शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:13 IST

 वाट दिवेघाटाची 

वारकरी पंढरीची ओढ मनामध्ये निर्माण करून श्रद्धापूर्वक अंत:करणाने पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. आळंदी, पुणे मुक्कामी विसावल्यानंतर सासवडकडे जाण्यासाठी मोठ्या उत्साहात पुढे मार्गस्थ होतात. कारण, दिवेघाटाची ओढ सर्व वारकरी भाविकांना आकर्षित करते. दिवेघाट हा नैसर्गिकरीत्या खूपच सुंदर असून वाटचाल करताना जर पाऊस आला तर दुधात साखर याप्रमाणे वारकरी भाविकांना होणारा आनंद द्विगुणित होतो आणि यंदा तसेच झाले.

दिवेघाटातून पालखी मार्गस्थ होताना पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आणि वारकरी भाविकांची चालण्याची गती वाढू लागली. पाऊस सुरू झाल्यामुळे पावसाचा ओलावा आणि वारकºयांच्या मनामध्ये असलेला भावाचा ओलावा यांचा संगम झाल्यामुळे वारकरी भाविकांचा उत्साह चेहºयावरूनओसंडत होता ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाची’ या संत वचनाप्रमाणे वारकरी भाविकांच्या मनातील श्रद्धा क्रियेतून ओसंडत होती. दिवेघाटामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला वेगवेगळ्या बैलजोडी जोडलेल्या असतात.

परंपरेने त्या भागातील शेतकºयांच्या बैलजोडीला मान दिला जातो. त्या परिसरातील शेतकरी पालखीला बैलजोडी लावल्यामुळे खूपच आनंदी होतात. कारण, आपली बैलजोडी पालखीला लावल्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजतात. दिवे घाटातून पालखी वर घेऊन जाण्यासाठी पुणे शहरातील अनेक तरुण-तरुणी सहभागी होऊन पालखीला घाटातून पार करण्यासाठी मदत करतात. तरुणांचाही उत्साह पाहण्यासारखा असतो. सध्या विज्ञानाने प्रगती झालेली असतानासुद्धा तरुणवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पालखीमध्ये सहभागी असतो. कारण माऊलींच्या सेवेचा आनंद तरुणांना आकर्षित करतो. दिवेघाटातून पालखी मार्गस्थ होत असताना नैसर्गिकरित्या व आध्यात्मिक दृष्टीने मनाची उंची वाढलेली असते. त्यामुळे दरवर्षी दिवेघाटातून पालखी जाताना आपण पालखीबरोबर असावे, असे अनेक तरुणांना व वारकºयांना वाटत असते. दिवेघाटातून पालखी पुढे मार्गस्थ होते. त्यावेळी वारकरी भाविक थकले असले तरी त्यांच्या मनातील आनंद त्यांना त्यांच्या शारीरिक थकव्याकडे लक्षही जाऊ देत नाहीत.

दिवेघाट पार केल्यानंतर तो आनंद घेऊन ही सर्व वारकरी मंडळी पुढे सासवडला दोन दिवसांच्या मुक्कामी थांबतात. सासवड संत सोपानदेवांचे समाधी गाव आहे. या स्थानावरून संत सोपानकाका यांची पालखी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि त्या प्रस्थानाला सर्व वारकरी भाविक, दिंडीप्रमुख उपस्थित असतात हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून भाविकांची गर्दी झालेली असते. सासवडला पोहोचल्यानंतर वारकरी भाविकांना खूप समाधान लाभते. कारण चालत असताना आळंदी ते पुणे व पुणे ते सासवड हे दोन मुक्कामाचे टप्पे खूपच लांब असल्यामुळे वारकºयांना मार्गावरील बरेच अंतर कमी झाल्याचे समाधान लाभते. तो भाविक सोयीसुविधांचा विचार न करता नामस्मरण, भजन करत पंढरीची वाट चालत राहतो. त्यामुळे या वारीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. - सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर