शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

अध्यात्म - विभूतींचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 5:49 AM

मी कुठल्या कुठल्या विभूतींनी त्रैलोक्याला व्यापले आहे, त्याविषयी तुझ्या शुद्ध मनात जे भावविश्व निर्माण झाले आहे ते तुला थोडक्यात माझ्या मुख्य विभूती कथन करीतच सांगितल्या होत्या

आपला विभूतीयोग भक्तश्रेष्ठ अर्जुनाला सांगताना भगवंत मोठ्या पे्रमाने म्हणाले की,अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन।विष्टभ्याहमिदं कृत्स्त्रमेकांशन स्थितो जगत।।पार्था, मी कुठल्या कुठल्या विभूतींनी त्रैलोक्याला व्यापले आहे, त्याविषयी तुझ्या शुद्ध मनात जे भावविश्व निर्माण झाले आहे ते तुला थोडक्यात माझ्या मुख्य विभूती कथन करीतच सांगितल्या होत्या. तरीही आता साररूपात कथन करतो ते श्रद्धापूर्वक श्रवण कर, माझ्या सर्व विभूती जाणून घेण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या केवळ एका अंशानेच संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेले आहे. एवढेच फक्त ध्यानात ठेव. तू फक्त मलाच जाणून घे. तेवढेच पुरेसे होईल. भगवंतांना भक्तश्रेष्ठ अर्जुनाने विनंती केली की, भगवंता, केवळ एका अंशाने हे ब्रह्मांड व्यापलेले आहे. आपल्या असंख्य विभूती आहेत. माझ्या मर्त्य नजरेने मला या तुमच्या सर्व दिव्य विभूती, तुमची परमकृपा झाल्याशिवाय कधीच पाहता येणार नाहीत. माझी योग्यता असेल तर, आपण मला आपल्या सर्व विभूतींचे दर्शन घडवाल का? अर्जुनाची विश्वरूप पाहण्याची इच्छा ऐकून भगवंत मनोमनी सुखावले आणि त्यांनी आपल्या या परमभक्ताला आपले विश्वरूप दाखवण्याचे निश्चित केले. भगवंत म्हणाले,पश्य मे पार्था रूपाणि शतशो थ सहस्त्रश:।नानााविधानि दिव्यानि नानावर्णाकतीनि चपार्था, माझे ब्रह्मांड भव्य स्वरूप एकदाच फक्त माता यशोदेला गोकुळात असताना बालपणी दाखवले होते हे सत्य आहे. त्यानंतर आजपर्यंत दडवून ठेवलेले हे अतिभव्य स्वरूप मी फक्त तुलाच दाखवणार आहे. हजारो ऋषीमुनींनी कठोर तपश्चर्या करून, हे माझे दिव्य स्वरूप पाहण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु तू माझा परमभक्त आहेस, म्हणून तुझी ही विश्वरूप पाहण्याची इच्छा मी या भाग्यक्षणी पूर्ण करणार आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक