शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

...म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:04 AM

भारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी ब्रह्मसूत्र देण्याची प्रथा होती.

- सद्गुरू जग्गी वासुदेवभारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी ब्रह्मसूत्र देण्याची प्रथा होती. म्हणजे आध्यात्मिक पाऊल हे नेहमी पहिले पाऊल असे, त्यानंतरच मग व्यक्तीचे इतर प्रकारच्या शिक्षणाने सशक्तीकरण होत असे. जीवनात अध्यात्म हे पहिले पाऊल आहे, हे जो जाणत नाही अशा व्यक्तीला थोडे जरी सशक्त केले तरी तो धोकादायक ठरतो.आजकाल जगात हेच घडतेय. आज शिक्षणामुळे म्हणा किंवा राजकीय आणि आर्थिक सामर्थ्यामुळे; ममताशून्य आणि आनंदहीन लोकांच्या हाती पुष्कळ अधिकारिक सत्ता आली आहे. आज वाईट लोक नव्हे, तर चांगले, सुशिक्षित लोक जगाला विनाशाच्या खाईत लोटत आहेत. जगात माजलेला संघर्ष हा वाईट विरुद्ध चांगले असा नाहीये. तो नेहमी दोन चांगल्या व्यक्तींमध्ये आहे. जगात ज्याला दहशतवादी म्हणतात, त्याला वाटते की तो खूप चांगला माणूस आहे. जेवढे अधिक आपण चांगले आहोत असे त्याला वाटते तेवढा तो आपल्यासाठी विनाशकारी ठरतो. वाईट माणसे लढायच्या भानगडीत पडत नाहीत. फक्त चांगली माणसेच संपूर्ण संस्कृती नामशेष करतील आणि एकमेकांचा समूळ नायनाट करतील यात शंका नाही. म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. तर प्रत्येक व्यक्तीची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्याने आपले आंतरिक स्थैर्य प्रस्थापित करणे व एक आनंदी व्यक्ती बनणे. ज्या माणसाला स्वत:चे शरीर, मन आणि भावना नीट हाताळता येत नाहीत; पण त्याला जग हाताळायचे आहे, हे कदापि शक्य नाही. जर तुम्हाला स्वत:ला कसे सांभाळायचे हे माहीत नसेल, तर जग कसे सांभाळावे हे तुम्हाला कळणारच नाही. म्हणून स्वत:मध्ये स्थैर्य प्रस्थापित करणे, आपला आंतरिक समन्वय आणि सुसूत्रता साधणे आणि आतून एक आनंदी व्यक्ती होऊन बहरणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आणि जबाबदारी आहे. माणूस एकदा जर आनंदी झाला की साहजिकच तो जगात केवळ आनंदच उधळणार.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक