शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

मन: शांती - मनवा.. पोपटपंची सब व्यर्थ है....! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 21:27 IST

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी पाऊले ,आज दर्शन करावयास मिळतील का ? हा विचार माझ्या  मनात आजही घोळतोय....

- डॉ. दत्ता कोहिनकर- रविवारचा दिवस, सुट्टी असल्यामुळे निवांत सोफ्यावर पेपर वाचत बसलो होतो. तेवढ्यात राजाभाऊचा फोन आला. तो म्हणाला अरण्येश्?वर मंदिराच्या सभागृहात माझे गुरू दीनानाथ महाराजांचे प्रवचन आहे. अर्धा त्यास ते ज्ञानेश्वरीवर निरूपण करणार आहेत. त्यानंतर भक्तदर्शन व प्रसादग्रहण असा कार्यक्रम आहे. त्यानंतर तुम्हाला व त्यांना माज्या घरी न्यायची माझी तीव्र इच्छा आहे. तरी आपण आवरून तयार रहा. मी आपल्याला न्यावयास येतो अशी विनंती राजाभाऊंनी केली. तासाभरातच राजाभाऊ कार घेऊन मला न्यायला आला व आम्ही दोघेही महाराजांच्या प्रवचनस्थळी पोहचलो. महाराज ज्ञानेशवरीवर प्रवचन देते होते. जे जे भेटे भूत - ते ते मानावे भगवंत (प्रत्येक प्राण्यात ईश्वराचा अंश आहे, तो ईश्वरच आहे.) यावर महाराजांनी अर्धा तास खूप सुंदर विवेचन केले. प्रवचन संपल्यावर भक्तमंडळींची तुडूंब गर्दी , साष्टांग दंडवत व आशीर्वद प्रदान -प्रसाद ग्रहण कार्यक्रम संपल्यावर महाराज राजाभाऊंच्या गाडीत बसले. गाडीत महाराजांचा जप(नामस्मरण) जोरात चालू होता. नेमके मित्रमंडळ चौकात एका तरूणाने राजाभाऊच्या गाडीला डॅश मारला व तो राजाभाऊलाच शिवीगाळ करू लागला. मी दोघांना समजवण्याच्या प्रयत्नात असतानाच महाराज पुढे आले व त्यांनी त्या तरूणाला मला ओळखतो का नायक?  हजारो लोक माज्या पाया पडतात असे म्हणत महाराजांनी त्या तरूणाला धक्काबुक्की केली. मी महाराजांना हात जोडून गाडीत बसवले व समजोता करून पुन्हा राजाभाऊंनी गाडी सुरू केली. राजाभाऊंच्या घरी महाराजांचे स्वागत जोरात झाले. माज्या मनात एकच विचार जोरात घोळत होता. ह्यह्यजे जे भेटे भूत - ते ते मानावे भगवंत प्रत्येक प्राण्यात देवच आहे हे अर्धा तास लोकांना समजावून सांगणारे महाराज वेळ आल्यानंतर समोरच्या माणसातील देवत्व का नाही पाहू शकले ? त्यावेळी आचार्य ओशोंच्या प्रवचनातील एक गोष्ट मला लगेच आठवली. एका राजाकडे एक संन्यासी येतो. एकाच वेळी हजारो लोकांना आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर ह्यअध्यात्मह्ण समजावून सांगण्यात त्याची खूप किर्ती पसरलेली असते. एकदा तो राजाच्या राजमहालावर येतो. राजा आपल्या अलिशान बेडवर निवांत बसलेला असतो. दासी त्याला वारा घालत त्यांची सेवा करत असते. राजाला तो संन्यासी सर्वस्वाचा त्याग करून अध्यात्ममार्गात प्रवेश करण्याचा सल्ला देतो. राजा, त्या संन्याशाला आपल्या राजवाडयातच ऐश्वर्यसंपन्न खोली राहावयास देतो. दुसºया दिवशी संन्यासी राजवाड्यासमोरच असलेल्या पिंपळाच्या पारावर जप करत बसलेला राजाला दिसतो. राजा आपल्या लोकांना चारही बाजूने राजमहाल पेटवण्यास सांगतो. राजमहाल पेटताच संन्याशाचे लक्ष पेटत्या राजमहालाकडे जाते, तो पळत राजाजवळ येऊ म्हणतो, महाराज हे काय केले  ?  महाराज संन्याशाला म्हणाले, तुम्ही तर सांगितले ना, सर्वस्वाचा त्याग करायला - म्हणून मी महालच पेटवून दिला. आगीचे उसळलेले डोम पाहून संन्यासी जोरात ओरडला. महाराज थांबा-थांबा. माझी लंगोट आतील रूममध्येच राहिलीय व तो पळत राजवाड्यात शिरला. राजाला सर्वस्वाचा त्याग करावयास सांगणारा व हजारो लोकांना प्रवचन देणारा संन्यासी मात्र आपला लंगोट सोडू शकत नव्हता. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी पाऊले ,आज दर्शन करावयास मिळतील का ? हा विचार माझ्या  मनात आजही घोळतोय. खरोखर मित्रांनो प्रॅक्टीकल आयुष्य जगणं खूप महत्वाचं आहे. एक का होईना सदविचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न करू या .?? पोपटपंची सब व्यर्थ है... .

टॅग्स :PuneपुणेMeditationसाधना