शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामी तत्वज्ञानातून मानवतावादी विचाराचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:47 IST

रमजान ईद विशेष

प्रेषित मोहम्मद (स.) यांनी इस्लामी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून अनेक सामाजिक बदल घडवून आणले. प्रेषितांनी इस्लामी तत्त्वज्ञानात माणसाविषयी इस्लामची भूमिका, माणसांच्या समूहाविषयीची धोरणे त्यांच्या मूलभूत तत्त्वज्ञानातून मांडली आहेत. या तत्त्वज्ञानाचे कुरआन आणि हदिस हे दोन मुख्य स्रोत आहेत.

इस्लाम त्याच्या अनुयायांना सामाजिक आचारांची संहिता प्रदान करतो. त्याद्वारे इस्लाम समाजासमोरील अडचणी दूर करण्यासाठीचे सामाजिक भान मुस्लिमांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. इस्लामने मुस्लिमांना शेजाºयापासून गरीब, याचक आणि असाहाय्य, अपंग लोकांशी कसे वागले पाहिजे, याचे नियम सांगितले आहेत. त्यामध्ये इस्लाम कुरआनने त्याविषयी आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, ‘आप्तशेजारी, अनोळखी शेजारी व तोंडओळख असणारा सहकारी व वाटसरू त्यांच्याशी उपकाराचे व्यवहार करा. विश्वास ठेवा की, अल्लाह एखाद्या अशा व्यक्तीला पसंत करीत नाही जी अहंकारी, गर्विष्ठ असते आणि आपल्या मोठेपणाचा अहंकार बाळगते’ (दिव्य कुरआन ४/३६) शेजाºयाच्या संदर्भात प्रेषितांची एक हदिस (प्रेषित वचन) देखील आहे. ही हदिस हजरत आएशा (रजि.) आणि अब्दुल्लाह ( रजि.) यांनी कथन केली आहे.

‘प्रेषित (स.) एकदा म्हणाले की, अल्लाहचे दूत जिब्रईल (अ.) यांनी शेजाºयांना सभ्यतेची व उदारतेची वागणूक देण्यावर इतका भर दिला आहे की, मला कधी शंका वाटते की, शेजाºयांना वारसा हक्काचा अधिकार तर दिला जात नाही ना?’ याप्रमाणेच अब्दुल्लाह (रजि.) यांनी एक हदिस कथन केली आहे. त्यामध्ये प्रेषित (स.) म्हणतात, ‘तो मनुष्य मुस्लीम नाही ज्याचे पोट भरलेले आहे आणि त्याचे शेजारी मात्र उपाशी आहे.’ शेजाºयाविषयीची अनेक नैतिक कर्तव्ये इस्लामने सांगितली आहेत. शेजाºयांप्रमाणेच गरिबांची काळजी घेण्याविषयी इस्लामने मुसलमानांना ताकीद केली आहे. कुरआनमधील ही आयत त्याबाबतीत उद्बोधक आहे. जे लोक नरकाच्या आगीत लपेटलेले असतील  त्यांना विचारले जाईल. 

‘तुम्हाला नरकाच्या आगीत कशामुळे पडावे लागले?’ ते लोक म्हणतील, ‘आम्ही त्यांच्यापैकी नव्हतो जे प्रार्थना करीत होते, आम्ही गरिबांना जेवू घालत होतो.’ म्हणजे गरिबांची भूक दूर करण्याला इस्लामने प्रार्थनेच्या समकक्ष दर्जा दिला आहे. नोकरांना देखील इस्लामने सन्मानाची वागणूक देण्याविषयी बजावले आहे. श्रमिकांच्या मजुरीसंदर्भात प्रेषितांची एक हदिस आहे. जी अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांनी कथन केली आहे. त्यामध्ये प्रेषित (स.) म्हणतात, ‘मजुराला त्याचा घाम सुकण्यापूर्वी मजुरी द्या.’ हजरत अनस (रजि.) हे प्रेषित (स.) यांचे स्वीय सहायक होते. 

त्यांनी दहा वर्षांच्या सेवेतील प्रेषितांच्या (स.) आठवणी सांगताना नमूद केले आहे की, ‘मी दहा वर्षांपासून प्रेषित (स.) यांच्याकडे काम करत आहे. परंतु ते एकदाही माझ्यावर रागावले नाहीत, अथवा त्यांनी टीकासुद्धा केली नाही. मी त्यांनी सांगितलेली कामे वेळेवर केली नाहीत तरी त्यांनी माझ्यावर टीका केलेली नाही. ते त्यांच्या नोकरांशी आणि घरातील लोकांशी एकसारखेपणाने वागत आणि आपल्या नोकरांना त्यांनी कधी मारहाण केली नाही.’ गुलामांच्या संदर्भात देखील इस्लामी तत्त्वज्ञानाने अत्यंत मानवतावादी विचार मांडले आहेत. 

- आसिफ इक्बाल

टॅग्स :SolapurसोलापूरRamzan Eidरमजान ईदAdhyatmikआध्यात्मिक