शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

देव आभाळी,सागरी...देव आहे चराचरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:51 IST

जगण्याची सोपी संस्कृती म्हणजे ज्या विधात्याने सर्वांची उत्पत्ती केली आहे त्याचे स्मरण करून सत्कार्य करत राहणे हे होय.

का रे न आठविसी कृपाळू देवासी।पोसितो जगाशी एकला तो।।बाळा दुधा कोणी करिले उत्पत्ती।वाढवे श्रीपती सवे दोन्ही।।

मी म्हणजे सर्वकाही आणि मीच हा सर्व जगाचा व्यवहार चालवितो. अशा भ्रमात माणसे जगत आहेत. परंतु जगाचे रहाटगाडगे आघात शक्ती धारक चालवितो. ही बाब आपण जवळपास विसरलो. जगण्याची सोपी संस्कृती म्हणजे ज्या विधात्याने सर्वांची उत्पत्ती केली आहे त्याचे स्मरण करून सत्कार्य करत राहणे हे होय. 'स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे' असे संत तुकाराम महाराज सांगतात. भक्तिमार्गात स्मरण भक्ती श्रेष्ठ मानली जाते. मात्र श्रवण, वंदन, अर्चन, दास्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे प्रकार वर्णन केलेले आहेत. कर्तुत्व शक्ती ही खरी ईश्वराची आहे. तिथं अहंकार चालत नाही. मी करणार आहे, करू शकेन व्यर्थ कर्तुत्व अभिमान आणि अहंकार सृष्टीस मान्य नाही.

परी मने वाचा देहे। ऐसा तो व्यापार नव्हे। 

संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी हेच वरील ओवीत सांगितले आहे. इंद्रियांचा अधिपती हा ईश्वर आहे. पंचमहाभूतांना शास्त्रकारांनी एक जड पदार्थ गणले आहे. त्यांचा नियामक वेगळा आहे. तेजाच, पृथ्वीच, वायूच, नियमन करतो. तोच नियामक असून तोच सर्वांच्या हृदयात बसलेला आहे ही ईश्वराची मोठी शक्ती आहे. चैतन्याच्या अधिष्ठानावर स्मरण आणि विस्मरण असते. त्यातील स्मरण म्हणजेच ईश्वर असे समजले जाते. तत्त्वरूपाने ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र आहे. पण त्याला ओळखल्याशिवाय जीवाला समाधान लाभत नाही. चैतन्याने चैतन्याद्वारा चैतन्याला पहावे. म्हणजेच देवदर्शन. खरे बोलणार व वागणारा देवाला आवडतो. ईश्वराच्या इच्छेनुसार वागावे, यासारखे सुख नाही. परपीडा म्हणजे दुःख तर परम समृद्धी म्हणजे सुख असे मानावे लागते. आपल्या जीवनात आपण लहान-मोठे अनेक निर्णय घेत असतो. आपणास निर्णय क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी हीच शक्ती आपणास साह्य करीत असते. ईश्वराच्या अस्तित्वालाही आपण दाखवू किंवा नाकारू देखील शकत नाही. याबाबतीत अनेक तर्क आणि वितर्क असू शकतील. परंतु 'जग हे चाले कोणाच्या इशारे' हादेखील पटणारा युक्तिवाद आहेत. ज्या ठिकाणी विज्ञान संपते त्या ठिकाणी ईश्वरी लीला सुरू होते. असे म्हटले जाते म्हणूनच मनुष्यदेहात असणारे सर्व आपण त्या ईश्वराचे अंश आहोत. आपला जीवाला ते अनुभवता येणे म्हणजे आत्मज्ञान.

मानवी मनाला उभारी देणारी, गेलेला आत्मविश्वास परत प्राप्त करून देणारी, व सकारात्मक विचार इतरांपर्यंत पोहोचवणारी ऊर्जा म्हणजेच ईश्वर आहे. ही काळाच्या ओघात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसटशी रेषा ओलांडली. आणि नकारात्मक विचारांचा पगडा वाढायला लागला. त्यातूनच हे युद्ध सुरू झाले म्हणूनच म्हटले जाते की 'देव अंतरात नांदे देव दाही दिशी कोंदे आभाळी सागरी देव आहे चराचरी'. माणूस जेव्हा सुखाची अनुभूती घेत असतो. तेव्हा त्यास विश्व निर्मात्याचा पूर्णपणे विसर पडतो. आणि तो जगविजेत्याचा  अविर्भावात वावरत असतो. परंतु जसे तो दुःखात आणि अपयशात मार्गक्रमण करतो. तसे तो परमात्मा, ईश्वर, अशा विविध नावाने नटलेल्या अगाध शक्ती चा आधार घेतो. तेव्हा कुठे त्या उपरती झाल्याचे दिसून येते.

तात्पर्य काय तर सकारात्मक विचार हे मानवाला क्रयशक्ती वाढून स्वतःच्या व समाजाच्या प्रगतीसाठी साधन ठरते. तर नकारात्मक विचार हे बाधक ठरतात. मनाचे स्थैर्य व आनंद मिळवायचा असेल तर आघात शक्तीचे सामर्थ्य नाकारून चालणार नाही.

- डॉ. भालचंद्र संगनवार ( लेखक लातूर येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक