शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

निष्ठावंत भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 04:26 IST

निष्ठा नावाच्या जीवनमूल्यातूनच त्यांना साध्यरूपी भगवंत प्राप्त होतो, परंतु तोपर्यंत अत्यंत संयमाने वाटचाल करीत साधक डळमळीत होत नाहीत.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेवरी हे आकाश पडों पाहें । ब्रह्म घोळ भंगा जाय ॥या वचनाप्रमाणे डोईवर आपत्तीचे आभाळ कोसळू लागले. आधार देणारी धरतीच दुभंगून निराधार करू लागली. मनी-मानसी पाहिलेल्या स्वप्नांची लक्तरे झाली. महत्त्वाकांक्षेचे कोळसे झाले, तरीही ज्यांची जीवनावरची, तत्त्वावरची आणि सुपर नॅचरल पॉवरवरची निष्ठा डळमळीत होत नाही, तेच खरे निष्ठावंत साधक असतात. ज्यांचा भाव निष्ठावंत असतो, देह निष्ठावंत असतो. या निष्ठा नावाच्या जीवनमूल्यातूनच त्यांना साध्यरूपी भगवंत प्राप्त होतो, परंतु तोपर्यंत अत्यंत संयमाने वाटचाल करीत साधक डळमळीत होत नाहीत. कारण त्यांना माहीत असते, ज्यांची पावले वाळवंट तुडवितात तेच हिरवळीचा शोध घेतात. संत नामदेव यांच्या बाल्यावस्थेतील एक घटना निष्ठा नावाच्या जीवनमूल्याचे मूर्तिमंत प्रतीक मानली जाते. दामाशेटीच्या गैरहजेरीत नामदेवाने एकदा विठ्ठलासमोर नैवेद्याचे ताट ठेवले, पण देव मात्र हालेना, चालेना, डुलेना काहीच करेना व नैवेद्यसुद्धा खाईना, तेव्हा बालभक्त नामदेवांनी विठ्ठलास निक्षून सांगितले, एथोनिया नुठवु माथा । मरणा वाचोनी सर्वथा । पुढे आयुष्यभर याच निष्ठाभावाचे नामदेवांनी जतन केले, म्हणूनच ते भागवत धर्माचे विस्तारक झाले. ही घटना हाच भाव व्यक्त करते की, भक्ताकडे काहीच साधने नसली, तरी तो अनन्य निष्ठाभावावर जगावा; कारण निष्ठा हे भक्तियोगातील असे पोषणमूल्य आहे की, जिच्यापुढे अमृतही फिके पडते. अलंकारांनी मढवलेल्या मढ्यावर पुन्हा-पुन्हा कितीही साजश्रृंगार केला, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. याउलट काळ्या-कुळकुळीत देहयष्टीचे पोरं जर आईच्या दुधावर पोसले गेले, तर आपल्या आतली तेजस्विता प्रकट केल्याशिवाय राहात नाही.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक