शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

इंद्रियाते न कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 02:53 IST

इंद्रियांच्या आहारी मानवाने जाऊ नये. इंद्रियांच्या कोडकौतुकात खरा आनंद नसतो.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेकठोपनिषिदात एक सुंदर वचन आहे. शरीररूपी रथात आत्मा नावाचा रथी आरूढ झालेला आहे. बुद्धिरूपी सारथी आहे. मनाचे लगाम तिच्या हातात आहेत आणि नानाविध विषयांच्या वाटेने पंचज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये यांची घोडी उधळू लागलेली आहेत. या इंद्रियरूपी घोड्यांना चारा तर खाऊ घातलाच पाहिजे; पण एवढा चारा घालू नये की, चारा खाऊन घोडी माजायला लागतील अन् घोड्यांना एवढे उपाशी ठेवू नये की, चालता-चालताच ती मरून जातील. याचाच अर्थ असा, इंद्रिय पारायण भोगवाद जीवनातील सात्त्विक सुगंधाला नष्ट करतो अन् मग कस्तुरी, चंदन, कमल कुसुमांचा सात्त्विक सुगंध आवडण्यापेक्षा उंची-उंची मद्याचा दर्प तना-मनाला अधिक सुखावू लागतो अन् सुरू होतो स्वच्छंद भोगवादाचा नंगा-नाच. म्हणूनच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाच्या अजस्र प्रवाहाबरोबर वाहवत जाणाऱ्या भोगलंपट माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी संतांना इंद्रिय परायण माणसांची निंंदा करावी लागली. या पाठीमागे केवळ निंंदेचा भाव नव्हता, तर इंद्रिये शुद्धिकरणाचा भाव होता. कारण इंद्रियाचा समूह एवढा बलवान आहे की, विवेक, वैराग्य व ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारणाºया भल्या-भल्या विद्वानांची तो प्रथम शिकार करतो. म्हणून लक्षात असू द्यावे की, इंद्रियांच्या आहारी मानवाने जाऊ नये. इंद्रियांच्या कोडकौतुकात खरा आनंद नसतो. तो काही काळापुरता आनंद देतो. नंतर तो आपल्यालाच शिकार बनवतो. म्हणूनच हा आनंद आळवावरच्या पाण्यासारखा कुठे वितळून जाईल, याचा पत्तासुद्धा लागत नाही.पाश्चिमात्य देशात भोग लालसेने बरबटलेल्या युवा पिढीवर योग्य ते संस्कार न झाल्यामुळे फक्त भोग लालसेने बरबटलेल्या स्वच्छंद समाज मनाची घातक निर्मिती झाली; पण कर्मभूमी व त्यागभूमी नावाजल्या गेलेल्या आपल्या भारतभूमीत हजारो वर्षे उदात्त जीवनमूल्यांचे संस्कार करणारे चालते कल्पतरू युगा-युगातून जन्माला आले, म्हणूनच तर पाश्चात्त्यांएवढी पोकळी आपल्या समाज जीवनात निर्माण झाली नाही. कारण शरीर व इंद्रियाचा समूह हे एक साधन आहे, ज्याचे वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात -इंद्रियासी नेम नाहीं । मुखी राम म्हनोनि काई।जेवीं मासीसवे अन्न । मुखी नेदी ते भोजन।तुका म्हणे रागा संत शिवू नेदती अंगा।इंद्रियाचा वारू स्वैर उधळून जीवनाचा रथ कोलमडून टाकत असेल, तर मुखाने केवळ राम! राम! म्हणून काहीच उपयोग नाही. म्हणून भागवत धर्मातील अनेक संतांनी इंद्रियांना ईश्वरोन्मुख केले व हात, पाय, कान, नाक, डोळे यांना संस्कारित केले; पण दुसºया बाजूला पराकोटीचे इंद्रिय दमनही केले नाही. मुला-माणसांना सोडून वैराग्याच्या गप्पाही संतांनी मारल्या नाहीत आणि मुला-माणसांच्या दोषात लिप्तही झाले नाहीत.प्रपंचातील नानाविध रचनेचा सीमित भोग घेऊन वेळ आल्यावर त्यांचा जाणीवपूर्वक त्याग केला, म्हणूनच ते समाज जीवनास संस्कारित करू शकले. आज घड्याळाचे काटे थोडेसे उलटे फिरू लागले आहेत. इंद्रियांना कोंडून ठेवणारे तथाकथित साधू-संन्याशी नको तेवढ्या प्रमाणात त्यांना कोंडीत आहेत. त्यामुळे ते बंड करून उठत आहेत. नाहीतर कृश होऊन देहालाच नष्ट करीत आहेत, तर दुसºया बाजूला काही मंडळी एवढी भोगलंपट होत आहेत की, प्राणिमात्रांनासुद्धा त्यांची लाज वाटावी. या दोन्हीचा सुवर्णमध्य साधताना तुकोबाराय म्हणाले होते -नरदेहा ऐंसे गोमटे । शोधिता त्रैलोकी न भेटे।नरदेहा ऐंसे ओखटे । अत्यंत खोटे आण नाही।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक