शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

चांगल्या कर्माने जीवन बनवा सुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 7:25 AM

काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच.

मानवी जीवनात प्रत्येकाला आपले कर्म भोगावे लागते. आपल्या केलेल्या कर्माची गती आपल्याला भोगावीच लागते. कारण कर्मगती फार गहन आहे. मानवी जीवन जगताना कोणी माणूस सुखी तर कोणी दु:खी, कष्टी आहे. कारण आपण लगेच म्हणतो त्याचे कर्म तसे असेल. जैसी करणी तैसी भरणी. या जगात प्रत्येकालाच आपल्या कर्मानुसार फळ मिळते. जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ मिळेल. आपण सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत जी क्रिया करतो ती सर्व कर्मेच होत. खाणेपिण्यापासून शारीरिक अथवा मानसिक सर्व क्रिया कर्मातच मोडतात. काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच. या पृथ्वीतलावर परब्रह्म स्वरूप असणारे राम-कृष्ण इत्यादींनासुद्धा कर्मगतीनेच जावे लागले.

सृष्टीचा कायदा कर्मावरच अवलंबून आहे. कर्मरूपी कायद्यात वकिलांची चतुराई, जज्जांची बुद्धिमत्ता किंवा कोणाची मध्यस्थी चालत नाही. माणसाने जे केले ते त्याला भोगणे आहेच. धार्मिक पुराणात अनेक दाखले देण्यात आले आहेत. संत कबीर एका दोह्यात म्हणतात, ‘कबिरा तेरा पुण्यका जब तक हो भंडार। तब तक अवगुण माफ है करो गुनाह हजार’ कर्मसिद्धांत कुणालाही सुटत नाही. त्याच्यातून कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे आपण नेहमी कर्म चांगले करावे. प्रत्येक मनुष्याने न्यायनीतीच्या मार्गाने चालावे. अविरतपणे सत्कर्म करीत राहावे. जे मिळेल त्यात समाधानी राहावे. सत्कर्मावरचा विश्वास कधी ढळू देऊ नये. आपण आपले कर्म करित राहावे. फळाची अपेक्षा ठेवू नये.

श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे, ‘कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन’ कर्म करण्याचे कर्तव्य तू करत जा- त्याच्या फळाची अपेक्षा करू नको. चांगले कर्म करा- चांगली गती मिळेल. शुभ कर्म केले तर शुभ फळ मिळेल. अशुभ केले तर अशुभ फळ मिळेल. कर्म तर सुटूच शकत नाही. जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही कर्म करावेच लागतात. आपली इच्छा असो अथवा नसो कर्म तर घडतातच. म्हणून सांगतो, चांगले कर्म करा व जीवन सुखी बनवा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक