शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

हीच संस्कृती आज अंध:काराकडे जात आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 3:49 AM

भारत हा एक संस्कृतिप्रधान देश मानला जातो.

- नीता ब्रह्मकुमारीभारत हा एक संस्कृतिप्रधान देश मानला जातो. भारताची प्राचीन संस्कृती ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या मार्गाने पुढे चालणारी, अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारी मानली जाते. म्हणून प्रत्येक सण-प्रसंगात दीप प्रज्वलन, दिवा लावणे या प्रथा दिसून येतात. पण आज हीच संस्कृती अंध:काराकडे जात आहे. वाढदिवसाला ओवाळणी करून, तिलक लावून शुभकामना देण्याची पद्धत आज मेणबत्ती विझवून हॅपी बर्थडे बोलणारी झाली आहे. भारताची प्राचीन संस्कृती विसरून पाश्चात्त्य देशाच्या भोगविलासी संस्कृतीशी आपण हात मिळवत आहोत. भूक लागल्यावर खाणे ही प्रकृती, भूक लागल्यावर दुसऱ्याच्या हातचे काढून खाणे ही आहे विकृती, पण खात असताना कोणी आले तर त्यालाही खावयास देणे ही आहे संस्कृती. ही संस्कृती भारतामध्ये ‘अतिथी देवो भव’ म्हणून सांभाळताना दिसते. घरी आलेल्या पाहुण्याला देवाचेच रूप समजून त्याचा पाहुणचार प्रेमाने केला जातो. अनेक पद्धती आणि अनेक उत्सवांत भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. प्रत्येक उत्सव आणि प्रथांमागे अनेक रहस्ये लपली आहेत. पण त्या रहस्यांना आपण कधी जाणून घेतले नाही. म्हणून आज तसे आपल्यामध्ये संस्कारही दिसून येत नाहीत. संस्कार आणि संस्कृती यांचा संबंध समजून घेण्यासारखा आहे. संस्कार अर्थात दैनंदिन जीवनामध्ये नियमितता आणणे, व्यवहारामध्ये सदगुणाचा समावेश करणे, प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्यता आणून धर्मयुक्त कार्य करणे हे संस्कारित असण्याची निशाणी आहे. अशा संस्कारी मनुष्यांनी अनेकांना जीवन जगण्याची कला शिकवली, त्या कलेला संस्कृती म्हटले जाते. वर्तमान परिस्थिती मात्र वेगळी दिसून येते. विज्ञानाने मनुष्याला अनेक साधने आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु त्याचबरोबर आपली मानसिकताही दिवसेंदिवस बदलत गेली. अनेक चुकीच्या समजुती समाजामध्ये पसरत गेल्या आणि हीच सुंदर संस्कृती आज लोप पावताना दिसत आहे.