१ लाख ४५ हजार विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:23+5:302021-04-09T04:21:23+5:30
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न होता या विद्यार्थ्यांना पुढील ...

१ लाख ४५ हजार विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न होता या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय मागील आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. त्यानंतर बुधवारी पुन्हा नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही शिक्षण मंत्र्यांनी हाच निर्णय कायम ठेवला. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न होता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले. नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीचे सुमारे सव्वा सहा लाख विद्यार्थी आहेत. त्याप्रमाणे नववीचे ८१ हजार २०० व अकरावीचे ६३ हजार ८२२ असे एकूण १ लाख ४५ हजार विद्यार्थी संख्या मागील वर्षीच्या पटसंख्यानुसार आहे. या सर्वांना आता परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.
आता केवळ दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत ठोस निर्णय झालेला नाही. तोही लवकरच होईल. दहावी बारावीची परीक्षा ऑफलाइन होणार आहे. परंतु तरीही सध्याच्या वेळापत्रकात बदल होणार की आणखी काही वेगळा पर्याय समोर येणार याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
----------------
नववी व अकरावीचे तालुकानिहाय विद्यार्थी
तालुका नववी अकरावी
अकोले ५०५६. ३७१८
जामखेड २५४४. २९०४
कर्जत ३७९६. ३३०७
कोपरगाव ६४१४. ४६१९
महापालिका ६८९२. ७७०२
नगर ५८५३. २८४४
नेवासा ६८८४. ४०९३
पारनेर ४५३८. ३२२१
पाथर्डी ४६४५. ५४४५
राहाता ६२३९. ५०९८
राहुरी ५२१५. २८७३
संगमनेर ८६४०. ६५८४
शेवगाव ४४९१. ४४४०
श्रीगोंदा ४६७६. ३४४४
श्रीरामपूर ५३२७. ३५३०
----------------------------------------
एकूण ८१२००. ६३८२२