शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

योगक्षेमं वहाम्यहम्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:02 IST

एक राजा आपल्या दरबारातील पंडितांकडून गीता समजावून घेत होता. त्याला गीतेतील भगवंताचा उपदेश ऐकताना खूप आनंद होत होता.

- रमेश सप्रे

एक राजा आपल्या दरबारातील पंडितांकडून गीता समजावून घेत होता. त्याला गीतेतील भगवंताचा उपदेश ऐकताना खूप आनंद होत होता. नवव्या अध्यायातील बाविसाव्या श्लोकाच्या एका चरणाचा अर्थ त्याला समजला नाही. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ म्हणजे काय असं त्यानं विचारल्यामुळे पंडितजींनी निरनिराळे अर्थ सांगून पाहिले, पण त्याला ते पटले नाहीत. उलट पंडितांच्या अज्ञानाचा त्याला राग आला. तो म्हणाला, उद्या जर माझं समाधान होईल असा अर्थ तुम्ही सांगू शकला नाहीत तर तुम्हाला जन्मभर बंदिवासात ठेवलं जाईल. 

हे ऐकून पंडितजींना झोप लागली नाही. कारण त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर एकुलत्या एक असलेल्या मुलीचे तेच मातापिता दोन्ही होते. आपण जर बंदीवासात पडलो तर या दहा वर्षाच्या कोवळ्या मुलीचं कसं होणार? हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता. मुलीला मध्यरात्रीनंतर सहज जाग आली अन् बघतेय तर काय? बाबा झोपेविना तळमळत आहेत. डोळ्यातून अश्रूही वाहताहेत. तिनं विचारलं, बाबा, कसलं दु:ख होतंय तुम्हाला? यावर तिला जवळ घेत बाबांनी सर्व घटना सांगितली आणि म्हटलं, ‘माझ्यानंतर तुझ्याकडे कोण पाहणार? योगक्षेमं वहाम्यहम्’चा अर्थ बाबांना का सांगता येत नाही हे त्या हुशार मुलीच्या लक्षात आलं, ती म्हणाली बाबा, उद्या मला दरबारात न्या. मी सांगते राजाला योग्य तो अर्थ. 

दुसरे दिवशी ती चिमुरडी दरबारात आली. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’चा अर्थ तिनं बाबांकडून समजावून घेतला होता. राजा दरबारात आल्यावर ती राजाला उद्देशून म्हणाली, ‘राजा तुझं समाधान होईल असा त्या ोकाचा अर्थ मी तुला सांगते पण त्यासाठी मी सांगेन तशी कृती करावी लागेल. राजानं होकार देताच तिनं सेवकांना दोन मोठे दोर आणायला सांगितले. दरबारात समोरासमोर जे खांब होते त्यापैकी एकाला आपल्या वडिलांना बांधून घालायला सांगितले तर दुस-या समोरच्या खांबाला राजाला बांधायला सांगितलं. राजाच्या संमतीनं सेवकांनी तसं केल्यावर तिनं त्या दोघांना सांगितलं, ‘राजा तुझी सत्ता नि बाबा तुम्ही तुमचं ज्ञान वापरून एकमेकांना मुक्त करा. दोघांनीही एकदमच म्हटलं, मी स्वत: बांधलेलो असताना दुस-याला कसा सोडवू शकेन?

यावर शांतपणे ती चिमुरडी म्हणाली, हेच तर खरं उत्तर आहे. आपण बंदिवासात गेल्यावर मुलीचं म्हणजे माझं कसं होणार या चिंतेने बाबा बांधले गेले होते, तळमळत होते, काळजी घेणारा भगवंत आहे. स्वत: त्यानं हे सांगितलंय. माझं सतत स्मरण-चिंतन करा, तुमच्या प्रपंचाचा भार मी वाहीन. हे बाबांना कळलंच नाही. स्वत:ला न कळलेला विचार आपण दुस-याला कसा पटवून देणार?

तिच्या त्या स्पष्टीकरणानं राजाचं समाधान झालं. तिच्या वडिलांनाही धन्य वाटलं. सा-या उपस्थितांनी मुलीच्या चातुर्याचं कौतुक केलं. राजानं तिचा सारा भार स्वत: उचलण्याचं वचनही दिलं. आनंदाचं तत्त्व तेच आहे दुस-याला आनंदी ठेवायचं असेल तर स्वत: आनंदी नको का राहायला? दुस-याला चिंतामुक्त करायचं तर स्वत: निश्चिंत व्हायला नको का? हल्ली आपण फक्त संदेश पाठवतो हॅपी होली, हॅपी दिवाली, हॅपी ख्रिसमस पण केवळ शाब्दिक संदेश पाठवून कसं दुस-याला आनंदी बनवू शकू? संक्रांतीला आपण तिळगूळ देऊन काय म्हणतो? तिळगूळ घ्या, गोड बोला म्हणजे प्रत्येकजण दुस:याला गोड बोला असं सांगतो. स्वत: गोड बोलण्याचा विचारही तो करत नाही. या ऐवजी असं जर म्हटलं, तिळगूळ घ्या, मी गोड बोलेन, तर त्याला काहीतरी अर्थ आहे. एकाप्रकारची बांधिलकी आपण स्वत:वर लादून घेतोय. ती निभावली तर खरंच सर्वत्र मधुर वातावरण नि स्नेहल संबंध निर्माण होतील. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, काळजीमुक्त, तणावमुक्त नि आनंदयुक्त जगण्याची पहिली जबाबदारी माझी आहे. मग माझ्या चालण्याबोलण्या-वागण्यातून इतरांना आपोआप आनंदी राहण्याची प्रेरणा मिळेल. स्वत: घालून दिलेला आदर्श शंभर व्याख्यानं प्रवचनांपेक्षा महत्त्वाचा असतो. 

‘योगक्षेमं वहाम्यहम्’ मी तुमचा योगक्षेम (उदरनिर्वाह) चालवीन असं आश्वासन देण्यापूर्वी भगवंतानं काही गोष्टी आवर्जून सांगितल्या आहेत. अनन्यभावानं परमेश्वराचं चिंतन करायचं, सर्व कर्म ही माझीच पूजा आहे अशा पूज्य भावनेनं करायची आणि सतत माझ्याशी जोडलेलं राहायचं. माझं म्हणजे भगवंताचं विस्मरण क्षणभरही होऊ द्यायचं नाही. एवढं जरी जमलं की दुस-या कशाची चिंता करण्याची आवश्यकताच नाही. भगवंतांचं स्मरण म्हणजे केवळ भगवंताचं नाम सतत घेणं असं नव्हे. तर हे सारं विश्व चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे. तिचा प्रभाव माझ्या जीवनावर पडलेला आहे याचं सतत भान ठेवायचं. चिंता आणि आनंद, ताण आणि आनंद, भय आणि आनंद एकत्र असूच शकत नाहीत. हेच तर खरं आनंदाचं प्राणसूत्र आहे. 

टॅग्स :Yogaयोग