शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

प्रसन्न मनामुळे सर्वकार्ये सिद्धीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 8:07 AM

ज्याचे मन अत्यंत प्रसन्न आहे, त्याचे सर्वकार्य सिद्धीस जाते. चैतन्यमय आनंद त्यांच्या मनात मावत नाही. चेहऱ्यावरचा भाव सहज टिपता येतो.

ज्याचे मन अत्यंत प्रसन्न आहे, त्याचे सर्वकार्य सिद्धीस जाते. चैतन्यमय आनंद त्यांच्या मनात मावत नाही. चेहऱ्यावरचा भाव सहज टिपता येतो. प्रसन्न मन असणाऱ्या माणसांचे बोलणे सहजतेने बाहेर पडते. त्यांच्या बोलण्याचा लोकांच्या मनावर चांगला परिणाम होतो. लोक त्यांच्या प्रभावाखाली येतात. त्यांच्या सान्निध्यात आल्यास जीवनाला काही नवा अर्थ मिळतो. जगण्याला नवा ध्यास मिळून जीवन सात्त्विकतेत जाते. चेहऱ्यावर तेजाची एक झलक असते. स्वत:मध्ये एक वेगळी ऊर्जा उत्पन्न झाल्यासारखे वाटते. अंतर्मनात एक नाद ऐकू येतो. तो आतला आवाज असतो. तोच आवाज ईश्वराचा असतो. तेज:पुंज चेहरा बनतो.

आपल्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला त्या प्रकाशाची जाणीव होते. आपल्या मनात येणाऱ्या विचाराला कुठेतरी आळा बसतो. मनात प्रसन्नतेची हुबेहुब प्रतिकृती आकार घेते. त्यामुळे दृष्टी फिरेल तिकडे प्रसन्नतेचे मळे फुललेले दिसून येतात. सगळ्या समस्यांचे मन निवारण करते. प्रसन्न मनच सर्वसिद्धीस कारणीभूत असते. सिद्धी प्राप्त झाल्यास सर्व गोष्टी आपोआपच प्राप्त होतात. मनाचा आखाडा फार मोठा आहे. त्याला प्रसन्न करणे एवढे सोपे नसते; परंतु एकदा का ते प्रसन्न झाले की सर्वसुखाची अनुभूती येते. मनातील सर्वसंकल्प पूर्णत्वाला जातात. त्यामुळे समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम करता येते. जीवनमुक्तीचा संदेश देता येतो. प्रसन्न मनामुळे असाध्य ते साध्य होते. मनाच्या प्रसन्नतेवरच जीवा-शिवाची भेट अवलंबून आहे. समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण करणे हेही मनाच्या प्रसन्नतेवरच आहे. प्रसन्न मन असलेल्या व्यक्तीच्या सहवासात आल्यास अलौकिक आनंदाची प्राप्ती होते. उभ्या आयुष्यातली दु:खे गळून पडतात. दैवगतीच बदलून जाते.

प्रसन्न मनाची व्यक्ती कुणाचा द्वेष करत नाही. आपल्या आपल्या आनंदात मग्न असते. तो कुणालाही दोष देत नाही, कुणाच्या डोक्यावर ओझे टाकत नाही. त्यांच्या मनात कुठलेही विचार घोंगवत नाहीत. आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही. सहनशीलता दया-क्षमा-शांती या गुणांची त्याच्या जवळ खाण असते. जीवनातला गुणार्थ त्याला कळलेला असतो. त्याची बुद्धी तल्लख असते. प्रसन्न मन असलेल्या व्यक्ती परिस्थितीला आनंदाने सामोरे जातात. जी परिस्थिती उद्भवेल तिचा सामना शांतपणे करतात. त्यांचा आत्मविश्वास दृढ असतो. त्यांचे कार्य सूर्यासारखे देदीप्यमान असते. प्रसन्न मन ठेवल्यास व असल्यास सर्वसुखाची बाग बहरून येते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक