शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

‘‘पैसा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 20:58 IST

पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही.

-दत्ता कोहिनकर

अमेरिकेहून मुलगा व सुन भारतात आली व आपल्याबरोबर आई-वडलांनी अमेरिकेलाच स्थायिक व्हावे म्हणून प्रेमाने - गोडी गुलाबीने राहता बंगला त्यांना विकावयास लावला. पैसे आपल्या खात्यात भरले व विमानतळावर आई-वडलांना सोडून दोघेही अमेरिकेला निघून गेले. एका समाजसेवकाच्या मदतीने हे दोघे आई-वडिल आज अनाथालयात दिवस काढत आहेत. दुसरी घटना केतकी वेळ घेऊन भेटायला आली होती. नवरा नुसते पैसे कमव तुला जे करायचं ते कर पण पैसे आण म्हणून त्रास देत होता. सांगताना तिचे डोळे पाणावले होते. अजुन एक घटना रूपेशला घटस्फोट मिळवण्यासाठी त्याच्या पत्नीने लाखो रूपायंची मागणी करून त्याला बेजार केले होते. पैशासाठी आई-वडिल, पत्नी-पती या पवित्र नात्यांवर अशाप्रकारे आभाळ कोसळले होते. ‘‘ना बाप बडा - ना भय्या, द होल थींग इज दॅट ना मैय्या, सबसे बडा रूपय्या ।’’ या गाण्याची प्रचिती वरील उदाहरणावरून येते. काही लोक म्हणतात ‘‘काय पैसापैसा करतो, मेल्यानंतर वर नेणार काय ?’’ पण हे ही तितकच खरं आहे.

जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत त्याच्याजवळचा पैसा त्याला प्रत्येक क्षेत्रात वर नेत असतो. दरिद्री माणसाला समाज दूर ठेवतो. त्याचा फोन नंबर यादीतून वगळला जातो. श्रीमंत माणूस बुध्दीने व शिक्षणाने कमी असला तरी समाजात त्याचा नावलौकिक असतो. गोवर्धनदास म्हणाले होते मी जन्म कुठे घ्यावा हे माझ्या हातात नव्हते. त्यामुळे मी जरी गरीब घरात जन्म घेतला. तरी मी गरीब म्हणून मरणार नाही. खरोखर मित्रांनो शेवटी सगळया गोष्टी पैशाशी संबंधित असतात. त्यामुळे अर्थतज्ञ म्हणतात ‘‘जर रूपयाचा हिशोब ठेवाल काटेकोर - तर आयुष्याचं गणित सहज सोडवेल परमेश्‍वर.’’ त्यामुळे आयुष्याचं गणित सहज सोडविण्यासाठी पैशाचे महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या जगात सगळया गोष्टी भरलेल्या पोटानेच होतात. पण खरोखर सगळयाच गोष्टी पैशाने मिळवता येतात का? यावर सखोल चिंतन करणे गरजेचे आहे. पैशांसाठी लोक   स्वकीयांना धोका देतात, आत्मसन्मान गहाण ठेवतात. देहविक्री करतात, खोटयाला खरे म्हणतात, अपराध करतात, जीव घेतात, नाती सोडतात, वाटेल ते करतात. येथूनच दुःखचक्राला सुरूवात होते. मित्रांनो पैसा महत्वाचा आहेच पण या पैशांनी आपण घर घेऊ शकतो. पण घराला घरपण आणू शकत नाही. पैशांनी औषध आणू शकतो, पण आपण आपले वय वाढवू शकत नाही. पैशांनी घडयाळ मिळते, पण गेलेली वेळ मिळवू शकत नाही.

पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही. पैशांनी रक्त पण विकत मिळते पण कोमजून गेलेले जीवन नाही. म्हणून पैसा अवश्य कमवा पण चांगल्या मार्गाने. आणि सत्मार्गाने कमावलेल्या पैशाच्या 10 % रक्कम ही दानधर्मासाठी खर्च करा व नाती-मैत्री व धन यांचा सुरेख संगम साधा व यांचा समन्वय साधताना लक्ष्मीकडे देखील दुर्लक्ष करू नका. म्हणतात ना, *‘‘वासुदेवाची ऐका कहानी, जगात नाही राम रे दाम करी काम वेडया - दाम करी काम रे 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकMONEYपैसा