शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:13 IST

 वाट दिवेघाटाची 

वारकरी पंढरीची ओढ मनामध्ये निर्माण करून श्रद्धापूर्वक अंत:करणाने पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. आळंदी, पुणे मुक्कामी विसावल्यानंतर सासवडकडे जाण्यासाठी मोठ्या उत्साहात पुढे मार्गस्थ होतात. कारण, दिवेघाटाची ओढ सर्व वारकरी भाविकांना आकर्षित करते. दिवेघाट हा नैसर्गिकरीत्या खूपच सुंदर असून वाटचाल करताना जर पाऊस आला तर दुधात साखर याप्रमाणे वारकरी भाविकांना होणारा आनंद द्विगुणित होतो आणि यंदा तसेच झाले.

दिवेघाटातून पालखी मार्गस्थ होताना पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आणि वारकरी भाविकांची चालण्याची गती वाढू लागली. पाऊस सुरू झाल्यामुळे पावसाचा ओलावा आणि वारकºयांच्या मनामध्ये असलेला भावाचा ओलावा यांचा संगम झाल्यामुळे वारकरी भाविकांचा उत्साह चेहºयावरूनओसंडत होता ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाची’ या संत वचनाप्रमाणे वारकरी भाविकांच्या मनातील श्रद्धा क्रियेतून ओसंडत होती. दिवेघाटामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला वेगवेगळ्या बैलजोडी जोडलेल्या असतात.

परंपरेने त्या भागातील शेतकºयांच्या बैलजोडीला मान दिला जातो. त्या परिसरातील शेतकरी पालखीला बैलजोडी लावल्यामुळे खूपच आनंदी होतात. कारण, आपली बैलजोडी पालखीला लावल्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजतात. दिवे घाटातून पालखी वर घेऊन जाण्यासाठी पुणे शहरातील अनेक तरुण-तरुणी सहभागी होऊन पालखीला घाटातून पार करण्यासाठी मदत करतात. तरुणांचाही उत्साह पाहण्यासारखा असतो. सध्या विज्ञानाने प्रगती झालेली असतानासुद्धा तरुणवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पालखीमध्ये सहभागी असतो. कारण माऊलींच्या सेवेचा आनंद तरुणांना आकर्षित करतो. दिवेघाटातून पालखी मार्गस्थ होत असताना नैसर्गिकरित्या व आध्यात्मिक दृष्टीने मनाची उंची वाढलेली असते. त्यामुळे दरवर्षी दिवेघाटातून पालखी जाताना आपण पालखीबरोबर असावे, असे अनेक तरुणांना व वारकºयांना वाटत असते. दिवेघाटातून पालखी पुढे मार्गस्थ होते. त्यावेळी वारकरी भाविक थकले असले तरी त्यांच्या मनातील आनंद त्यांना त्यांच्या शारीरिक थकव्याकडे लक्षही जाऊ देत नाहीत.

दिवेघाट पार केल्यानंतर तो आनंद घेऊन ही सर्व वारकरी मंडळी पुढे सासवडला दोन दिवसांच्या मुक्कामी थांबतात. सासवड संत सोपानदेवांचे समाधी गाव आहे. या स्थानावरून संत सोपानकाका यांची पालखी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि त्या प्रस्थानाला सर्व वारकरी भाविक, दिंडीप्रमुख उपस्थित असतात हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून भाविकांची गर्दी झालेली असते. सासवडला पोहोचल्यानंतर वारकरी भाविकांना खूप समाधान लाभते. कारण चालत असताना आळंदी ते पुणे व पुणे ते सासवड हे दोन मुक्कामाचे टप्पे खूपच लांब असल्यामुळे वारकºयांना मार्गावरील बरेच अंतर कमी झाल्याचे समाधान लाभते. तो भाविक सोयीसुविधांचा विचार न करता नामस्मरण, भजन करत पंढरीची वाट चालत राहतो. त्यामुळे या वारीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. - सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर