शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

मानवी मनानं भगवंतनामाचे स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:11 IST

- वामन देशपांडे मानवी मन खूप अस्थिर आहे, चंचल आहे. त्या मनाला स्थिर करण्यासाठी, चंचल मनोवृत्तीला पूर्णपणे शांत करण्यासाठी ...

- वामन देशपांडेमानवी मन खूप अस्थिर आहे, चंचल आहे. त्या मनाला स्थिर करण्यासाठी, चंचल मनोवृत्तीला पूर्णपणे शांत करण्यासाठी भगवंतनामाचे अखंड स्मरण करण्याची बुद्धी प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी परमेश्वराची कृपा भक्तावर व्हावी लागते. अंत:करणात राग, द्वेष, स्वार्थ, अहंकार सदैव जागृतावस्थेत वावरत असतात, तोपर्यंत मनातले द्वंद्व थांबतच नाही. त्यासाठी रागद्वेषादी समाप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. हे विश्व केवळ परमेश्वरी अस्तित्वानेच भारलेले आहे. ही दृढता जेव्हा मनात पूर्णांशाने स्थिर होते, तेव्हाच चित्तात स्थिरता, समता, एकाग्रता यांचे प्राबल्य दाटून येते आणि तीच खरी साधनेची सुरुवात असते. तो शुभयोग परमेश्वरी कृपेनेच प्राप्त होतो. त्यासंदर्भात भगवंत म्हणतात,योगस्थ: कुरू कर्मणि सग्डत्यक्त्वा धनश्चय।सिद्धयासिद्धयो : समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।।गीता : २:४८।।पार्था, आपण जे कर्म करतो, त्या कोणत्याही कर्मात आणि कर्मफलात आसक्तीभाव चुकूनही उमलून येता कामा नये. निर्लेप मनाने कर्म केले तर कर्तृत्वभाव आपोआप गळून पडतो. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे कर्मफलात मन अडकतच नाही. त्याचा अप्रतिम परिणाम म्हणजे सिद्धी आणि असिद्धीत समतोल भाव निर्माण होईल. निष्काम कर्मयोग हीच मनाची स्थिरता. आपण करीत असलेल्या साधनेने भगवंत प्रसन्न होणे, आपण त्याचे लाडके भक्त होणे, ही खरेतर करीत असलेल्या आपल्या साधनेची फलश्रुती आहे. याचे भान साधकाला येणे अत्यंत आवश्यक आहे.