शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

मानवी मनानं भगवंतनामाचे स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:11 IST

- वामन देशपांडे मानवी मन खूप अस्थिर आहे, चंचल आहे. त्या मनाला स्थिर करण्यासाठी, चंचल मनोवृत्तीला पूर्णपणे शांत करण्यासाठी ...

- वामन देशपांडेमानवी मन खूप अस्थिर आहे, चंचल आहे. त्या मनाला स्थिर करण्यासाठी, चंचल मनोवृत्तीला पूर्णपणे शांत करण्यासाठी भगवंतनामाचे अखंड स्मरण करण्याची बुद्धी प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी परमेश्वराची कृपा भक्तावर व्हावी लागते. अंत:करणात राग, द्वेष, स्वार्थ, अहंकार सदैव जागृतावस्थेत वावरत असतात, तोपर्यंत मनातले द्वंद्व थांबतच नाही. त्यासाठी रागद्वेषादी समाप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. हे विश्व केवळ परमेश्वरी अस्तित्वानेच भारलेले आहे. ही दृढता जेव्हा मनात पूर्णांशाने स्थिर होते, तेव्हाच चित्तात स्थिरता, समता, एकाग्रता यांचे प्राबल्य दाटून येते आणि तीच खरी साधनेची सुरुवात असते. तो शुभयोग परमेश्वरी कृपेनेच प्राप्त होतो. त्यासंदर्भात भगवंत म्हणतात,योगस्थ: कुरू कर्मणि सग्डत्यक्त्वा धनश्चय।सिद्धयासिद्धयो : समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।।गीता : २:४८।।पार्था, आपण जे कर्म करतो, त्या कोणत्याही कर्मात आणि कर्मफलात आसक्तीभाव चुकूनही उमलून येता कामा नये. निर्लेप मनाने कर्म केले तर कर्तृत्वभाव आपोआप गळून पडतो. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे कर्मफलात मन अडकतच नाही. त्याचा अप्रतिम परिणाम म्हणजे सिद्धी आणि असिद्धीत समतोल भाव निर्माण होईल. निष्काम कर्मयोग हीच मनाची स्थिरता. आपण करीत असलेल्या साधनेने भगवंत प्रसन्न होणे, आपण त्याचे लाडके भक्त होणे, ही खरेतर करीत असलेल्या आपल्या साधनेची फलश्रुती आहे. याचे भान साधकाला येणे अत्यंत आवश्यक आहे.