शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:13 IST

 वाट दिवेघाटाची 

वारकरी पंढरीची ओढ मनामध्ये निर्माण करून श्रद्धापूर्वक अंत:करणाने पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. आळंदी, पुणे मुक्कामी विसावल्यानंतर सासवडकडे जाण्यासाठी मोठ्या उत्साहात पुढे मार्गस्थ होतात. कारण, दिवेघाटाची ओढ सर्व वारकरी भाविकांना आकर्षित करते. दिवेघाट हा नैसर्गिकरीत्या खूपच सुंदर असून वाटचाल करताना जर पाऊस आला तर दुधात साखर याप्रमाणे वारकरी भाविकांना होणारा आनंद द्विगुणित होतो आणि यंदा तसेच झाले.

दिवेघाटातून पालखी मार्गस्थ होताना पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आणि वारकरी भाविकांची चालण्याची गती वाढू लागली. पाऊस सुरू झाल्यामुळे पावसाचा ओलावा आणि वारकºयांच्या मनामध्ये असलेला भावाचा ओलावा यांचा संगम झाल्यामुळे वारकरी भाविकांचा उत्साह चेहºयावरूनओसंडत होता ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाची’ या संत वचनाप्रमाणे वारकरी भाविकांच्या मनातील श्रद्धा क्रियेतून ओसंडत होती. दिवेघाटामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला वेगवेगळ्या बैलजोडी जोडलेल्या असतात.

परंपरेने त्या भागातील शेतकºयांच्या बैलजोडीला मान दिला जातो. त्या परिसरातील शेतकरी पालखीला बैलजोडी लावल्यामुळे खूपच आनंदी होतात. कारण, आपली बैलजोडी पालखीला लावल्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजतात. दिवे घाटातून पालखी वर घेऊन जाण्यासाठी पुणे शहरातील अनेक तरुण-तरुणी सहभागी होऊन पालखीला घाटातून पार करण्यासाठी मदत करतात. तरुणांचाही उत्साह पाहण्यासारखा असतो. सध्या विज्ञानाने प्रगती झालेली असतानासुद्धा तरुणवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पालखीमध्ये सहभागी असतो. कारण माऊलींच्या सेवेचा आनंद तरुणांना आकर्षित करतो. दिवेघाटातून पालखी मार्गस्थ होत असताना नैसर्गिकरित्या व आध्यात्मिक दृष्टीने मनाची उंची वाढलेली असते. त्यामुळे दरवर्षी दिवेघाटातून पालखी जाताना आपण पालखीबरोबर असावे, असे अनेक तरुणांना व वारकºयांना वाटत असते. दिवेघाटातून पालखी पुढे मार्गस्थ होते. त्यावेळी वारकरी भाविक थकले असले तरी त्यांच्या मनातील आनंद त्यांना त्यांच्या शारीरिक थकव्याकडे लक्षही जाऊ देत नाहीत.

दिवेघाट पार केल्यानंतर तो आनंद घेऊन ही सर्व वारकरी मंडळी पुढे सासवडला दोन दिवसांच्या मुक्कामी थांबतात. सासवड संत सोपानदेवांचे समाधी गाव आहे. या स्थानावरून संत सोपानकाका यांची पालखी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि त्या प्रस्थानाला सर्व वारकरी भाविक, दिंडीप्रमुख उपस्थित असतात हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून भाविकांची गर्दी झालेली असते. सासवडला पोहोचल्यानंतर वारकरी भाविकांना खूप समाधान लाभते. कारण चालत असताना आळंदी ते पुणे व पुणे ते सासवड हे दोन मुक्कामाचे टप्पे खूपच लांब असल्यामुळे वारकºयांना मार्गावरील बरेच अंतर कमी झाल्याचे समाधान लाभते. तो भाविक सोयीसुविधांचा विचार न करता नामस्मरण, भजन करत पंढरीची वाट चालत राहतो. त्यामुळे या वारीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. - सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर