शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

योगक्षेमं वहाम्यहम्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:02 IST

एक राजा आपल्या दरबारातील पंडितांकडून गीता समजावून घेत होता. त्याला गीतेतील भगवंताचा उपदेश ऐकताना खूप आनंद होत होता.

- रमेश सप्रे

एक राजा आपल्या दरबारातील पंडितांकडून गीता समजावून घेत होता. त्याला गीतेतील भगवंताचा उपदेश ऐकताना खूप आनंद होत होता. नवव्या अध्यायातील बाविसाव्या श्लोकाच्या एका चरणाचा अर्थ त्याला समजला नाही. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ म्हणजे काय असं त्यानं विचारल्यामुळे पंडितजींनी निरनिराळे अर्थ सांगून पाहिले, पण त्याला ते पटले नाहीत. उलट पंडितांच्या अज्ञानाचा त्याला राग आला. तो म्हणाला, उद्या जर माझं समाधान होईल असा अर्थ तुम्ही सांगू शकला नाहीत तर तुम्हाला जन्मभर बंदिवासात ठेवलं जाईल. 

हे ऐकून पंडितजींना झोप लागली नाही. कारण त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर एकुलत्या एक असलेल्या मुलीचे तेच मातापिता दोन्ही होते. आपण जर बंदीवासात पडलो तर या दहा वर्षाच्या कोवळ्या मुलीचं कसं होणार? हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता. मुलीला मध्यरात्रीनंतर सहज जाग आली अन् बघतेय तर काय? बाबा झोपेविना तळमळत आहेत. डोळ्यातून अश्रूही वाहताहेत. तिनं विचारलं, बाबा, कसलं दु:ख होतंय तुम्हाला? यावर तिला जवळ घेत बाबांनी सर्व घटना सांगितली आणि म्हटलं, ‘माझ्यानंतर तुझ्याकडे कोण पाहणार? योगक्षेमं वहाम्यहम्’चा अर्थ बाबांना का सांगता येत नाही हे त्या हुशार मुलीच्या लक्षात आलं, ती म्हणाली बाबा, उद्या मला दरबारात न्या. मी सांगते राजाला योग्य तो अर्थ. 

दुसरे दिवशी ती चिमुरडी दरबारात आली. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’चा अर्थ तिनं बाबांकडून समजावून घेतला होता. राजा दरबारात आल्यावर ती राजाला उद्देशून म्हणाली, ‘राजा तुझं समाधान होईल असा त्या ोकाचा अर्थ मी तुला सांगते पण त्यासाठी मी सांगेन तशी कृती करावी लागेल. राजानं होकार देताच तिनं सेवकांना दोन मोठे दोर आणायला सांगितले. दरबारात समोरासमोर जे खांब होते त्यापैकी एकाला आपल्या वडिलांना बांधून घालायला सांगितले तर दुस-या समोरच्या खांबाला राजाला बांधायला सांगितलं. राजाच्या संमतीनं सेवकांनी तसं केल्यावर तिनं त्या दोघांना सांगितलं, ‘राजा तुझी सत्ता नि बाबा तुम्ही तुमचं ज्ञान वापरून एकमेकांना मुक्त करा. दोघांनीही एकदमच म्हटलं, मी स्वत: बांधलेलो असताना दुस-याला कसा सोडवू शकेन?

यावर शांतपणे ती चिमुरडी म्हणाली, हेच तर खरं उत्तर आहे. आपण बंदिवासात गेल्यावर मुलीचं म्हणजे माझं कसं होणार या चिंतेने बाबा बांधले गेले होते, तळमळत होते, काळजी घेणारा भगवंत आहे. स्वत: त्यानं हे सांगितलंय. माझं सतत स्मरण-चिंतन करा, तुमच्या प्रपंचाचा भार मी वाहीन. हे बाबांना कळलंच नाही. स्वत:ला न कळलेला विचार आपण दुस-याला कसा पटवून देणार?

तिच्या त्या स्पष्टीकरणानं राजाचं समाधान झालं. तिच्या वडिलांनाही धन्य वाटलं. सा-या उपस्थितांनी मुलीच्या चातुर्याचं कौतुक केलं. राजानं तिचा सारा भार स्वत: उचलण्याचं वचनही दिलं. आनंदाचं तत्त्व तेच आहे दुस-याला आनंदी ठेवायचं असेल तर स्वत: आनंदी नको का राहायला? दुस-याला चिंतामुक्त करायचं तर स्वत: निश्चिंत व्हायला नको का? हल्ली आपण फक्त संदेश पाठवतो हॅपी होली, हॅपी दिवाली, हॅपी ख्रिसमस पण केवळ शाब्दिक संदेश पाठवून कसं दुस-याला आनंदी बनवू शकू? संक्रांतीला आपण तिळगूळ देऊन काय म्हणतो? तिळगूळ घ्या, गोड बोला म्हणजे प्रत्येकजण दुस:याला गोड बोला असं सांगतो. स्वत: गोड बोलण्याचा विचारही तो करत नाही. या ऐवजी असं जर म्हटलं, तिळगूळ घ्या, मी गोड बोलेन, तर त्याला काहीतरी अर्थ आहे. एकाप्रकारची बांधिलकी आपण स्वत:वर लादून घेतोय. ती निभावली तर खरंच सर्वत्र मधुर वातावरण नि स्नेहल संबंध निर्माण होतील. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, काळजीमुक्त, तणावमुक्त नि आनंदयुक्त जगण्याची पहिली जबाबदारी माझी आहे. मग माझ्या चालण्याबोलण्या-वागण्यातून इतरांना आपोआप आनंदी राहण्याची प्रेरणा मिळेल. स्वत: घालून दिलेला आदर्श शंभर व्याख्यानं प्रवचनांपेक्षा महत्त्वाचा असतो. 

‘योगक्षेमं वहाम्यहम्’ मी तुमचा योगक्षेम (उदरनिर्वाह) चालवीन असं आश्वासन देण्यापूर्वी भगवंतानं काही गोष्टी आवर्जून सांगितल्या आहेत. अनन्यभावानं परमेश्वराचं चिंतन करायचं, सर्व कर्म ही माझीच पूजा आहे अशा पूज्य भावनेनं करायची आणि सतत माझ्याशी जोडलेलं राहायचं. माझं म्हणजे भगवंताचं विस्मरण क्षणभरही होऊ द्यायचं नाही. एवढं जरी जमलं की दुस-या कशाची चिंता करण्याची आवश्यकताच नाही. भगवंतांचं स्मरण म्हणजे केवळ भगवंताचं नाम सतत घेणं असं नव्हे. तर हे सारं विश्व चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे. तिचा प्रभाव माझ्या जीवनावर पडलेला आहे याचं सतत भान ठेवायचं. चिंता आणि आनंद, ताण आणि आनंद, भय आणि आनंद एकत्र असूच शकत नाहीत. हेच तर खरं आनंदाचं प्राणसूत्र आहे. 

टॅग्स :Yogaयोग