शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

नागपंचमी..हक्कानं माहेरी जायचा सण ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:15 IST

मनभावन श्रावण...

नागपंचमी. श्रीकृष्णाने कालियामर्दन केले, तो दिवस म्हणजे नागपंचमी. पूर्वीच्या काळी, नव्या नवरीसाठी माहेरी यायचा हक्काचा सण म्हणजे, नागपंचमी. मग भावाला माहेरी नेण्यास सांगण्यासाठी बहुतेक नागाला भाऊ समजून, त्याची विनवणी केली जात असावी. आणि म्हणून आदल्या दिवशी भावाचा उपास केला जातो.

आईकडून मेंदी, बांगड्या, टिकल्या, नेलपॉलिश या सगळ्या गोष्टी घेतल्या जायच्या. कारण, त्या काळी अशा गोष्टी फक्त सणाला, त्यातल्या त्यात नागपंचमीलाच मिळायच्या. मग सणाच्या दिवशी लवकर उठून, नटून थटून गावाबाहेर कुठे शेतात वारूळ असेल, तिथे पूजेला जायचं. प्रत्येक वारुळात नागोबा असतात, या श्रद्धेने पूजा केली जायची. शंकराच्या मंदिरात जायचं आणि परत गारूड्या जवळच्या नागालासुद्धा दूध-लाह्या दिल्या जायच्या. अशा सगळ्या पूजा झाल्या की, माहेरवाशिणी खेळण्यांत दंग व्हायच्या. भावांनी त्यांच्यासाठी झाडाला मोठमोठे झोके बांधून दिलेले असायचे. आपल्या भारतीय सणांचे हेच वैशिष्ट्य आहे की, इथे ठराविक गोष्ट ठराविक सणालाच केली जाते.

झोके पंचमीलाच बांधले जातात. खरं तर, नागाचं ते सळसळतं रूपच आपल्याला आकर्षित करत असतं. बत्तीस शिराळ्यातला तर नागपंचमीचा सण जगप्रसिद्ध झाला आहे. तिथल्या वातावरणामध्ये खूप साप-नाग आढळतात. तिथे ग्रामस्थ या दिवशी नाग पकडतात. दिवसभर नागांची पूजा करून संध्याकाळी त्यांना परत निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात येते. यादिवशी स्त्रिया स्वयंपाकात चिरणे, कापणे, भाजणे या गोष्टी टाळतात. कारण ती भावाला नागात पाहत असते. तिच्याकडून त्याला काही अपाय होऊ नये, या श्रद्धेने ही परंपरा पडली आहे. ती आपल्या घरी श्रावण सोमवार, श्रावण शुक्रवार हे पण मोठ्या उत्साहाने साजरे करत असते. मग, तिचा भाऊ राखीपौर्णिमेच्या निमित्ताने परत एकदा भेटतो. भाऊ-बहिणीच्या गोड नात्यातला, गोड क्षण म्हणजे, भावाच्या हातावर राखी बांधणे.राखी बांधून फिरणारे, सगळे भाऊ किती सोज्वळ दिसतात नं? हाच दिवस, कोळी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा असतो. मान्सूनमध्ये खवळलेल्या दर्याला नारळ अर्पण करून शांत करण्याची प्रथा आहे.

या दिवसानंतर ते लोक, परत मासेमारीसाठी दर्यात होड्या घालतात. मग, येते ती श्रीकृष्ण जन्माष्टमी. दिवसभर उपवास करून, मध्यरात्र बारा वाजता श्रीकृष्ण जन्म झाल्यावरच पूजा करून हा उपवास सुटत असतो. उत्तर भारतात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. असा हा कॅलेंडरमध्येसुद्धा पवित्र केशरी रंगात छापलेला पवित्र महिना. घरोघरी सत्यनारायण पूजा होत असते. बाकीची व्रतवैकल्येसुद्धा श्रद्धेने होत असतात. आणि अशा या पवित्र महिन्याचा शेवट होतो बैलपोळ्याने. फक्त शेतकरीच हा सण साजरा करत नाहीत तर, घरोघरी मातीच्या प्रतीकात्मक बैलाचे पूजन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. काही ठिकाणी हा सण भाद्रपद महिन्यातच साजरा केला जातो. निसर्गाच्या अगदी जवळ जाणारा हा पवित्र महिना. निसर्गातल्या नाग, बैल, दर्या आदी गोष्टींप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आजकाल काही सणांचे स्वरूप बदलले असले तरी, सण साजरे करायचा उत्साह फक्त आपल्या भारतीयांमध्येच.-निर्मला मठपती

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक