शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गरिबीची नेमकी कारणं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 4:17 AM

खोटे बोलणे, चोरी, उद्धट वागणे, अर्वाच्य बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, जबाबदारी न स्वीकारणे, थोडक्यात समाधान मानणे अशा अनेक अवगुणांमुळे गरिबीचा उच्चांक वाढतच जातो.

- विजयराज बोधनकरएका प्रसिद्ध लेखकाला कार्यालयीन कामासाठी चुणचुणीत तरुणाची गरज असते. आपल्या प्राध्यापक मित्राला तो हे सांगतो. त्याच्या कॉलेजमध्ये एक गरीब विद्यार्थी असतो. त्याच्या वडिलांचा दारूमुळे मृत्यू झालेला असतो. आई घरकाम करून मुलांचे शिक्षण, घर चालवीत असते. प्राध्यापक त्या मुलाला लेखकाकडे पार्टटाइम नोकरीला पाठवतो. महिना-दीड महिना तो आनंदात काम करतो. गरीब मुलाला या कामातून चार पैसे मिळतात याचा आनंद लेखकाला होतो. लेखनाची आवड असलेला मुलगा अध्येमध्ये त्याने लिहिलेल्या कविता दाखवत असतो. याचा लेखकाला आनंद होतो, पण एक दिवस विचित्र घटना घडते.एके दिवशी मुलगा ऑफिस सुटल्यावर इमारतीखाली उतरतो. लेखकाचे घरही त्याच इमारतीत असते, लेखकाची बायको खिडकीतून बघते. मुलाच्या पाठीवरची बॅग जड सामानाने भरल्यासारखी वाटते. शंका आल्याने ती त्याला घरी बोलावते. बॅग तपासते तेव्हा त्यात ऑफिसमधली महागडी दहा-बारा पुस्तके आढळतात. कसून चौकशी केल्यानंतर तो सांगतो की, मी ही पुस्तके रद्दीत विकून पैसे मिळवतो. आतापर्यंत त्याने लेखकाच्या संग्रहातली बरीच पुस्तके विकलेली असतात. चोरी करून तो मोठा विश्वासघात करतो. त्याला कामावरून काढले जाते. ही बातमी कॉलेजमध्ये पसरते, त्याच्यावर चोर म्हणून शिक्का बसतो. प्राध्यापकाच्या मनातून तो कायमचा उतरतो. खरेतर, त्याला गरिबीतून वैचारिक आणि आर्थिक श्रीमंत होण्याची संधी प्राध्यापक देतात; पण त्याचे कुकर्म आडवे येते.यालाच ‘वैचारिक गरिबी’ म्हणतात. अशा घातक वृत्तीची गरिबी सतत पाठलाग करते. याचा दोष ही माणसे दैवाला देऊन मोकळी होतात. आयुष्यभर गरिबीच्या बाभुळीला खतपाणी घालतात. खोटे बोलणे, चोरी, उद्धट वागणे, अर्वाच्य बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, जबाबदारी न स्वीकारणे, थोडक्यात समाधान मानणे अशा अनेक अवगुणांमुळे गरिबीचा उच्चांक वाढतच जातो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक