शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनातून आत्मसुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:17 AM

आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनातून आत्म सुखाच्या मार्गावर व्यक्ती आपोआप चालू लागेल व मनात असणारे राग, लोभ, मद, मोह, मत्सर यांपासून मुक्त होऊन व्यक्ती चिरकाल आत्मसुखाचा आनंद घेऊ शकेल.

प्रत्येक व्यक्तीची जीवन जगण्याची एक पद्धत असते. बोलण्याची लकब असते, विचारांची पद्धत असते आणि राहणीमानाची सुद्धा एक पद्धत असते. या गोष्टींमुळे प्रत्येक व्यक्तीला आपण जे बोलतो, ज्या पद्धतीने वागतो, तेच बरोबर आहे असे वाटत असते. आपलेच विचार बरोबर, आपलीच वागण्याची पद्धत योग्य असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. कळतनकळतपणे व्यक्ती आपले विचार दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करत असते. एखाद्या गोष्टीवर आपलेच मत योग्य, असे प्रत्येकाला वाटत असते. आपल्या विचारांच्या चष्म्यातून प्रत्येक व्यक्ती स्वतः चे मत योग्य असल्याचे दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. हे मत समोरच्या व्यक्तीला पटले तर व्यक्तीला चांगले वाटते. हेच विचार समोरच्याला पटले नाही तर व्यक्तींमध्ये वाद होतात. एकमेकांमध्ये वैरभाव निर्माण होतात. 

व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीवर त्याचे इतरांशी असणारे संबंध मैत्रीचे आहेत की दुराव्याचे हे लक्षात येते. परंतु जीवन जगत असतांना व्यक्तीचा अनेक विचारांच्या लोकांशी संबंध येत असतो. काहींच्या विचारांचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर निश्चित पडत असतो. या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी जीवन जगत असतांना प्रत्येक व्यक्तीने स्वत: आत्मचिंतन करायला हवे. आज कुणीही हे आत्मचिंतन नात्यांमध्ये करतच नाही. त्यामुळे नात्यांमध्ये फार दुरावा निर्माण होत आहे. प्रत्येकाला आपण जे बोलतो, जे करतो, ज्या पद्धतीने वागतो तेच योग्य वाटत असते. 

प्रत्येक नात्यांमध्ये आज निर्माण होणारा दुरावा हे व्यक्तीने आत्मचिंतन न केल्याचा परिणाम आहे. आपलेच ते खरे मानून व्यक्ती आपले विचार दुसऱ्याला बळजबरी पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. समोरच्या व्यक्तीने एखद्या घटनेच्या वेळी घेतलेला निर्णय कशा परिस्थितीत घेतला ? त्या मागचे कारण काय होते ? हे समजून न घेता व्यक्ती समोरच्या व्यक्तीला एकतर बावळट ठरवते किंवा चूक ठरवते. परंतू अशा परिस्थितीत आपण जर त्या व्यक्तीच्या जागी असतो, तर कदाचित आपल्या वर ही तशीच वेळ आली असती हे व्यक्तीला लक्षात येत नाही. कारण व्यक्ती आत्मचिंतनच करत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.     पती-पत्नीचे नाते असो की; सासू-सुनेचे किंवा आई-वडिलांचे आणि मुलांचे प्रत्येक व्यक्तीने नात्यांच्या ओलाव्यासाठी आत्मचिंतन करण्याची आज खूप गरज आहे. काळानुसार नात्यांमध्ये निर्माण होणारे दुरावे, हे एकमेकांना समजून न घेतल्यामुळे वाढत आहेत. नात्यांचा विचार करतांना आत्मचिंतन यासाठी की, प्रत्येक व्यक्तीचे समोरच्या व्यक्तीला समजून घेतांना चुकत असते. उदा. प्रत्येक स्त्रीला वाटत असते की तिच्या मनाप्रमाणे तिच्या पतीने वागावे. तसेच पतीलाही वाटत असते की आपल्या पत्नीने आपल्या मता प्रमाणे वागावे. जर दोघेही एकमेकांच्या मताप्रमाणे वागले नाही तर दोघांमध्ये वाद होतात आणि साताजन्माच्या बांधलेल्या गाठी ढिल्या होऊ लागतात. कधी कधी या गाठी कायमच्या सुटतात. 

परंतू या ढिल्या होणाऱ्या गाठी घट्ट होण्यासाठी दोघांनी आत्मचिंतन केले आणि घेतलेल्या आणाभाका आठवल्या तर निश्चित ढिल्या होणाऱ्या गाठी घट्ट होतील. पण त्यासाठी प्रत्येकाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. आत्मचिंतन केल्याने व्यक्तीला स्वतःची ओळख होते, स्वतः मध्ये असणारे चांगले गुण कळतात, स्वतः मध्ये असणारी कमतरता ओळखता येते. ज्या वेळी व्यक्ती स्वतः मधले गुण दोष ओळखेल, त्या वेळी तो समोरच्या व्यक्तीला समजून घेऊ शकेल. नुसते समोरच्या व्यक्तीवर आपले विचार लादून नात्यांमध्ये दुरावे निर्माण करण्यापेक्षा स्वतः आत्मचिंतन करून, स्वतः तील गुण-दोष ओळखून, आपल्याप्रमाणेच समोरच्या व्यक्ती मध्ये काही चांगले- वाईट गुण असतील याचा प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे. तेंव्हा कुठे नात्यांमधील ओलावा टिकून राहील आणि ऋणानुबंध घट्ट होतील. 

तसेच आत्मचिंतनातून व्यक्तीला स्व विकास, व्यक्तिमत्व विकास आणि व्यक्ती म्हणून आपण जे करतोय, वागतोय, जगतोय याचे आत्मिक समाधान प्राप्त होईल. आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनातून आत्म सुखाच्या मार्गावर व्यक्ती आपोआप चालू लागेल व मनात असणारे राग, लोभ, मद, मोह, मत्सर यांपासून मुक्त होऊन व्यक्ती चिरकाल आत्मसुखाचा आनंद घेऊ शकेल.

- सचिन व्ही. काळे (9881849666) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक