शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

देव आभाळी,सागरी...देव आहे चराचरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:51 IST

जगण्याची सोपी संस्कृती म्हणजे ज्या विधात्याने सर्वांची उत्पत्ती केली आहे त्याचे स्मरण करून सत्कार्य करत राहणे हे होय.

का रे न आठविसी कृपाळू देवासी।पोसितो जगाशी एकला तो।।बाळा दुधा कोणी करिले उत्पत्ती।वाढवे श्रीपती सवे दोन्ही।।

मी म्हणजे सर्वकाही आणि मीच हा सर्व जगाचा व्यवहार चालवितो. अशा भ्रमात माणसे जगत आहेत. परंतु जगाचे रहाटगाडगे आघात शक्ती धारक चालवितो. ही बाब आपण जवळपास विसरलो. जगण्याची सोपी संस्कृती म्हणजे ज्या विधात्याने सर्वांची उत्पत्ती केली आहे त्याचे स्मरण करून सत्कार्य करत राहणे हे होय. 'स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे' असे संत तुकाराम महाराज सांगतात. भक्तिमार्गात स्मरण भक्ती श्रेष्ठ मानली जाते. मात्र श्रवण, वंदन, अर्चन, दास्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे प्रकार वर्णन केलेले आहेत. कर्तुत्व शक्ती ही खरी ईश्वराची आहे. तिथं अहंकार चालत नाही. मी करणार आहे, करू शकेन व्यर्थ कर्तुत्व अभिमान आणि अहंकार सृष्टीस मान्य नाही.

परी मने वाचा देहे। ऐसा तो व्यापार नव्हे। 

संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी हेच वरील ओवीत सांगितले आहे. इंद्रियांचा अधिपती हा ईश्वर आहे. पंचमहाभूतांना शास्त्रकारांनी एक जड पदार्थ गणले आहे. त्यांचा नियामक वेगळा आहे. तेजाच, पृथ्वीच, वायूच, नियमन करतो. तोच नियामक असून तोच सर्वांच्या हृदयात बसलेला आहे ही ईश्वराची मोठी शक्ती आहे. चैतन्याच्या अधिष्ठानावर स्मरण आणि विस्मरण असते. त्यातील स्मरण म्हणजेच ईश्वर असे समजले जाते. तत्त्वरूपाने ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र आहे. पण त्याला ओळखल्याशिवाय जीवाला समाधान लाभत नाही. चैतन्याने चैतन्याद्वारा चैतन्याला पहावे. म्हणजेच देवदर्शन. खरे बोलणार व वागणारा देवाला आवडतो. ईश्वराच्या इच्छेनुसार वागावे, यासारखे सुख नाही. परपीडा म्हणजे दुःख तर परम समृद्धी म्हणजे सुख असे मानावे लागते. आपल्या जीवनात आपण लहान-मोठे अनेक निर्णय घेत असतो. आपणास निर्णय क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी हीच शक्ती आपणास साह्य करीत असते. ईश्वराच्या अस्तित्वालाही आपण दाखवू किंवा नाकारू देखील शकत नाही. याबाबतीत अनेक तर्क आणि वितर्क असू शकतील. परंतु 'जग हे चाले कोणाच्या इशारे' हादेखील पटणारा युक्तिवाद आहेत. ज्या ठिकाणी विज्ञान संपते त्या ठिकाणी ईश्वरी लीला सुरू होते. असे म्हटले जाते म्हणूनच मनुष्यदेहात असणारे सर्व आपण त्या ईश्वराचे अंश आहोत. आपला जीवाला ते अनुभवता येणे म्हणजे आत्मज्ञान.

मानवी मनाला उभारी देणारी, गेलेला आत्मविश्वास परत प्राप्त करून देणारी, व सकारात्मक विचार इतरांपर्यंत पोहोचवणारी ऊर्जा म्हणजेच ईश्वर आहे. ही काळाच्या ओघात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसटशी रेषा ओलांडली. आणि नकारात्मक विचारांचा पगडा वाढायला लागला. त्यातूनच हे युद्ध सुरू झाले म्हणूनच म्हटले जाते की 'देव अंतरात नांदे देव दाही दिशी कोंदे आभाळी सागरी देव आहे चराचरी'. माणूस जेव्हा सुखाची अनुभूती घेत असतो. तेव्हा त्यास विश्व निर्मात्याचा पूर्णपणे विसर पडतो. आणि तो जगविजेत्याचा  अविर्भावात वावरत असतो. परंतु जसे तो दुःखात आणि अपयशात मार्गक्रमण करतो. तसे तो परमात्मा, ईश्वर, अशा विविध नावाने नटलेल्या अगाध शक्ती चा आधार घेतो. तेव्हा कुठे त्या उपरती झाल्याचे दिसून येते.

तात्पर्य काय तर सकारात्मक विचार हे मानवाला क्रयशक्ती वाढून स्वतःच्या व समाजाच्या प्रगतीसाठी साधन ठरते. तर नकारात्मक विचार हे बाधक ठरतात. मनाचे स्थैर्य व आनंद मिळवायचा असेल तर आघात शक्तीचे सामर्थ्य नाकारून चालणार नाही.

- डॉ. भालचंद्र संगनवार ( लेखक लातूर येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक