शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

शब्दी सामर्थ्य आती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:59 IST

श्रीचक्रधरांनी मराठीला काय दिलं याचं उत्तर अर्थपूर्ण शब्द दिले. शब्दांत सामर्थ्य असतं हे भोळ्याभाळ्या लोकांना प्रथमच मराठीत सांगितलं.

- बा.भो. शास्त्रीश्रीचक्रधरांनी मराठीला काय दिलं याचं उत्तर अर्थपूर्ण शब्द दिले. शब्दांत सामर्थ्य असतं हे भोळ्याभाळ्या लोकांना प्रथमच मराठीत सांगितलं. पक्वान्नात सहाच रस. शब्दांत शांत रसासह दहा रस आहेत. ईश्वराच्या शब्दांत ब्रह्मरस असतो. त्याच्या शब्दांना शब्दब्रह्म म्हणतात. डाळिंबाच्या दाण्यासारखे ते परास्पर्शित असतात. शब्दरसवत्तेने ओथंबलेले शब्द देवपूजेला चालतात. ते फुलांसारखे व वज्राहून कठोर असतात. शब्दांना गंध-सुगंध आहे. त्यात आग आहे. प्रेम आहे. शब्द हे पदार्थासारखे कडू, आंबट, खारट, तिखट असतात. ते रुक्ष असतात. दक्ष असतात. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स व अद्भुत रसांचे पाट काव्यातून वाहत असतात. तर हे काव्यही समर्थ शब्दांच्या मदतीनेच तयार झालेलं असतं.स्वामी गद्यातून बोलले व संत ज्ञानेश्वर महाराज पद्यातून बोलले. हे त्यांचं मराठीतल्या सामर्थ्यावर प्रेम आहे. ‘भाषा कशी असावी याचं उत्तर ज्ञानेश्वरसारखी असावी असं आहे. तर भाषा कशी होती याचं उत्तर लीळाचरित्रासारखी होती’ एका साहित्यिकाचं हे वाक्य बरोबर आहे. स्वामींच्याच मुखातलं आणि शोधनीच्या पाठातलं, ‘शब्दी सामर्थ्य आती’ हे आजचं सूत्र आहे. शब्दसृष्टी ही मानव सृष्टीसारखीच असते. शब्दांचेही स्वभाव भिन्न असतात. शब्द चांगले व वाईट पण आहेत. एका ब्राह्मणाला पाच विधवा मुली असतात.  गाव त्याला त्रास देतं. ‘या पंचरांडा, जा पंचरांडा’ या शब्दांनी संबोधतं. चांगल्या मुलींवर आळच घेतं. तो दु:खाने जळत असतो. तो स्वामींच्या भेटीला गेला. स्वामी म्हणाले, ‘या पंचगंगा हो’ तो प्रसन्न झाला व म्हणाला, ‘निवालाजी निवाला.’ स्वामी म्हणाले, तुमच्या मुली गंगेसारख्या पवित्र आहेत. गंगा शब्दाने जळत्या ब्राह्मणाचं दु:ख विझलं. त्याने वापरलेला ‘निवालाजी’ हा शब्द किती अर्थपूर्ण आहे. आधी शब्दांनी जळाला व आता शब्दांच्या थंडाव्याने निवाला. म्हणूनच शब्द जपून वापरायचे असतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक