शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

आनंद तरंग: आपणही बदलुया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 2:51 AM

गणपती भक्ताला दानपेटीत दक्षणा, दागिने टाकायला सांगतो का?

विजयराज बोधनकरगणपती बाप्पा गेले. आनंद सोेहळा पार पडला, दहा दिवस भक्तीचे गेलेत, समाज एकत्र आला, मंडपे उभारलीत, रोषणाई केली, भव्य मूर्ती पुजल्या गेल्यात, दान पेट्या भरल्यात, पूजा साहित्य विक्रेते सुखावलेत, व्यापार बहरला, अख्खा समाज उत्साहाने आनंदून गेला. पण यातून खरे फलित हाती लागले का की फक्त उत्सव साजरे झालेत? काही गणेश मंडळाचा गणपती मंडपात झाकून ठेवल्यामुळे व महान अभिनेते, अभिनेत्री दर्शनाला आल्यामुळे मोठ्या रांगा लागल्यात, मीडियाने सतत सेलिब्रटींचा मारा केल्यामुळे भक्तगण त्या मृगजळामागे धावू लागलेत, जो गणपती मीडियावर झळकतो तो पावणारा देव असा शिक्कामोर्तब भक्तगण करत गेले आणि रांग वाढतच गेली. रांगेत उभं राहून दर्शन घेतल्यावर खरंच श्री गणेश पावतो का? घरात आणलेला गणपती हा नवसाला न पावता सार्वजनिक गणपती नवसाला पावणारा गणपती असतो असं कुणी सिद्ध करेल का?

गणपती भक्ताला दानपेटीत दक्षणा, दागिने टाकायला सांगतो का? तर अजिबात नाही. देवापुढे पैसे ठेवण्याची आपली परंपरा आहे, कारण मंदिरातला होणारा खर्च सर्व भक्तांनी स्वेच्छेने उचलावा यासाठी आपण पेटीत पैसे टाकतो.. पण गणेश उत्सवातला गणपती हा मंदिरातला गणपती नसतो तर मंडपातल्या गणपतीला कोट्यवधींच्या मालमत्तेची खरंच गरज असते का?

समाज आज वैचारिकदृष्टया फार पुढे गेला आहे. पण, विज्ञानाचं युग येऊनही वैचारिकता अजूनही का हवी तशी फुलत नाही, भक्तीचा अर्थ कर्माशी का लावला जात नाही? देवत्व हे कर्मातून फुलत असतं... हा भाव ज्या दिवशी उमटेल त्यादिवशी श्री गणेशाच्या अध्यात्माने सर्वत्र उजळून निघेल, गणपतीइतकी वैचारिकता उंच झाली तरच हे शक्य आहे. उद्या गणेश मूर्तीची जी अवस्था आपण पाहू त्यावरून आपण बदलले पाहिजे हे आपल्या ध्यानी येईल...