शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

हे स्पर्शाचे गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:04 IST

स्पर्श ही मानवी जीवनाला लाभलेली इंद्रिय सुखाच्या पलीकडची एक महान शक्ती आहे.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेस्पर्श ही मानवी जीवनाला लाभलेली इंद्रिय सुखाच्या पलीकडची एक महान शक्ती आहे. यात्रेत हरवलेल्या बालकाने चुकून आईचे बोट सोडून द्यावे आणि हुरूऽऽ हुरूऽऽ नजरेने मातेचा शोध घ्यावा व ती आता भेटत नाही, म्हणून हंबरडा फोडावा. अशात आईने धावत येऊन बालकाला आपल्या हृदयासी कवटाळावे आणि रडणाऱ्या बालकाने आईच्या उबदार स्पर्शाने तिच्या कुशीत झोपी जावे. अशा वेळी वाटते, खरंच पंडिताच्या हजारो प्रवचनांपेक्षा आणि गुरू मंडळींच्या गुरुलीलेपेक्षा अक्षरांचे राजवाडे स्वप्नात न पाहिलेल्या आईचा स्पर्श किती महान आहे. ज्याला कुठल्याच शब्दकोशाच्या चिमटीत पकडता येत नाही, असा नि:शब्द भावनेचा राजमार्ग म्हणजे स्पर्श. कधी तो लाजाळूच्या वेलीसारखा आपल्या रुजुत्वाला प्रकट करतो, तर कधी अंगणात पडणाºया प्राजक्ताच्या सड्याप्रमाणे तनामनाला सुगंधित करतो. संतांना जेव्हा आपल्या आराध्याचा स्पर्श सुखाची तळमळ लागली, तेव्हा जनाईसारखी पारमार्थिक विद्युलता म्हणू लागते -देव खाते देव पिते, देवावरी मी निजते ।देव देते-देव होते, देवा सवे व्यवहारितेदेव तेथे-देव तेथे, देवावीन नाही रिते ।जनी म्हणजे विठाबाई, भरुनी उरले आंतर बाही ॥वर-वर थोडेसे स्वैर व स्वच्छंद वाटणारे जनाबाईचे हे शब्द तिचा पारमार्थिक अधिकार तर सिद्ध करतातच, पण स्पर्श नावाच्या आंतरिक शक्तीने ईश्वराशी थेट नाते जोडता येते, याचाही अनुभव देते. या स्पर्शशक्तीनेच नास्तिक नरेंद्र आस्तिकतेचे महामेरू व भारतीय संस्कृतीची त्यागमय पताका जगाच्या वेशीवर फडकविणारे स्वामी विवेकानंद यांच्या रूपाने विख्यात झाले. जर राधाकृष्णाच्या स्पर्शाने विवेकानंदांचे अंतरंग उजळून निघाले नसते, तर कदाचित भारत वर्षास बुद्धिमान नरेंद्र भेटला असता; परंतु संस्कृती पुत्र विवेकानंद भेटले नसते. हीच स्पर्श नावाची शक्ती जेव्हा विषयामध्ये परावर्तित होते, तेव्हा मात्र तनामनात वासना विकाराच्या नागिणी सळसळू लागतात. केवळ एका स्पर्श सुखासाठी माणसासकट वस्त्या जाळल्या जातात. स्त्री देहाकडे माता, देवी, भगिनी, भवानी, आदिशक्ती म्हणून पाहण्याचे दिवस इतिहासजमा होतात आणि तिला फक्त स्पर्शसुख देणारी एक वस्तू मानले जाऊ लागते. तेव्हा स्पर्श नावाचा विषय जीवनातील शिवत्वालाच ‘खो’ घालण्याचे काम करतो. प्राणीसृष्टीत कधी-कधी गुरा-पाखरांनासुद्धा माता भगिनींचा स्पर्श कळतो आणि वात्सल्याचे झरे झुळझुळ वाहू लागतात, पण हेच जेव्हा माणसाला कळेनासे होते, तेव्हा त्याच्या लेखी स्पर्श हा सतत वासनेचा वणवा शांत करणारा उपचार ठरतो. म्हणूनच आपल्या साधू-संतांनी विशिष्ट अवस्थेनंतर स्पर्शाचा जाणीवपूर्वक त्याग केला. केवळ वासनात्मक स्पर्शाचाच नव्हे, तर उच्च-उच्च आसने, मोठमोठ्या गाद्या, गिरद्या, छत्र चामरे, शिष्यांकडून करून घेतली जाणारी शारीरिक सेवा जसे हातपाय चेपणे, हळदी कुंकवाने पायघुणी करून घेणे इ.चा जाणीवपूर्वक त्याग केला. कारण हे सर्व प्रकार स्पर्श नावाच्या विषयाचे भाऊबंद आहेत. जे चोर पावलांनी तना-मनावर मोहिनी घालतात आणि साधक पथभ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही. जर माकडाला दारू पाजली व त्याच्या हातात मशाल दिली, तर ते गावाला आग लावल्याशिवाय राहत नाही, तसेच आहे. स्पर्श नावाच्या विषयाचे म्हणून ज्यालाखरोखर साधक व्हायचे, त्याने स्पर्श नावाच्या विषयास ओळखावे. असा सदुपदेश देताना संत एकनाथ महाराज म्हणतात -चिरंजीवपद पावयासी, अन् उपाय नाही साधकासीनर-नारी सुश्रृषा करिती, उत्तम मध्यमआसने घालिती, तेणे धरे स्पर्श प्रीती ।

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक