शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मुस्लीम देशातही आपलेच मानले जातात प्रभू श्रीराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 16:44 IST

प्रभू श्रीराम म्हटले की ते फक्त हिंदूंचेच. हिंदूंचा देव म्हणजे अन्य धर्मीयांना त्यांच्याशी काहीच घेणे देणे नाही. मूर्तीपुजेच्या विरोधात असणाऱ्या मुसलमानांना तर रामाबद्दल काहीच श्रद्धा असण्याचे कारण नाही. असे एक नाही अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात.

प्रभू श्रीराम म्हटले की ते फक्त हिंदूंचेच. हिंदूंचा देव म्हणजे अन्य धर्मीयांना त्यांच्याशी काहीच घेणे देणे नाही. मूर्तिपूजेच्या विरोधात असणाऱ्या मुसलमानांना तर रामाबद्दल काहीच श्रद्धा असण्याचे कारण नाही. असे एक नाही अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. भारतातील परिस्थिती काही प्रमाणात आहेही तशीच. मात्र हेच जर आपण थोडे सीमेपलीकडे गेलो. त्यातही आग्नेय आशियात डोकावले तर कळते राम हे फक्त आपलेच नाहीत, तर अवघ्या जगाचे आहेत. त्यातही इंडोनेशिया या मुसलमान बहुसंख्येच्या देशातील बाली प्रांतात गेलो तर ते मुसलमानांनाही आपले वाटतात. कारण एकच आपण रामाकडे, रामायणाकडे धार्मिक परंपरा म्हणून पाहतो तर बालीमध्ये राम आणि रामायण हा अभिमानास्पद असा गौरवशाली सांस्कृतिक वारसा आहे.तुम्ही इंडोनेशियाच्या बालीत एखाद्या मुसलमानाला विचारलत की तुम्ही रामायण का वाचता? तर तुम्हाला झटकन उत्तर येईल, आम्ही आणखी चांगली माणसं बनण्यासाठी रामायण वाचतो. रामायणाचे एवढे चांगले महत्व, रामाचे आदर्श पुरुषोत्तमाचे स्थान अभिव्यक्त करण्यासाठी आणखी काय सांगितले पाहिजे. आपल्याकडे हे मनामनात असतंच पण बालीमध्ये ते हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मीयही अभिमानाने तसे सांगतात, हे महत्वाचे!पर्यटक जेव्हा इंडोनेशियात जातात तेव्हा बालीतील अयुंग नदीच्या पात्रात राफ्टिंग करण्यासाठी जातातच जातात. राफ्टिंगचा थर्रार अनुभवतानाच जेव्हा नजर नदीसभोवतालच्या कातळांवर जाते तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसतो. अन्य नद्यांच्या कडेलाही कातळं असतातच. त्यांच्यात नदीच्या प्रवाहामुळे काही नैसर्गिक कलाकृती आपोआप निर्माण होतात. निसर्गाच्या त्या अनुपम रचना असतात. मात्र बालीतील अयुंग नदीकिनाऱ्यावरील कातळात मानवनिर्मित अप्रतिम शिल्लाकृती आहेत. त्या शिल्पाकृती रामायणातील प्रसंगांवर आधारीत आहेत. रामायण जेथे घडले त्या आपल्या भारतातही रामायणाच्या अशा शिल्पाकृती दिसत नाहीत. मात्र बालीत त्या आहेत. आपोआपच थर्रार अनुभवतानाच मनात एक प्रसन्नता दाटते.तेथेही रामायण आहे. ''रामायण काकावीन'' या नावाचे. नवव्या शतकातील या रचनेचे लेखक योगीश्वर आहेत. या रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते राम-सीतेचीच कथा सांगत असले तरी स्थानिक भोगौलिक परिस्थिती, सांस्कृतिक वारशाचा समावेश असलेले आहे. एवढेच नव्हे तर इंडोनेशियातील काही नाट्यपथके रामलीलाही सादर करतात. त्या रामलीलेत अवघे रंगून जातात. महाकाव्याचे रंगमंचावरील सादरीकरण इंडोनेशियन शैलीत पाहणे हा एक वेगळा अविस्मरणीय आनंदच असतो. मुळातच रामाची भक्ती करणारे भक्तीरसात असे रंगून जातात की त्यांना आपल्या आराध्यदैवतापलिकडे दुसरे काही दिसत नाही, येथे तर सभोवताली सर्वत्रच राम आणि रामायण दिसते. निसर्गाच्या थर्रारातही!

टॅग्स :Ram Navamiराम नवमीIndonesiaइंडोनेशियाIndiaभारत