शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पारसस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 5:26 AM

फार वर्षांपूर्वी एका गावातील आश्रमात गुरूंबरोबर काही शिष्य राहायचे

फार वर्षांपूर्वी एका गावातील आश्रमात गुरूंबरोबर काही शिष्य राहायचे. एके दिवशी गुरूंनी शिष्याला एक दगड दाखवला व विचारले की, या दगडाची किंमत काय असेल? शिष्य आश्चर्याने त्या दगडाकडे पाहत राहिला. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते की, या दगडाची अशी काय किंमत असेल? बुचकळ्यात पडलेल्या शिष्याला बघून गुरू म्हणाले, ‘जा, जरा बाजारात जाऊन याची किंमत काय असावी ते विचारून ये. पण लक्षात ठेव की, हा दगड कोणालाही विकायचा नाही. शिष्य बाजाराकडे निघतो. रस्त्यात एक शेतकरी भेटतो. त्याला थांबवून तो विचारतो की, आपण मला सांगू शकाल, की या दगडाची तुम्ही काय रक्कम देऊ इच्छिता? शेतकरी म्हणतो, ‘याची ती काय किंमत? एक रुपया ठीक आहे’. शिष्य पुढे जाऊन एका दुकानदाराला विचारतो की, या दगडाची काय किंमत असू शकेल? दुकानदार उत्तर देतो, ‘दहा रुपये’. शिष्याच्या मनात येते की, आणखी दोन-चार व्यक्तींना विचारायला हवे. तो एका सोनाराला विचारतो. सोनार सांगतो, मी याचे हजार रुपये देऊ शकतो. हे ऐकून शिष्य तोंडात बोट घालतो. आता मात्र त्याच्या मनातली उत्सुकता वाढते. तो राजाकडे जातो व विचारतो, ‘राजन, तुम्ही या दगडाची काय किंमत आकाराल?’ राजा म्हणतो, ‘या दगडाच्या किमतीत मी माझे पूर्ण राज्य द्यायला तयार होईन.’ शिष्य हे ऐकून तो दगड परत घेऊन धावत आश्रमात पोहोचतो. गुरूंसमोर जाऊन प्रश्न करतो की, ‘गुरुदेव, मला खरं सांगा. हा दगड नक्की काय आहे? राजा तर दगडाच्या बदल्यात पूर्ण राज्य द्यायला तयार आहे.’ तेव्हा गुरू शांत मुद्रेने उत्तर देतात, ‘या दगडाला पारस म्हणतात. लोखंडाला जर याचा स्पर्श झाला तर त्याचे सोने होते. समजले? अर्थातच मूल्यहीन वस्तू ही मूल्यवान होते. सत्याचा बोध होण्यासाठी ईश्वरीय ज्ञानाचा स्पर्श आपल्या बुद्धीला होण्याची गरज आहे. ज्याद्वारे समस्यांचे समाधान सहजरीत्या आपण करू शकतो. योग्य निर्णय घेण्याची शक्ती आपणास मिळते.- नीता ब्रह्मकुमारी