शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

देवीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 3:37 AM

भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनात शारदीय नवरात्रौत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रौत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा विजयोत्सव भारताच्या सर्वच प्रांतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

- डॉ. रामचंद्र देखणे

भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनात शारदीय नवरात्रौत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रौत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा विजयोत्सव भारताच्या सर्वच प्रांतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लौकिक आणि पारलौकिक, व्यवहारिक आणि आध्यात्मिक, व्यक्तिगत आणि सामूहिक, धार्मिक आणि सामाजिक, तर भावनिक आणि सांस्कृतिक अशा विविधांगाने या उत्सवाचे स्वरूप आणि त्यामागे उभे असलेले रूपक समजावून घेणे आवश्यक ठरते. असुरी शक्तिंविरुद्ध दैवी शक्ती जेव्हा-जेव्हा युद्ध करते, तेव्हा त्याचे प्रतीक आणि स्मरण म्हणून नवरात्र साजरे केले जाते. आदिशक्ती भगवती, दुर्गा, भवानी हीच शारदीय नवरात्रौत्सवाची उपास्य देवता आहे. ती देवी विविध रूपांनी नटली आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशात तिची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. महाराष्ट्रात ती जगदंबा किंवा भवानी नावाने प्रसिद्ध आहे. बंगालमध्ये हीच देवी दुर्गेचे रूप धारण करते. कर्नाटकात रेणुका किंवा यल्लमा तर म्हैसूर प्रांतात चामुंडादेवी या नावाने ती प्रसिद्ध आहे. राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात देवी नानाविध रूपांनी पुजली जाते. तिची उपासना केली जाते. भक्ती आणि त्यातून शक्तीचा प्रत्यय भाविक घेत असतात. यातून राष्ट्रीय एकात्मताही साधली जाते. देशभरातील भाविक वेगवेगळ्या देवींची आराधना करतात आणि दर्शनाच्या निमित्ताने त्यांची एकात्मताही वाढते. देवीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा भवानी ही तिची सौम्य रूपे तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही तिची उग्र रूपे आहेत. याशिवाय भद्रकाली, महामारी, रक्तदंतिका ही तिची महारौद्र रूपे आहेत. चराचरात शक्तिरूपाने तीच उभी आहे. वैकुंठात महालक्ष्मी, गोलोकात राधिका, शिवलोकात पार्वती, ब्रह्मलोकात सरस्वती रूपाने तीच नटली आहे. तीच वेदमाता, सावित्री आहे. तीच जनककन्या सीता आहे. तीच भीष्मकन्या रुक्मिणी आहे आणि वृषभानुसुता राधाही तीच आहे. तीच विश्वाची शास्ती आहे. बाह्यत: ती आनितेजाने झळकणारी असून, अंतरी सानतेजाने प्रकाशणारी आहे. दैवी रूपात ती असुरांचा तर आध्यात्मिक रूपात ती अज्ञानाचा नाश करते. महाकाली हे तिचे शरीरबल आहे. महालक्ष्मी हे संपत्तीबल तर महासरस्वती हे ज्ञानबल आहे. सर्व सामर्थ्याने उभी राहिलेली तीच राष्ट्राची महान शक्ती आहे. या शक्तीचे पूजन करण्यासाठी नवरात्रौत्सव आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री