शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मनामध्ये दुर्बल विचार येणे म्हणजेच मन भरकटणे होय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 1:49 PM

मन शिथिल बनते म्हणजेच मन भरकटले जाते. जेव्हा मन उत्कृष्ट विचार करू लागते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात उत्साहवर्धक भावना निर्माण होतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमनामध्ये दुर्बल विचार येणे म्हणजेच मन भरकटणे होय. मनामध्ये प्रबळता, उत्साह यांचा प्रवेश होणे म्हणजेच मनाचे येणे होय. मनाचे येणे आणि जाणे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मनामध्ये वाईट विचार आले, मनामध्ये हित भावना निर्माण झाली की मन मोहित होते. मन शिथिल बनते म्हणजेच मन भरकटले जाते. जेव्हा मन उत्कृष्ट विचार करू लागते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात उत्साहवर्धक भावना निर्माण होतात.ज्यावेळी अर्जुनाचे मन त्याच्यासोबत होते, त्यावेळी त्या मनाची साथ त्याला होती. तो युद्धाला तयार झाला होता. रणांगणावर शूरवीरपणाने युद्धास सज्ज झाला होता. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून विजयाचे स्वप्न पाहू लागला; पण जेव्हा अर्जुनाची मनाने साथ सोडली तेव्हा तो कर्तृत्वहीन झाला. तो युद्ध करायला नकार देऊ लागला. त्याचे तोंड सुकले, गांडीव धनुष्य हातून निसटले. तो स्थिर नव्हता. मनाने साथ सोडली तशी अर्जुनाची अवस्था बिकट झाली. जेव्हा मन साथ सोडते त्यावेळेस कर्तृत्व, क्षमता, आत्मबल या सर्वांचा कोप होतो; पण मनाची साथ असली की साधना, आत्मबल, क्षमता, धैर्य यांच्यात प्राप्ती होते. आपलं चांगलं व्हावं, चांगल्या गोष्टी मिळाव्यात यासाठी मनाच्या प्रसन्नतेची फार गरज आहे.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक