शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

मनासाठी विचारांचे पोषण गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 4:11 AM

नकारात्मक विचार वाढले, तर मन कमकुवत होईल. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांना वाट मिळेल.

- माता अमृतानंदमयीशरीराला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे मनाला चांगल्या विचारांच्या पोषणाची गरज असते. कोणत्या प्रकारचे अन्न आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि कोणत्या प्रकारचे धोकादायक असते हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यानुसार आपण आपला आहार ठरवायला हवा. आपण केवळ गोडच पदार्थ खाल्ले, तर आपले शरीर आजारांना बळी पडेल. त्याचप्रमाणे जर नकारात्मक विचार वाढले, तर मन कमकुवत होईल. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांना वाट मिळेल. मन हे विचारांचा प्रवाह असते. जर विचार नसतील, तर मन नसेल. मनावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर आपल्या विचारांबाबत जागरूक व्हायला हवे. कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते झिडकारायचे याबाबत आपण कायम सावध असले पाहिजे. पंतप्रधानांनी कायम त्यांच्या मंत्र्यांवर देखरेख करायला हवी. त्यांच्या बुद्धिमत्तेची क्षमता त्यांना माहीत असायला हवीच, त्यांची मते आणि सूचना कितपत स्वीकारायच्या हेही माहीत असायला हवे. जर त्यांनी मंत्री म्हणेल ते सर्व ऐकले आणि फारसा सारासार विचार न करता कार्यवाही केली, तर त्यांना आपले पद गमवावे लागेल. हीच गोष्ट विचारांनाही लागू होते. विचार समजून घेणे आणि त्यानुसार त्यांना हाताळणे अतिशय आवश्यक आहे. तसे न झाल्यास ते विनाश करतील. शेत पिकते तिथे तण माजतातच. ते अधूनमधून मुळापासून काढून टाकले पाहिजेत. नाहीतर ते सर्व खत शोषून पिकाचा नाश करतील. मात्र, आपण पिकांना योग्य वेळेस पुरेसे पाणी आणि खत द्यायला हवे. कीटकांमुळे पिकाचा नाश होऊ नये यासाठी कीटकनाशके फवारली पाहिजेत. त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे नकारात्मक विचार आपोआप फोफावत असतात, त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. मात्र, चांगल्या विचारांच्या मशागतीसाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक