शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

‘‘पैसा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 20:58 IST

पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही.

-दत्ता कोहिनकर

अमेरिकेहून मुलगा व सुन भारतात आली व आपल्याबरोबर आई-वडलांनी अमेरिकेलाच स्थायिक व्हावे म्हणून प्रेमाने - गोडी गुलाबीने राहता बंगला त्यांना विकावयास लावला. पैसे आपल्या खात्यात भरले व विमानतळावर आई-वडलांना सोडून दोघेही अमेरिकेला निघून गेले. एका समाजसेवकाच्या मदतीने हे दोघे आई-वडिल आज अनाथालयात दिवस काढत आहेत. दुसरी घटना केतकी वेळ घेऊन भेटायला आली होती. नवरा नुसते पैसे कमव तुला जे करायचं ते कर पण पैसे आण म्हणून त्रास देत होता. सांगताना तिचे डोळे पाणावले होते. अजुन एक घटना रूपेशला घटस्फोट मिळवण्यासाठी त्याच्या पत्नीने लाखो रूपायंची मागणी करून त्याला बेजार केले होते. पैशासाठी आई-वडिल, पत्नी-पती या पवित्र नात्यांवर अशाप्रकारे आभाळ कोसळले होते. ‘‘ना बाप बडा - ना भय्या, द होल थींग इज दॅट ना मैय्या, सबसे बडा रूपय्या ।’’ या गाण्याची प्रचिती वरील उदाहरणावरून येते. काही लोक म्हणतात ‘‘काय पैसापैसा करतो, मेल्यानंतर वर नेणार काय ?’’ पण हे ही तितकच खरं आहे.

जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत त्याच्याजवळचा पैसा त्याला प्रत्येक क्षेत्रात वर नेत असतो. दरिद्री माणसाला समाज दूर ठेवतो. त्याचा फोन नंबर यादीतून वगळला जातो. श्रीमंत माणूस बुध्दीने व शिक्षणाने कमी असला तरी समाजात त्याचा नावलौकिक असतो. गोवर्धनदास म्हणाले होते मी जन्म कुठे घ्यावा हे माझ्या हातात नव्हते. त्यामुळे मी जरी गरीब घरात जन्म घेतला. तरी मी गरीब म्हणून मरणार नाही. खरोखर मित्रांनो शेवटी सगळया गोष्टी पैशाशी संबंधित असतात. त्यामुळे अर्थतज्ञ म्हणतात ‘‘जर रूपयाचा हिशोब ठेवाल काटेकोर - तर आयुष्याचं गणित सहज सोडवेल परमेश्‍वर.’’ त्यामुळे आयुष्याचं गणित सहज सोडविण्यासाठी पैशाचे महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या जगात सगळया गोष्टी भरलेल्या पोटानेच होतात. पण खरोखर सगळयाच गोष्टी पैशाने मिळवता येतात का? यावर सखोल चिंतन करणे गरजेचे आहे. पैशांसाठी लोक   स्वकीयांना धोका देतात, आत्मसन्मान गहाण ठेवतात. देहविक्री करतात, खोटयाला खरे म्हणतात, अपराध करतात, जीव घेतात, नाती सोडतात, वाटेल ते करतात. येथूनच दुःखचक्राला सुरूवात होते. मित्रांनो पैसा महत्वाचा आहेच पण या पैशांनी आपण घर घेऊ शकतो. पण घराला घरपण आणू शकत नाही. पैशांनी औषध आणू शकतो, पण आपण आपले वय वाढवू शकत नाही. पैशांनी घडयाळ मिळते, पण गेलेली वेळ मिळवू शकत नाही.

पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही. पैशांनी रक्त पण विकत मिळते पण कोमजून गेलेले जीवन नाही. म्हणून पैसा अवश्य कमवा पण चांगल्या मार्गाने. आणि सत्मार्गाने कमावलेल्या पैशाच्या 10 % रक्कम ही दानधर्मासाठी खर्च करा व नाती-मैत्री व धन यांचा सुरेख संगम साधा व यांचा समन्वय साधताना लक्ष्मीकडे देखील दुर्लक्ष करू नका. म्हणतात ना, *‘‘वासुदेवाची ऐका कहानी, जगात नाही राम रे दाम करी काम वेडया - दाम करी काम रे 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकMONEYपैसा