शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

देव आभाळी,सागरी...देव आहे चराचरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:51 IST

जगण्याची सोपी संस्कृती म्हणजे ज्या विधात्याने सर्वांची उत्पत्ती केली आहे त्याचे स्मरण करून सत्कार्य करत राहणे हे होय.

का रे न आठविसी कृपाळू देवासी।पोसितो जगाशी एकला तो।।बाळा दुधा कोणी करिले उत्पत्ती।वाढवे श्रीपती सवे दोन्ही।।

मी म्हणजे सर्वकाही आणि मीच हा सर्व जगाचा व्यवहार चालवितो. अशा भ्रमात माणसे जगत आहेत. परंतु जगाचे रहाटगाडगे आघात शक्ती धारक चालवितो. ही बाब आपण जवळपास विसरलो. जगण्याची सोपी संस्कृती म्हणजे ज्या विधात्याने सर्वांची उत्पत्ती केली आहे त्याचे स्मरण करून सत्कार्य करत राहणे हे होय. 'स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे' असे संत तुकाराम महाराज सांगतात. भक्तिमार्गात स्मरण भक्ती श्रेष्ठ मानली जाते. मात्र श्रवण, वंदन, अर्चन, दास्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे प्रकार वर्णन केलेले आहेत. कर्तुत्व शक्ती ही खरी ईश्वराची आहे. तिथं अहंकार चालत नाही. मी करणार आहे, करू शकेन व्यर्थ कर्तुत्व अभिमान आणि अहंकार सृष्टीस मान्य नाही.

परी मने वाचा देहे। ऐसा तो व्यापार नव्हे। 

संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी हेच वरील ओवीत सांगितले आहे. इंद्रियांचा अधिपती हा ईश्वर आहे. पंचमहाभूतांना शास्त्रकारांनी एक जड पदार्थ गणले आहे. त्यांचा नियामक वेगळा आहे. तेजाच, पृथ्वीच, वायूच, नियमन करतो. तोच नियामक असून तोच सर्वांच्या हृदयात बसलेला आहे ही ईश्वराची मोठी शक्ती आहे. चैतन्याच्या अधिष्ठानावर स्मरण आणि विस्मरण असते. त्यातील स्मरण म्हणजेच ईश्वर असे समजले जाते. तत्त्वरूपाने ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र आहे. पण त्याला ओळखल्याशिवाय जीवाला समाधान लाभत नाही. चैतन्याने चैतन्याद्वारा चैतन्याला पहावे. म्हणजेच देवदर्शन. खरे बोलणार व वागणारा देवाला आवडतो. ईश्वराच्या इच्छेनुसार वागावे, यासारखे सुख नाही. परपीडा म्हणजे दुःख तर परम समृद्धी म्हणजे सुख असे मानावे लागते. आपल्या जीवनात आपण लहान-मोठे अनेक निर्णय घेत असतो. आपणास निर्णय क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी हीच शक्ती आपणास साह्य करीत असते. ईश्वराच्या अस्तित्वालाही आपण दाखवू किंवा नाकारू देखील शकत नाही. याबाबतीत अनेक तर्क आणि वितर्क असू शकतील. परंतु 'जग हे चाले कोणाच्या इशारे' हादेखील पटणारा युक्तिवाद आहेत. ज्या ठिकाणी विज्ञान संपते त्या ठिकाणी ईश्वरी लीला सुरू होते. असे म्हटले जाते म्हणूनच मनुष्यदेहात असणारे सर्व आपण त्या ईश्वराचे अंश आहोत. आपला जीवाला ते अनुभवता येणे म्हणजे आत्मज्ञान.

मानवी मनाला उभारी देणारी, गेलेला आत्मविश्वास परत प्राप्त करून देणारी, व सकारात्मक विचार इतरांपर्यंत पोहोचवणारी ऊर्जा म्हणजेच ईश्वर आहे. ही काळाच्या ओघात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसटशी रेषा ओलांडली. आणि नकारात्मक विचारांचा पगडा वाढायला लागला. त्यातूनच हे युद्ध सुरू झाले म्हणूनच म्हटले जाते की 'देव अंतरात नांदे देव दाही दिशी कोंदे आभाळी सागरी देव आहे चराचरी'. माणूस जेव्हा सुखाची अनुभूती घेत असतो. तेव्हा त्यास विश्व निर्मात्याचा पूर्णपणे विसर पडतो. आणि तो जगविजेत्याचा  अविर्भावात वावरत असतो. परंतु जसे तो दुःखात आणि अपयशात मार्गक्रमण करतो. तसे तो परमात्मा, ईश्वर, अशा विविध नावाने नटलेल्या अगाध शक्ती चा आधार घेतो. तेव्हा कुठे त्या उपरती झाल्याचे दिसून येते.

तात्पर्य काय तर सकारात्मक विचार हे मानवाला क्रयशक्ती वाढून स्वतःच्या व समाजाच्या प्रगतीसाठी साधन ठरते. तर नकारात्मक विचार हे बाधक ठरतात. मनाचे स्थैर्य व आनंद मिळवायचा असेल तर आघात शक्तीचे सामर्थ्य नाकारून चालणार नाही.

- डॉ. भालचंद्र संगनवार ( लेखक लातूर येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक