शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

अति आदरे सज्जनांचा करावा..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:25 IST

ज्याच्या मनांत कधीही भेदभाव नसतो, जो कधीही खोटं बोलत नाही, जो निरंतर आपलं कल्याणंच इच्छितो तो आप्त..!

- ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

मागील लेखात आपण पाहिले की, श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, हे मना.! तू सर्वसंगत्याग कर पण पुढे श्रीसमर्थ एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात कारण श्रीसमर्थांना माहित आहे की, आजच्या बुद्धिवादी जगांत सर्व संग सोडणं कसं शक्य आहे? हा प्रश्न उपस्थित होतो म्हणून ते पुढील अर्धचरणांत म्हणतात -

अति आदरे सज्जनांचा करावा।

आता सज्जन म्हणजे कोण..? तर साधू, संत यांची संगती ही सज्जनांची संगती. शांतीसागर एकनाथ महाराज म्हणतात -

संसार करावया जाण । सत्संगतीच प्रमाण ।त्याचे भावे धरिल्या चरण । दिनोद्धरण त्यांचेनि ॥

किंवा तुकोबा म्हणतात -

याजसाठी संतपाय हे सेवावे । तरीच तरावे तुका म्हणे ॥

याठिकाणी वरील दोन्ही प्रमाणांवरुन आपल्या हे लक्षात येतं की, संतसंगतीशिवाय माणसाला आयुष्यात काहीच चांगलं मिळविता येत नाही म्हणून ठामपणे संत सांगतात की,संतपाय हे सेवावे किंवा धरिल्या चरण

आता संतांचेच चरण का धरायचे..? कारण संत हे 'आप्त' आहेत. आता 'आप्त' म्हणजे कोण..? तर - 

आप्तस्तु यथार्थ वक्ता ।

ज्याच्या मनांत कधीही भेदभाव नसतो, जो कधीही खोटं बोलत नाही, जो निरंतर आपलं कल्याणंच इच्छितो तो आप्त..! हल्ली आपण सोयरा असेल तर त्याला आप्त म्हणतो पण लक्षांत घ्या, सोयरा हा कधीही आप्त नसतो. आप्त फक्त संतच असू शकतात म्हणून संतचरण धरा. आता चरणंच का..? तर त्यांचं आचरण चांगलं म्हणून त्यांचे चरण चांगले आणि दुसरा मुद्दा याठिकाणी नम्रता किंवा संपूर्ण शरणागतीची संकल्पना आहे.

संतसंगती ही एक प्रकारची ठिणगी (Spark) आहे. ज्याप्रमाणे विजेच्या तारेला स्पर्श होताच जसा शाॅक हा बसतोच तसा संतसंगतीत गेला की मनुष्य हा बदलतोच त्यामुळे संतसंगती ही परिवर्तनाची ठिणगी आहे. संतसंगतीने माणसाच्या मनांत पश्चात्तापाची भट्टी पेटली जाते ज्यातून माणूस हा तावूनसुलाखूनच बाहेर पडतो. जे महर्षि वाल्मिकींच्या बाबतीत घडलं. वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ही कथा आपण सर्वजण जाणतो म्हणून नारदमहर्षि आपल्या भक्तीसूत्रामध्ये सत्संगतीचे तीन पैलू सांगतात -

सत्संगः तु दुर्लभः दुर्गमः अमोघश्च ।

सत्संग हा एक तर दुर्लभ असतो. तो होतच नाही. संत मिळाले तरी त्यांना ओळखता येत नाही. संत मिळाले आणि ओळखता आले की त्यानंतर मात्र त्याचा जीवनामध्ये होणारा परिणाम अमोघ म्हणजे निश्चित स्वरुपाचा असतो.

संतांचा स्पर्श जीवनातील पापांचा नाश करतो.

श्रीमद् भागवतामध्ये एक कथा आहे. भगवती गंगामातेने स्वर्गातून भूमंडलावर येताना भगीरथाला दोन प्रश्न विचारले होते. " भगीरथा, माझा वेग अत्यंत अधिक असेल तेव्हा मला कोण धारण करेल.? " भगीरथ म्हणाले, " आई, भगवान महादेव तुला धारण करतील. " भगवती गंगेने आणखी एक प्रश्न विचारला, " भगीरथा, मी या भूमंडलावरती येईन. दूरदूरचे लोक येऊन माझ्यामध्ये स्नान करतील आणि माझ्यामध्ये स्नान केल्यानंतर त्यांची पातके मला धुवावी लागतील. त्यांची पातकं तर नष्ट होतील पण ती पातकं माझ्यात साठतील. त्या पापांचा नाश कोण करणार.? " आणि भगीरथांनी उत्तर दिले," आई, ज्याप्रमाणे सामान्य भाविक लोक येऊन तुझ्यामध्ये स्नान करतील त्याप्रमाणे अत्यंत श्रेष्ठ संत महात्मेही येऊन तुझ्या प्रवाहामध्ये स्नान करतील आणि ज्याक्षणी संतांचा स्पर्श तुझ्या प्रवाहाला होईल त्याक्षणी तुझ्यामध्ये साठलेले हे संपूर्ण पातक जळून नष्ट होईल. "

जगातील पातक धुण्याचे काम गंगामाता करते, पण गंगामातेमध्ये साठलेल्या पातकांना नष्ट करण्याचे काम संतांच्यामुळे होते आणि म्हणून संतांच्या जीवनात तीन गोष्टी आपणांस साकारलेल्या दिसतात.एक संस्कृत सुभाषित आहे -

गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा ।पापं तापं च दैन्यं च घ्नन्ति सन्तो महायशाः ॥

गंगामाता केवळ पाप नष्ट करते, चंद्र केवळ ताप नष्ट करतो आणि कल्पवृक्ष दारिद्र्य नष्ट करतो पण संत हे आपल्या जीवनातील पाप, ताप आणि दैन्य या तीनही गोष्टी नष्ट करतात..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक