शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

निष्ठावंत भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 4:25 AM

निष्ठा नावाच्या जीवनमूल्यातूनच त्यांना साध्यरूपी भगवंत प्राप्त होतो, परंतु तोपर्यंत अत्यंत संयमाने वाटचाल करीत साधक डळमळीत होत नाहीत.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेवरी हे आकाश पडों पाहें । ब्रह्म घोळ भंगा जाय ॥या वचनाप्रमाणे डोईवर आपत्तीचे आभाळ कोसळू लागले. आधार देणारी धरतीच दुभंगून निराधार करू लागली. मनी-मानसी पाहिलेल्या स्वप्नांची लक्तरे झाली. महत्त्वाकांक्षेचे कोळसे झाले, तरीही ज्यांची जीवनावरची, तत्त्वावरची आणि सुपर नॅचरल पॉवरवरची निष्ठा डळमळीत होत नाही, तेच खरे निष्ठावंत साधक असतात. ज्यांचा भाव निष्ठावंत असतो, देह निष्ठावंत असतो. या निष्ठा नावाच्या जीवनमूल्यातूनच त्यांना साध्यरूपी भगवंत प्राप्त होतो, परंतु तोपर्यंत अत्यंत संयमाने वाटचाल करीत साधक डळमळीत होत नाहीत. कारण त्यांना माहीत असते, ज्यांची पावले वाळवंट तुडवितात तेच हिरवळीचा शोध घेतात. संत नामदेव यांच्या बाल्यावस्थेतील एक घटना निष्ठा नावाच्या जीवनमूल्याचे मूर्तिमंत प्रतीक मानली जाते. दामाशेटीच्या गैरहजेरीत नामदेवाने एकदा विठ्ठलासमोर नैवेद्याचे ताट ठेवले, पण देव मात्र हालेना, चालेना, डुलेना काहीच करेना व नैवेद्यसुद्धा खाईना, तेव्हा बालभक्त नामदेवांनी विठ्ठलास निक्षून सांगितले, एथोनिया नुठवु माथा । मरणा वाचोनी सर्वथा । पुढे आयुष्यभर याच निष्ठाभावाचे नामदेवांनी जतन केले, म्हणूनच ते भागवत धर्माचे विस्तारक झाले. ही घटना हाच भाव व्यक्त करते की, भक्ताकडे काहीच साधने नसली, तरी तो अनन्य निष्ठाभावावर जगावा; कारण निष्ठा हे भक्तियोगातील असे पोषणमूल्य आहे की, जिच्यापुढे अमृतही फिके पडते. अलंकारांनी मढवलेल्या मढ्यावर पुन्हा-पुन्हा कितीही साजश्रृंगार केला, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. याउलट काळ्या-कुळकुळीत देहयष्टीचे पोरं जर आईच्या दुधावर पोसले गेले, तर आपल्या आतली तेजस्विता प्रकट केल्याशिवाय राहात नाही.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक