शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रियाते न कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 02:53 IST

इंद्रियांच्या आहारी मानवाने जाऊ नये. इंद्रियांच्या कोडकौतुकात खरा आनंद नसतो.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेकठोपनिषिदात एक सुंदर वचन आहे. शरीररूपी रथात आत्मा नावाचा रथी आरूढ झालेला आहे. बुद्धिरूपी सारथी आहे. मनाचे लगाम तिच्या हातात आहेत आणि नानाविध विषयांच्या वाटेने पंचज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये यांची घोडी उधळू लागलेली आहेत. या इंद्रियरूपी घोड्यांना चारा तर खाऊ घातलाच पाहिजे; पण एवढा चारा घालू नये की, चारा खाऊन घोडी माजायला लागतील अन् घोड्यांना एवढे उपाशी ठेवू नये की, चालता-चालताच ती मरून जातील. याचाच अर्थ असा, इंद्रिय पारायण भोगवाद जीवनातील सात्त्विक सुगंधाला नष्ट करतो अन् मग कस्तुरी, चंदन, कमल कुसुमांचा सात्त्विक सुगंध आवडण्यापेक्षा उंची-उंची मद्याचा दर्प तना-मनाला अधिक सुखावू लागतो अन् सुरू होतो स्वच्छंद भोगवादाचा नंगा-नाच. म्हणूनच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाच्या अजस्र प्रवाहाबरोबर वाहवत जाणाऱ्या भोगलंपट माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी संतांना इंद्रिय परायण माणसांची निंंदा करावी लागली. या पाठीमागे केवळ निंंदेचा भाव नव्हता, तर इंद्रिये शुद्धिकरणाचा भाव होता. कारण इंद्रियाचा समूह एवढा बलवान आहे की, विवेक, वैराग्य व ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारणाºया भल्या-भल्या विद्वानांची तो प्रथम शिकार करतो. म्हणून लक्षात असू द्यावे की, इंद्रियांच्या आहारी मानवाने जाऊ नये. इंद्रियांच्या कोडकौतुकात खरा आनंद नसतो. तो काही काळापुरता आनंद देतो. नंतर तो आपल्यालाच शिकार बनवतो. म्हणूनच हा आनंद आळवावरच्या पाण्यासारखा कुठे वितळून जाईल, याचा पत्तासुद्धा लागत नाही.पाश्चिमात्य देशात भोग लालसेने बरबटलेल्या युवा पिढीवर योग्य ते संस्कार न झाल्यामुळे फक्त भोग लालसेने बरबटलेल्या स्वच्छंद समाज मनाची घातक निर्मिती झाली; पण कर्मभूमी व त्यागभूमी नावाजल्या गेलेल्या आपल्या भारतभूमीत हजारो वर्षे उदात्त जीवनमूल्यांचे संस्कार करणारे चालते कल्पतरू युगा-युगातून जन्माला आले, म्हणूनच तर पाश्चात्त्यांएवढी पोकळी आपल्या समाज जीवनात निर्माण झाली नाही. कारण शरीर व इंद्रियाचा समूह हे एक साधन आहे, ज्याचे वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात -इंद्रियासी नेम नाहीं । मुखी राम म्हनोनि काई।जेवीं मासीसवे अन्न । मुखी नेदी ते भोजन।तुका म्हणे रागा संत शिवू नेदती अंगा।इंद्रियाचा वारू स्वैर उधळून जीवनाचा रथ कोलमडून टाकत असेल, तर मुखाने केवळ राम! राम! म्हणून काहीच उपयोग नाही. म्हणून भागवत धर्मातील अनेक संतांनी इंद्रियांना ईश्वरोन्मुख केले व हात, पाय, कान, नाक, डोळे यांना संस्कारित केले; पण दुसºया बाजूला पराकोटीचे इंद्रिय दमनही केले नाही. मुला-माणसांना सोडून वैराग्याच्या गप्पाही संतांनी मारल्या नाहीत आणि मुला-माणसांच्या दोषात लिप्तही झाले नाहीत.प्रपंचातील नानाविध रचनेचा सीमित भोग घेऊन वेळ आल्यावर त्यांचा जाणीवपूर्वक त्याग केला, म्हणूनच ते समाज जीवनास संस्कारित करू शकले. आज घड्याळाचे काटे थोडेसे उलटे फिरू लागले आहेत. इंद्रियांना कोंडून ठेवणारे तथाकथित साधू-संन्याशी नको तेवढ्या प्रमाणात त्यांना कोंडीत आहेत. त्यामुळे ते बंड करून उठत आहेत. नाहीतर कृश होऊन देहालाच नष्ट करीत आहेत, तर दुसºया बाजूला काही मंडळी एवढी भोगलंपट होत आहेत की, प्राणिमात्रांनासुद्धा त्यांची लाज वाटावी. या दोन्हीचा सुवर्णमध्य साधताना तुकोबाराय म्हणाले होते -नरदेहा ऐंसे गोमटे । शोधिता त्रैलोकी न भेटे।नरदेहा ऐंसे ओखटे । अत्यंत खोटे आण नाही।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक