शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

निष्ठावंत भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 04:26 IST

निष्ठा नावाच्या जीवनमूल्यातूनच त्यांना साध्यरूपी भगवंत प्राप्त होतो, परंतु तोपर्यंत अत्यंत संयमाने वाटचाल करीत साधक डळमळीत होत नाहीत.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेवरी हे आकाश पडों पाहें । ब्रह्म घोळ भंगा जाय ॥या वचनाप्रमाणे डोईवर आपत्तीचे आभाळ कोसळू लागले. आधार देणारी धरतीच दुभंगून निराधार करू लागली. मनी-मानसी पाहिलेल्या स्वप्नांची लक्तरे झाली. महत्त्वाकांक्षेचे कोळसे झाले, तरीही ज्यांची जीवनावरची, तत्त्वावरची आणि सुपर नॅचरल पॉवरवरची निष्ठा डळमळीत होत नाही, तेच खरे निष्ठावंत साधक असतात. ज्यांचा भाव निष्ठावंत असतो, देह निष्ठावंत असतो. या निष्ठा नावाच्या जीवनमूल्यातूनच त्यांना साध्यरूपी भगवंत प्राप्त होतो, परंतु तोपर्यंत अत्यंत संयमाने वाटचाल करीत साधक डळमळीत होत नाहीत. कारण त्यांना माहीत असते, ज्यांची पावले वाळवंट तुडवितात तेच हिरवळीचा शोध घेतात. संत नामदेव यांच्या बाल्यावस्थेतील एक घटना निष्ठा नावाच्या जीवनमूल्याचे मूर्तिमंत प्रतीक मानली जाते. दामाशेटीच्या गैरहजेरीत नामदेवाने एकदा विठ्ठलासमोर नैवेद्याचे ताट ठेवले, पण देव मात्र हालेना, चालेना, डुलेना काहीच करेना व नैवेद्यसुद्धा खाईना, तेव्हा बालभक्त नामदेवांनी विठ्ठलास निक्षून सांगितले, एथोनिया नुठवु माथा । मरणा वाचोनी सर्वथा । पुढे आयुष्यभर याच निष्ठाभावाचे नामदेवांनी जतन केले, म्हणूनच ते भागवत धर्माचे विस्तारक झाले. ही घटना हाच भाव व्यक्त करते की, भक्ताकडे काहीच साधने नसली, तरी तो अनन्य निष्ठाभावावर जगावा; कारण निष्ठा हे भक्तियोगातील असे पोषणमूल्य आहे की, जिच्यापुढे अमृतही फिके पडते. अलंकारांनी मढवलेल्या मढ्यावर पुन्हा-पुन्हा कितीही साजश्रृंगार केला, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. याउलट काळ्या-कुळकुळीत देहयष्टीचे पोरं जर आईच्या दुधावर पोसले गेले, तर आपल्या आतली तेजस्विता प्रकट केल्याशिवाय राहात नाही.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक