शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

आवडीने भावे हरिनाम घेसी..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 11:02 IST

जिथे यंदा खुद्द माऊली पंढरीची वाटचाल सोडून आपल्या आजोळी मुक्कामी आहे.. तिथे तुम्ही आम्ही कोण..?

बाबा महाराज सातारकर, प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार..

महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभव म्हणजेच पंढरीची वारी होय. भागवत धर्मातील वारकरी संप्रदायातील प्रमुख आचारधर्म म्हणून पंढरीची वारी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना ७५० वर्षे तर तुकोबांना ४५० वर्षे झाली आहेत. वारी ही संत ज्ञानदेवपूर्वकालीन आहे. आमच्या कुटुंबात सुमारे सव्वाशे वर्षे वारीची परंपरा आहे.माझ्या जन्मापासून आजपर्यंत कधीही वारी चुकली नाही. माऊलींनी न चुकता वारी घडविली आहे. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी पायी वारी घडू शकणार नाही,  यापेक्षा वारकऱ्यांना दुसरे दु:ख काय असणार? देवाने मोठ्या कौतुकाने सांगितले आहे,‘‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज,सांगतसे गुज पांडुरंग...’’ देवाने जर सांगितले की मला विसरू नका मज आणि देवच जर वारी चुकवतो तर आम्ही काय करायचे? खरे तर आपण आणि आम्ही सगळे माऊलींच्या मागे आहोत. माऊली जिथे आहेत. तिथे आम्ही आहोत,  माऊली सध्या आळंदीत आजोळ घरी आहेत. आम्हीही आपापल्या घरी बसलो आहोत. जेव्हा पंढरपूरचा मुक्काम येइल.अखिल मानव जातींवर मोठे संकट आले आहे. त्यामुळे पायी वारी होणार नाही. मात्र, आम्ही रोज घरी वाचिक आणि मानसिक वारी अनुभवत आहोत. घरात सर्वजण एकत्र येऊन भजन, कीर्तन त्याचबरोबर वाटचालीतील मुक्कामाची अभंग म्हणत आहोत. तसेच वारीच्या निमित्ताने तासभर निरूपण करत आहोत. माझ्या मते वारकºयांना घरी बसूनही वारी अनुभवता येते. पालखी सोहळ्यापूर्वी अनेकांनी मला फोन केले आणि आम्हाला वारी करायची आहे, अशी इच्छा, अपेक्षा व्यक्त केली. त्या वेळेस मी त्यांना सांगितलं की महामारीमुळे आपल्याला वारी करता येत नाही. कोणीही सरकारी नियमांचे उल्लंघन करू नये, आपण प्रत्येकाने घरी बसूनच वारी करावी. माऊली जर वाटचाल सोडून आळंदीत घरी थांबले असेल, तर तुम्ही आम्ही कोण? वारी सोहळ्यात आपण सगळे माऊलींच्या मागे असतो. त्यांच्या मागे जाणे हे आपले कर्तव्य आहे.खरे तर विठ्ठरायाची पंढरीची वारी चुकू नये? असं सर्वांनाच वाटतं, पण नाईलाज आहे. संत वचनाप्रमाणे, ‘‘हीच माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुकू न दे हरी’’ अशी सर्वांची आस आणि भावना आहे. 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी