शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 6:21 PM

तुकाराम महाराज भवसिंधू तरुन जाण्यासाठी फक्त विचाराचेच साधन सांगतात

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली त्यामध्ये जारज, स्वेदज, अंडज व उद्भिज अशा प्रकारच्या चार खाणी निर्माण केल्या. त्यांपैकी जारज खाणीतून मनुष्य निर्माण केला. मनुष्याला बुद्धी व ज्ञान असल्याने तो दुःख निवृत्ती करु शकतो व याच ज्ञानाने परमानंद सुखाची प्राप्तीही करुन घेऊ शकतो पण ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठी काय करायला हवे..? तर, तुकोबांनी उपाय सांगितला आहे. महाराज म्हणतात -

क्षणोक्षणा हाचि करावा विचार ।तरावया पार भवसिंधू ॥

हा देह अत्यंत क्षणभंगूर असल्याने जो विचार करणार आहात तो क्षणोक्षणी करा, दिरंगाई नको. भवसिंधू तरुन जाण्याचा उपाय सोपा असला तरी हा उपाय क्षणोक्षणी करावा लागेल. कारण महाराज म्हणतात -

अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ॥

ज्या कर्माचे जसे संस्कार असतील तशीच बुद्धी होते.शास्त्रकार म्हणतात -

बुद्धि: कर्मानुसारिणी ।

आपण म्हणाल, वेदशास्त्राने एवढी साधने सांगितली असतांना नुसत्या विचाराने काय होणार..? वेद शास्त्राने भवसिंधू तरुन जाण्यास योग, याग, तप, जप, इ. अनेक साधनें सांगितली मात्र तुकाराम महाराज या ठिकाणी भवसिंधू तरुन जाण्यासाठी फक्त विचाराचेच साधन सांगतात हे कसे..?आज कलियुगाचा विचार करता, तुकाराम महाराज म्हणतात -

अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कलि न घडे साधन ॥उचित विधी विधान । न कळे न घडे सर्वथा ॥

ही सर्व साधनें फारच अवघड आहेत. सध्याच्या काळात या शास्त्रातील कर्मे यथासांग घडणें खूप कठिण काम आहे. आणि जर कर्म यथासांग घडले नाही तर संत म्हणतात -

कर्म धर्म न होती सांग । उण्या अंगे पतन ॥

ही सर्व साधनें भवसिंधूत ढकलणारी आहेत. एकमेव विचार हीच साधना भवसिंधुतून निवृत्त करणारी आहे..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा दूरभाष क्रमांक ९४२१३४४९६० ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक