शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

मन: शांती - मनवा.. पोपटपंची सब व्यर्थ है....! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 21:27 IST

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी पाऊले ,आज दर्शन करावयास मिळतील का ? हा विचार माझ्या  मनात आजही घोळतोय....

- डॉ. दत्ता कोहिनकर- रविवारचा दिवस, सुट्टी असल्यामुळे निवांत सोफ्यावर पेपर वाचत बसलो होतो. तेवढ्यात राजाभाऊचा फोन आला. तो म्हणाला अरण्येश्?वर मंदिराच्या सभागृहात माझे गुरू दीनानाथ महाराजांचे प्रवचन आहे. अर्धा त्यास ते ज्ञानेश्वरीवर निरूपण करणार आहेत. त्यानंतर भक्तदर्शन व प्रसादग्रहण असा कार्यक्रम आहे. त्यानंतर तुम्हाला व त्यांना माज्या घरी न्यायची माझी तीव्र इच्छा आहे. तरी आपण आवरून तयार रहा. मी आपल्याला न्यावयास येतो अशी विनंती राजाभाऊंनी केली. तासाभरातच राजाभाऊ कार घेऊन मला न्यायला आला व आम्ही दोघेही महाराजांच्या प्रवचनस्थळी पोहचलो. महाराज ज्ञानेशवरीवर प्रवचन देते होते. जे जे भेटे भूत - ते ते मानावे भगवंत (प्रत्येक प्राण्यात ईश्वराचा अंश आहे, तो ईश्वरच आहे.) यावर महाराजांनी अर्धा तास खूप सुंदर विवेचन केले. प्रवचन संपल्यावर भक्तमंडळींची तुडूंब गर्दी , साष्टांग दंडवत व आशीर्वद प्रदान -प्रसाद ग्रहण कार्यक्रम संपल्यावर महाराज राजाभाऊंच्या गाडीत बसले. गाडीत महाराजांचा जप(नामस्मरण) जोरात चालू होता. नेमके मित्रमंडळ चौकात एका तरूणाने राजाभाऊच्या गाडीला डॅश मारला व तो राजाभाऊलाच शिवीगाळ करू लागला. मी दोघांना समजवण्याच्या प्रयत्नात असतानाच महाराज पुढे आले व त्यांनी त्या तरूणाला मला ओळखतो का नायक?  हजारो लोक माज्या पाया पडतात असे म्हणत महाराजांनी त्या तरूणाला धक्काबुक्की केली. मी महाराजांना हात जोडून गाडीत बसवले व समजोता करून पुन्हा राजाभाऊंनी गाडी सुरू केली. राजाभाऊंच्या घरी महाराजांचे स्वागत जोरात झाले. माज्या मनात एकच विचार जोरात घोळत होता. ह्यह्यजे जे भेटे भूत - ते ते मानावे भगवंत प्रत्येक प्राण्यात देवच आहे हे अर्धा तास लोकांना समजावून सांगणारे महाराज वेळ आल्यानंतर समोरच्या माणसातील देवत्व का नाही पाहू शकले ? त्यावेळी आचार्य ओशोंच्या प्रवचनातील एक गोष्ट मला लगेच आठवली. एका राजाकडे एक संन्यासी येतो. एकाच वेळी हजारो लोकांना आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर ह्यअध्यात्मह्ण समजावून सांगण्यात त्याची खूप किर्ती पसरलेली असते. एकदा तो राजाच्या राजमहालावर येतो. राजा आपल्या अलिशान बेडवर निवांत बसलेला असतो. दासी त्याला वारा घालत त्यांची सेवा करत असते. राजाला तो संन्यासी सर्वस्वाचा त्याग करून अध्यात्ममार्गात प्रवेश करण्याचा सल्ला देतो. राजा, त्या संन्याशाला आपल्या राजवाडयातच ऐश्वर्यसंपन्न खोली राहावयास देतो. दुसºया दिवशी संन्यासी राजवाड्यासमोरच असलेल्या पिंपळाच्या पारावर जप करत बसलेला राजाला दिसतो. राजा आपल्या लोकांना चारही बाजूने राजमहाल पेटवण्यास सांगतो. राजमहाल पेटताच संन्याशाचे लक्ष पेटत्या राजमहालाकडे जाते, तो पळत राजाजवळ येऊ म्हणतो, महाराज हे काय केले  ?  महाराज संन्याशाला म्हणाले, तुम्ही तर सांगितले ना, सर्वस्वाचा त्याग करायला - म्हणून मी महालच पेटवून दिला. आगीचे उसळलेले डोम पाहून संन्यासी जोरात ओरडला. महाराज थांबा-थांबा. माझी लंगोट आतील रूममध्येच राहिलीय व तो पळत राजवाड्यात शिरला. राजाला सर्वस्वाचा त्याग करावयास सांगणारा व हजारो लोकांना प्रवचन देणारा संन्यासी मात्र आपला लंगोट सोडू शकत नव्हता. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी पाऊले ,आज दर्शन करावयास मिळतील का ? हा विचार माझ्या  मनात आजही घोळतोय. खरोखर मित्रांनो प्रॅक्टीकल आयुष्य जगणं खूप महत्वाचं आहे. एक का होईना सदविचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न करू या .?? पोपटपंची सब व्यर्थ है... .

टॅग्स :PuneपुणेMeditationसाधना