शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

‘‘पैसा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 20:58 IST

पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही.

-दत्ता कोहिनकर

अमेरिकेहून मुलगा व सुन भारतात आली व आपल्याबरोबर आई-वडलांनी अमेरिकेलाच स्थायिक व्हावे म्हणून प्रेमाने - गोडी गुलाबीने राहता बंगला त्यांना विकावयास लावला. पैसे आपल्या खात्यात भरले व विमानतळावर आई-वडलांना सोडून दोघेही अमेरिकेला निघून गेले. एका समाजसेवकाच्या मदतीने हे दोघे आई-वडिल आज अनाथालयात दिवस काढत आहेत. दुसरी घटना केतकी वेळ घेऊन भेटायला आली होती. नवरा नुसते पैसे कमव तुला जे करायचं ते कर पण पैसे आण म्हणून त्रास देत होता. सांगताना तिचे डोळे पाणावले होते. अजुन एक घटना रूपेशला घटस्फोट मिळवण्यासाठी त्याच्या पत्नीने लाखो रूपायंची मागणी करून त्याला बेजार केले होते. पैशासाठी आई-वडिल, पत्नी-पती या पवित्र नात्यांवर अशाप्रकारे आभाळ कोसळले होते. ‘‘ना बाप बडा - ना भय्या, द होल थींग इज दॅट ना मैय्या, सबसे बडा रूपय्या ।’’ या गाण्याची प्रचिती वरील उदाहरणावरून येते. काही लोक म्हणतात ‘‘काय पैसापैसा करतो, मेल्यानंतर वर नेणार काय ?’’ पण हे ही तितकच खरं आहे.

जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत त्याच्याजवळचा पैसा त्याला प्रत्येक क्षेत्रात वर नेत असतो. दरिद्री माणसाला समाज दूर ठेवतो. त्याचा फोन नंबर यादीतून वगळला जातो. श्रीमंत माणूस बुध्दीने व शिक्षणाने कमी असला तरी समाजात त्याचा नावलौकिक असतो. गोवर्धनदास म्हणाले होते मी जन्म कुठे घ्यावा हे माझ्या हातात नव्हते. त्यामुळे मी जरी गरीब घरात जन्म घेतला. तरी मी गरीब म्हणून मरणार नाही. खरोखर मित्रांनो शेवटी सगळया गोष्टी पैशाशी संबंधित असतात. त्यामुळे अर्थतज्ञ म्हणतात ‘‘जर रूपयाचा हिशोब ठेवाल काटेकोर - तर आयुष्याचं गणित सहज सोडवेल परमेश्‍वर.’’ त्यामुळे आयुष्याचं गणित सहज सोडविण्यासाठी पैशाचे महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या जगात सगळया गोष्टी भरलेल्या पोटानेच होतात. पण खरोखर सगळयाच गोष्टी पैशाने मिळवता येतात का? यावर सखोल चिंतन करणे गरजेचे आहे. पैशांसाठी लोक   स्वकीयांना धोका देतात, आत्मसन्मान गहाण ठेवतात. देहविक्री करतात, खोटयाला खरे म्हणतात, अपराध करतात, जीव घेतात, नाती सोडतात, वाटेल ते करतात. येथूनच दुःखचक्राला सुरूवात होते. मित्रांनो पैसा महत्वाचा आहेच पण या पैशांनी आपण घर घेऊ शकतो. पण घराला घरपण आणू शकत नाही. पैशांनी औषध आणू शकतो, पण आपण आपले वय वाढवू शकत नाही. पैशांनी घडयाळ मिळते, पण गेलेली वेळ मिळवू शकत नाही.

पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही. पैशांनी रक्त पण विकत मिळते पण कोमजून गेलेले जीवन नाही. म्हणून पैसा अवश्य कमवा पण चांगल्या मार्गाने. आणि सत्मार्गाने कमावलेल्या पैशाच्या 10 % रक्कम ही दानधर्मासाठी खर्च करा व नाती-मैत्री व धन यांचा सुरेख संगम साधा व यांचा समन्वय साधताना लक्ष्मीकडे देखील दुर्लक्ष करू नका. म्हणतात ना, *‘‘वासुदेवाची ऐका कहानी, जगात नाही राम रे दाम करी काम वेडया - दाम करी काम रे 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकMONEYपैसा