शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

स्नेहाचा ठाई उचित स्फुरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 05:43 IST

ज्याचे चिंतन खराब आहे, तो वाईट करतो. ज्याचे चिंतन चांगले आहे, तो चांगले करतो. आपले भावविश्व जसे आहे, तसेच आपण वागतो.

- बा.भो. शास्त्रीश्रीचक्रधर मराठीतून उपदेश देत, सारगर्भ छोटे-छोटे वाक्य ते सांगत, त्याला ‘सूत्र’ असे म्हणतात़ त्यातलेच हे एक सुंद सूत्र आहे.‘स्नेहाचा ठाई उचित स्फुरे’मानवी हृदयात अनेक कप्पे असतात़ त्यात एक स्नेहाचा कप्पा आहे, तो स्वामींनी उघडला, ज्यातून स्नेह पाझरते. देहबोलीतून बाहेर येत़ उचित अनुचितांचे तरंग मनात उठतात व वाचेतून शीतोष्ण शब्द बाहेर पडावे, तसे हे स्फुरण़ बरं वाईट घेऊन बाहेर येते़ अनुचित असुरी तर उचित दैवी गुणाचे लक्षण आहे़ असुर नाश, तर दैवी निर्माण करते.अजिंठा वेरूळची सुंदर शिल्प ही दैवी देणे व त्याच शिल्पाला भग्न करणे हे असुरपण़ आपल्याला साई व्हायचे की कसाई, हे स्वत: ठरवावे़ यातले आपले कोण? उचित की अनुचित, ज्याचे चिंतन खराब आहे, तो वाईट करतो़ ज्याचे चिंतन चांगले आहे, तो चांगले करतो़ आपले भावविश्व जसे आहे, तसेच आपण वागतो़ मन विटले, माणसे तुटली, माणूस वर गेला व मानवता खाली आली़ अशा वेळी जगातले अनुचित कमी करावे, उचित वाढावे, म्हणून स्वामींनी ‘स्नेहाचाठाई उचित स्फुरे’ असे एक गोड सूत्र सांगितले आहे़ जिथे पाणी तिथे हिरवळ व प्रसन्नता असते़ हिरवळीत गती व विकास असतो़ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे़ वाळवंटात गरम हवा असते़ तिथे सगळे मृत असते़ स्नेह ओले आहे़ तिथे बाग आहे़ तीळगुळ घ्या गोडगोड बोला, का? गुळात गोडवा तर तिळात तेल आहे़ स्नेहाविना गोडवा फसवा आहे़ स्नेहाची ओळख करून देताना स्वामी म्हणाले, ‘मातेचे स्नेह ते नैसर्गिक.’ इथे आईचा दाखला दिला़ मैत्रीला समान गुण हवेत़ लग्नाला वय हवे़ सगळे हेतुशी बांधलेले आहे़ आईला बाळ पोटात आल्याची चाहूल लागताच, तिच्या स्नेहाला पाझर फुटतो़ ते काळे की गोरे, वजन किती? स्वभाव कसा? कुठलेच गणित ती मांडत नाही़ स्नेह अगणित असते. ते अमूर्त आहे़ ते शब्दात मिसळले की, शब्दांना सुगंध येतो़ स्नेह डोळ्यातून पाझरते़ स्पर्शातून संचारते व जिभेतून मधासारखे टपकते.संत ज्ञानेश्वर म्हणतात-पुढा स्नेह पाझरे। मागा चालती अक्षरे शब्दपाठी अवतरे। कृपाआधी, स्नेह जिवाला ओलावा देते, ते प्रीतीचा पूर्वार्ध व भक्तीचा आरंभ आहे़ तेच धर्माचा आत्मा़ ते वजा करा, धर्म निर्जीव होतो़ जीवन रूक्ष होते, स्नेहाने क्रोध जातो़ कामच निष्काम व राग अनुराग होतो़ मग वासनाच उपासना होते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक