शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

स्वार्थ त्यागा, आत्मसुखाचा बोध होईल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 5:12 PM

व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य गरजा पूर्ण झाल्यानंतर तो खरे तर या जीवसृष्टीतला सर्वात सुखी आणि समाधानी प्राणी असायला हवा.

जीवसृष्टीमध्ये मानव हा सगळ्यात बुद्धिमान जीव म्हणून ओळखला जातो. विचार करणे, आपले मत मांडणे यांसारख्या महत्वाच्या गोष्टी फक्त मानवालाच अवगत आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने दैदिप्यमान प्रगती केली आहे. आज व्यक्तीने चंद्रावर पाऊल ठेवले आहे. भविष्यात चंद्रावर वसाहत निर्माण करण्याचे त्याचे स्वप्नं आहे. अशक्य प्राय गोष्टींच्या शोधात मानव नेहमीच असतो. स्वतःच्या कल्पना शक्तीचा वापर करून त्याने जीवन अतिशय सुखकारक करण्याचा प्रयत्न तो करू पाहत आहे.

या सगळ्या चांगल्या गोष्टी मानवाच्या बाबतीत असल्या तरी मानवा इतका क्रूर, स्वार्थी, लोभी प्राणी या जीवसृष्टीत शोधून सापडणार नाही. संपत्तीच्या हव्यासापोटी व्यक्ती चोरी, फसवणूक, खून यांसारख्या गोष्टी सहजगत्या करत आहे. एकाच उदरातून जन्म घेतलेल्या आपल्या नात्यांना स्वार्थापाई एखादे फुल सहज चुरगाळून टाकावे, त्याप्रमाणे हत्या करण्यास मागे-पुढे पाहत नाही. इतका स्वार्थी आणि लोभीपणा फक्त मानव प्राण्यामध्ये दिसून येतो.

व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य गरजा पूर्ण झाल्यानंतर तो खरे तर या जीवसृष्टीतला सर्वात सुखी आणि समाधानी प्राणी असायला हवा. परंतु या सर्व महत्वाच्या गरजा पूर्ण झाल्या नंतर ही व्यक्ती सुखी,समाधानी दिसत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे स्वार्थ, हव्यास. या स्वर्थामुळेच महाभारत घडले. यातूनच जन्म झाला तो भगवतगीतेचा. साक्षात श्रीकृष्णाने या संपूर्ण ब्रम्हांडाचे अमूल्य ज्ञान मानवाला दिले. परंतू ज्ञानाचे दार खुले होऊनही मानव स्वार्थाच्या अथांग समुद्रात नखशिखांत बुडून खरे सुख, समाधान याच्या शोधात आहे. जन्मदात्यांचे अनंत काळाचे उपकार,प्रेम, त्याग सर्व विसरून क्षणभंगुर स्वार्थास पाहून त्यांना घराबाहेर काढायला तो मागे-पुढे पाहत नाही. किती हा मानवाचा स्वार्थीपणा ? सतत स्वतः च्या मनाचा, स्वतःच्या सुखाचा विचार करता करता व्यक्ती स्वतःच्या मनापासून खूप दूर निघून जात आहे. 

भौतिक सुखाच्या मागे धावतांना दाग-दागिने, गाडी, जमीन- जुमला, धन-दौलत यांची किंमत त्याला जास्त वाटते. परंतू स्वतःच्या उदरातून अतोनात हाल सहन करून जन्म देणाऱ्या मातेची, स्वतःच्या सुखाचा कणभर ही विचार न करणाऱ्या अविरत कष्ट करणाऱ्या पित्याच्या जीवनाचे मूल्य त्याला काहीच वाटतं नाही. इतका स्वार्थी आजचा मानव झाला आहे. खरे सुख, समाधान यासाठी तो दिवसें दिवस स्वर्थी होत आहे. स्वार्थी या शब्दातच असे आहे की, जी काही नाती आहेत ती आर्थिक गोष्टींशी जोडली गेली आहेत. आपल्या सारखे मन इतरांचे ही आहे, त्यांना ही काही दोन शब्दांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, याचा विचार न करता. सर्व नाती तो आर्थिक पारड्यात बसवून तोलत आहे. व्यक्ती जितका स्वतःच्या मनाचा, सुखाचा, स्वार्थाचा विचार करेल. तितका तो स्वतःपासून दूर जाईल. आत्मसुख स्वार्थात नसून ते इतरांसाठी काही करण्यात आहे, त्यांना दोन शब्द प्रेमाचे बोलण्यात आहे, त्यांच्या आनंदासाठी काही करण्यात आहे. 

आज स्वार्थी कौरव अनेक भेटतात, परंतू निस्वार्थी संत तुकाराम फार कमी. वाढदिवस, भंडारे, होम-हवन या माध्यमातून जेवणावळी देणारे अनेक दिसतील. परंतू आहे त्यातून एक घास खऱ्या भुकेल्या व्यक्तीला खाऊ घालणारे थोडेच. या स्वार्थापासून व्यक्ती ज्या दिवशी दूर जाईल, त्यादिवशी त्याला खऱ्या आत्मसुखाचा बोध होईल. 

- सचिन व्ही.काळे, ९८८१८४९६६  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक