शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

इस्लामी तत्वज्ञानामुळे समाजक्रांतीचे नवे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 20:13 IST

रमजान ईद विशेष...

माणूस ज्या जगात राहतो, त्या जगाबद्दल, त्यातल्या त्याच्या जगण्याबद्दलचा एक यशस्वी सिद्धांतत इस्लामने कुरआनीय तत्वज्ञनाच्या माध्यमातून मांडला आहे. मानवी समाजातल्या स्थित्यंतरांचा कुरआनइतका सूक्ष्म अभ्यास अन्य कोणत्या ग्रंथात आढळत नाही. त्या स्थित्यंतराचा वेध घेतल्यानंतर समाजात निर्माण झालेल्या व निर्माण होऊ शकणाºया समस्यांचे निराकरण इस्लामी तत्वज्ञानाने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातही भविष्याचा वेध घेत ‘इज्तेहादची’ (इस्लामी विवेकाची) प्रेरणा देखील दिली आहे. इतिहास म्हणजे माणसांचा अनुभव व त्याचा संचय असतो. इस्लामच्या तत्वज्ञानात या समग्र अनुभवांचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे इस्लामी विचारधारा मानवी अनुभवावर आधारित मानवकेंद्री हित प्रतिपादित करणारी आहे. प्रेषितांच्या विचारांचे केंद्रदेखील ते राहत होते, तो मानवी समाज होता. त्यांच्या प्रत्येक हदिसमधून समाजक्रांतीनंतर जन्मणाºया समाजाला संहिता प्रदान करण्याची धडपड अधोरेखित होते. नव्या समाजाचा प्रारंभ कोºया पाटीवर होणार नाही. याची पुरेपूर काळजी इस्लामी तत्वज्ञानाने घेतली.

माणसाचे शोषण नाकारल्यानंतर त्याच्या उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. उत्पादित होणाºया वस्तूचे निर्मितीमूल्य काढून त्याचे बाजारमूल्ये व त्याच्या उत्पादनासाठी खर्ची पडलेल्या श्रममूल्याचे विवेचन देखील इस्लामने केले आहे. समन्वयशील अर्थव्यवस्थेतून अभिजात समतेचे तत्व दिले आहे. हुकुमशाही सक्तीने समाज निर्माण करण्यापेक्षा नैतिक प्रबोधनाच्या आत्मजाणीवेतून समाजनिर्मितीचे तत्व सांगितले आहे. कुरआनमध्ये ज्या आयती आहेत, त्या प्रत्येक आयतीमागे परिवर्तनाचा विचार दडला आहे. मक्का शहरात कोणत्याही प्रकारचे शासन अथवा प्रशासन इस्लामच्या पूर्वी अस्तित्वात नव्हते. मात्र इस्लामच्या नंतर सैनिकांपासून कर गोळा करणाºया महसुली अधिकाºयांपर्यंत अनेक अधिकारी नेमले गेले. त्या अधिकाºयांच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्थेला निर्धारित करण्याची भूमिका देखील इस्लामने मांडली आहे. प्रेषित मोहम्मद (स.) यांनी शासनाची कर्तव्ये सांगितली. त्यात समता आणि त्याची प्रस्थापना याला त्यांनी मोठ्या प्रमाणात महत्त्व दिले. 

चळवळीच्या मुळाशी तत्वज्ञान असावे लागते. इस्लामच्या मुळाशी कुरआनप्रणित तत्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. नव्या ज्ञानाची असूया ही तत्वज्ञानाच्या उगमाची प्राथमिक गरज आहे. प्राप्त परिस्थितीतला सामाजिक अंधकार, आणि त्या अंधाराला भेदणारा हिरा नावाच्या गुहेतला ‘इकरा’ या ज्ञानाभिलाषी सर्जनात्मक शब्दातून झालेला अनुबोध. प्रेषित मोहम्मद (स.) यांनी चिंतनातून अप्रक्षिप्त चैतन्याचा शोध घेताना भौतिक परिस्थितीची जाणीव उराशी बाळगली होती. त्यामुळेच इस्लामी समाजक्रांतीच्या नंतर अरबी समाजाच्या उत्पादन व्यवस्थेत प्रचंड उलथापालथ झाली. मोडतोड झाली. त्यातून समतामुलक इस्लामी अर्थक्रांतीने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. हे स्थान निर्माण करण्यामागे प्रत्येक वस्तूचा नव्याने अर्थ लावण्याची इस्लामी तत्वज्ञानाची धारणा होती. त्यातून मग गरिबांचे सामाजिक जीवनमान उंचवण्यासाठी जकातसारखा सामाजिक कर अदा करणे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य बनले. त्यांनी गरीबांना आपल्या संपत्तीतून आर्थिक मदत देऊन समाजातील आर्थिक विषमता संपवण्यासाठी श्रीमंतांना प्रेरित केले. त्यामुळे अवघ्या काही वर्षातच मक्का शहरातील आर्थिक विषमता संपली. गरीब आणि श्रीमंत या वर्गात समन्वय निर्माण होऊन अर्थव्यवस्थेतून मूठभर लोकांचे हित जपले जाण्याची अघोरी पद्धत बंद झाली. इस्लामने व्यापार, सामाजिक व्यवहार, नैतिक आचरण यासह अनेक मूल्यांची नव्याने व्याख्या केली. - आसिफ इक्बाल

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकRamzan Eidरमजान ईद