शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
5
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
6
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
7
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
9
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
10
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
11
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
12
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
13
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
14
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
17
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
18
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
19
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
20
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा

मुस्लीम देशातही आपलेच मानले जातात प्रभू श्रीराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 16:44 IST

प्रभू श्रीराम म्हटले की ते फक्त हिंदूंचेच. हिंदूंचा देव म्हणजे अन्य धर्मीयांना त्यांच्याशी काहीच घेणे देणे नाही. मूर्तीपुजेच्या विरोधात असणाऱ्या मुसलमानांना तर रामाबद्दल काहीच श्रद्धा असण्याचे कारण नाही. असे एक नाही अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात.

प्रभू श्रीराम म्हटले की ते फक्त हिंदूंचेच. हिंदूंचा देव म्हणजे अन्य धर्मीयांना त्यांच्याशी काहीच घेणे देणे नाही. मूर्तिपूजेच्या विरोधात असणाऱ्या मुसलमानांना तर रामाबद्दल काहीच श्रद्धा असण्याचे कारण नाही. असे एक नाही अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. भारतातील परिस्थिती काही प्रमाणात आहेही तशीच. मात्र हेच जर आपण थोडे सीमेपलीकडे गेलो. त्यातही आग्नेय आशियात डोकावले तर कळते राम हे फक्त आपलेच नाहीत, तर अवघ्या जगाचे आहेत. त्यातही इंडोनेशिया या मुसलमान बहुसंख्येच्या देशातील बाली प्रांतात गेलो तर ते मुसलमानांनाही आपले वाटतात. कारण एकच आपण रामाकडे, रामायणाकडे धार्मिक परंपरा म्हणून पाहतो तर बालीमध्ये राम आणि रामायण हा अभिमानास्पद असा गौरवशाली सांस्कृतिक वारसा आहे.तुम्ही इंडोनेशियाच्या बालीत एखाद्या मुसलमानाला विचारलत की तुम्ही रामायण का वाचता? तर तुम्हाला झटकन उत्तर येईल, आम्ही आणखी चांगली माणसं बनण्यासाठी रामायण वाचतो. रामायणाचे एवढे चांगले महत्व, रामाचे आदर्श पुरुषोत्तमाचे स्थान अभिव्यक्त करण्यासाठी आणखी काय सांगितले पाहिजे. आपल्याकडे हे मनामनात असतंच पण बालीमध्ये ते हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मीयही अभिमानाने तसे सांगतात, हे महत्वाचे!पर्यटक जेव्हा इंडोनेशियात जातात तेव्हा बालीतील अयुंग नदीच्या पात्रात राफ्टिंग करण्यासाठी जातातच जातात. राफ्टिंगचा थर्रार अनुभवतानाच जेव्हा नजर नदीसभोवतालच्या कातळांवर जाते तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसतो. अन्य नद्यांच्या कडेलाही कातळं असतातच. त्यांच्यात नदीच्या प्रवाहामुळे काही नैसर्गिक कलाकृती आपोआप निर्माण होतात. निसर्गाच्या त्या अनुपम रचना असतात. मात्र बालीतील अयुंग नदीकिनाऱ्यावरील कातळात मानवनिर्मित अप्रतिम शिल्लाकृती आहेत. त्या शिल्पाकृती रामायणातील प्रसंगांवर आधारीत आहेत. रामायण जेथे घडले त्या आपल्या भारतातही रामायणाच्या अशा शिल्पाकृती दिसत नाहीत. मात्र बालीत त्या आहेत. आपोआपच थर्रार अनुभवतानाच मनात एक प्रसन्नता दाटते.तेथेही रामायण आहे. ''रामायण काकावीन'' या नावाचे. नवव्या शतकातील या रचनेचे लेखक योगीश्वर आहेत. या रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते राम-सीतेचीच कथा सांगत असले तरी स्थानिक भोगौलिक परिस्थिती, सांस्कृतिक वारशाचा समावेश असलेले आहे. एवढेच नव्हे तर इंडोनेशियातील काही नाट्यपथके रामलीलाही सादर करतात. त्या रामलीलेत अवघे रंगून जातात. महाकाव्याचे रंगमंचावरील सादरीकरण इंडोनेशियन शैलीत पाहणे हा एक वेगळा अविस्मरणीय आनंदच असतो. मुळातच रामाची भक्ती करणारे भक्तीरसात असे रंगून जातात की त्यांना आपल्या आराध्यदैवतापलिकडे दुसरे काही दिसत नाही, येथे तर सभोवताली सर्वत्रच राम आणि रामायण दिसते. निसर्गाच्या थर्रारातही!

टॅग्स :Ram Navamiराम नवमीIndonesiaइंडोनेशियाIndiaभारत