शेतकऱ्यांच्या खात्यांवर ६३७ कोटी जमा; पिकांच्‍या नुकसानीपोटी साडेसहा लाख शेतकऱ्यांना मदत, विखेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 15:37 IST

Radhakrishna Vikhe Patil : मार्च २०२३ मध्‍ये अवेळी पावसामुळे जिल्‍ह्यात ११ हजार ७९३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.

शिर्डी : जिल्‍ह्यात २०२२-२०२३ मध्ये झालेली अतिवृष्‍टी, सततचा पाऊस, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्‍या पिकांच्‍या नुकसानीपोटी सहा लाख ५६ हजार ९५९ शेतकऱ्यांना सुमारे ६३७ कोटी ७८ लाख रुपयांचे मंजूर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

सप्‍टेंबर, ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टीत सुमारे दोन लाख ५५ हजार ६८ शेतकऱ्यांच्‍या पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी २९१ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले. याच दरम्‍यान अतिवृष्‍टीच्‍या निकषाबाहेरील सततच्‍या पावसामुळे पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीची भरपाई म्‍हणून दोन लाख ९२ हजार ७५० शेतऱ्यांना विशेष बाब म्‍हणून २४१ कोटी रुपयांची मदत देण्यात आली, असे राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले.

मार्च २०२३ मध्‍ये अवेळी पावसामुळे जिल्‍ह्यात ११ हजार ७९३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दहा कोटी ४१ लाख ४७ हजार ५८३ शेतकऱ्यांना एप्रिल २०२३ मध्‍ये झालेल्‍या अवकाळी पावसाच्‍या नुकसानीची मदत म्‍हणून ४६ कोटी ९३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्‍यात आली आहे. ऑक्‍टोबर, नोव्‍हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत शेती पिकांच्‍या नुकसानीची भरपाई देखील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिली असून, जिल्‍ह्यातील २७ हजार ५३० शेतकऱ्यांना १९ कोटी ५५ लाख रुपयांची मदत देण्‍यात आल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

नोव्‍हेंबर २०२३ मध्‍ये झालेल्‍या वादळी वारे आणि गारपिटीतील पिकांच्‍या नुकसानीकरिता २१ हजार ६८३ शेतकऱ्यांना २८ कोटी ३७ लाख, जून २०२३ मध्‍ये वादळी वारे व गारपिटीमुळे झालेल्‍या नुकसानीसाठी ४६० शेतकऱ्यांना ४५ लाख आणि सप्‍टेंबर २०२३ मध्‍ये अतिवृष्‍टी व पुरामुळे पिके व शेतजमिनीच्‍या नुकसानीपोटी ९२ शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असल्‍याकडे लक्ष वेधून, आतापर्यंत नैसर्गिक नुकसान झालेल्‍या शेतकऱ्यांच्‍या पाठीशी महायुती सरकार भक्‍कमपणे उभे असून, जिल्‍ह्याला आतापर्यंत ६३७ कोटी ७८ लाख रुपयांची मदत देण्यात आली.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलFarmerशेतकरी